शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:49 IST

केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.

ठळक मुद्दे ‘आयडिया ऑफ भारत’वर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला संघाचे महानगर संघचालक राजेश लोया तसेच राजीव कपूर हे उपस्थित होते. धर्मकार्याहून पुण्यकार्य जास्त श्रेष्ठ आहे. समाजाला समृद्ध करणे हे धर्मकार्य आहे. धर्मामुळे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीशी जोडल्या जाऊ शकतो. भारतीयांमध्ये स्वत:च्या इतिहास, संस्कृती आणि अस्तित्वाबद्दल संभ्रम दिसून येतो. स्वत:चे वास्तव नाकारणे हीच ‘फॅशन’ झाली आहे. भारतीय मातीशी नाळ तुटली की मग त्यानंतर ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे म्हणणारी मानसिकता तयार होते. संविधानकर्त्यांच्या मनात धर्माबद्दलची संकल्पना स्पष्ट होती, मात्र आता संविधानाच्या पुरस्कर्त्यांमध्ये ती स्पष्टता जाणवत नाही. त्यामुळे खरी संकल्पना संमजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.वैद्य यांनी केले.देशात व संपूर्ण जगात शांतता निर्माण करणे भारतीयांचीच जबाबदारी असून, हे कार्य प्रत्येकाचे आहे. भारताचे अस्तित्व जगाला सांगणे, दाखविणे आणि शिकविणे हेच आपले काम असून, त्यासाठी देशातल्या प्रत्येक तरुणाला भारत जाणून घ्यावा लागेल असेदेखील ते म्हणाले . अंकिता देशकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रेमलता डागा यांनी आभार मानले.नेहरू यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाआपल्या देशात भारतीय संकल्पनेवर विश्वास असणारे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा चष्मा घालून फिरणारे असा दोन विचारधारांमध्ये जुना संघर्ष आहे. पं.जवाहरलाल नेहरू हे भारतविरोधी नव्हते, मात्र त्यांच्या भारतीय संकल्पनेवर पश्चिमी विचारांचा पगडा होता, असेदेखील डॉ.वैद्य म्हणाले. यावेळी त्यांनी १९४८ साली सोमनाथ मंदिराचे जीणोद्धार व त्यासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जाण्यास नेहरू यांनी केलेला विरोध याचे उदाहरण दिले. नवीन पिढीने भारताबाबत जाणून घ्यावे, देशाला मानावे, देशासाठी बनावे आणि देशाला बनवावे असे आवाहन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर