शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

देशाबाहेर काढणार, ही केवळ अफवा : स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:54 IST

अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले.

ठळक मुद्दे‘सीएए’बद्दल गैरसमज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकशाहीत विरोध प्रदर्शन आणि मोर्चा काढण्याचे नागरिकांना अधिकार आहेत. पण नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशात काढण्यात येणाऱ्या मोर्चात काही हिंसक प्रवृत्तीचे लोक घुसून मोर्चाला गालबोट लावत आहेत. अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले.‘युवा आयाम’तर्फे ‘सीएए हिंसा : प्रदर्शन वा नक्षली षङ्यंत्र’ या विषयावर ‘मंथन टॉक’चे आयोजन गोरेवाडा रोड, गिट्टीखदान येथील कल्पतरू सभागृहात शनिवारी करण्यात आले. मुख्य वक्त्या स्मिता गायकवाड म्हणाल्या, ‘सीएए’ विरोधात देशभरात सुनियोजित हिंसा पसरविण्यात येत आहे. मोर्चात जाळपोळ करणारे शहरी नक्षलवादी असल्याचे सत्य पुढे आले आहे. अल्पसंख्यक ७० वर्षांपासून देशात राहात आहेत. त्यांना देशाबाहेर काढणार असल्याची भीती दाखविणे चुकीचे आहे. नागरिकत्व कायदा १९५५ ला झाला. राष्ट्रीयता आणि नागरिकत्व यात फरक असून तो समजून घेण्याची लोकांना गरज आहे. आर्टिकल १५ भारतीय नागरिकांसाठी लागू आहे. कायदा पटत नसेल तर लोकांनी न्यायालयात जावे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.गायकवाड म्हणाल्या, सीएएबद्दल अफवा हीच मूळ समस्या आहे. मोर्चातील बहुतांश लोकांना सीएए काय, हेच माहीत नाही. खरं तर सीएए नागरिकत्व मागण्याचा कायदा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला आहे. त्याला लोक आसामच्या एनआरसीसोबत जोडून चूक करीत आहेत. शहरी नक्षलवादी मोर्चात घुसून आपला हेतू साध्य करीत आहे. हे लोकांनी समजून घ्यावे.यावेळी युवा आयामचे आकाश प्रसाद, मानस मलय, अमन पांडे, जयकृष्ण पिल्लई उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक