शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:49 IST

केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.

ठळक मुद्दे ‘आयडिया ऑफ भारत’वर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला संघाचे महानगर संघचालक राजेश लोया तसेच राजीव कपूर हे उपस्थित होते. धर्मकार्याहून पुण्यकार्य जास्त श्रेष्ठ आहे. समाजाला समृद्ध करणे हे धर्मकार्य आहे. धर्मामुळे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीशी जोडल्या जाऊ शकतो. भारतीयांमध्ये स्वत:च्या इतिहास, संस्कृती आणि अस्तित्वाबद्दल संभ्रम दिसून येतो. स्वत:चे वास्तव नाकारणे हीच ‘फॅशन’ झाली आहे. भारतीय मातीशी नाळ तुटली की मग त्यानंतर ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे म्हणणारी मानसिकता तयार होते. संविधानकर्त्यांच्या मनात धर्माबद्दलची संकल्पना स्पष्ट होती, मात्र आता संविधानाच्या पुरस्कर्त्यांमध्ये ती स्पष्टता जाणवत नाही. त्यामुळे खरी संकल्पना संमजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.वैद्य यांनी केले.देशात व संपूर्ण जगात शांतता निर्माण करणे भारतीयांचीच जबाबदारी असून, हे कार्य प्रत्येकाचे आहे. भारताचे अस्तित्व जगाला सांगणे, दाखविणे आणि शिकविणे हेच आपले काम असून, त्यासाठी देशातल्या प्रत्येक तरुणाला भारत जाणून घ्यावा लागेल असेदेखील ते म्हणाले . अंकिता देशकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रेमलता डागा यांनी आभार मानले.नेहरू यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाआपल्या देशात भारतीय संकल्पनेवर विश्वास असणारे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा चष्मा घालून फिरणारे असा दोन विचारधारांमध्ये जुना संघर्ष आहे. पं.जवाहरलाल नेहरू हे भारतविरोधी नव्हते, मात्र त्यांच्या भारतीय संकल्पनेवर पश्चिमी विचारांचा पगडा होता, असेदेखील डॉ.वैद्य म्हणाले. यावेळी त्यांनी १९४८ साली सोमनाथ मंदिराचे जीणोद्धार व त्यासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जाण्यास नेहरू यांनी केलेला विरोध याचे उदाहरण दिले. नवीन पिढीने भारताबाबत जाणून घ्यावे, देशाला मानावे, देशासाठी बनावे आणि देशाला बनवावे असे आवाहन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर