शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:49 IST

केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.

ठळक मुद्दे ‘आयडिया ऑफ भारत’वर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ भारत’ या विषयावर ते बोलत होते.चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला संघाचे महानगर संघचालक राजेश लोया तसेच राजीव कपूर हे उपस्थित होते. धर्मकार्याहून पुण्यकार्य जास्त श्रेष्ठ आहे. समाजाला समृद्ध करणे हे धर्मकार्य आहे. धर्मामुळे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीशी जोडल्या जाऊ शकतो. भारतीयांमध्ये स्वत:च्या इतिहास, संस्कृती आणि अस्तित्वाबद्दल संभ्रम दिसून येतो. स्वत:चे वास्तव नाकारणे हीच ‘फॅशन’ झाली आहे. भारतीय मातीशी नाळ तुटली की मग त्यानंतर ‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे म्हणणारी मानसिकता तयार होते. संविधानकर्त्यांच्या मनात धर्माबद्दलची संकल्पना स्पष्ट होती, मात्र आता संविधानाच्या पुरस्कर्त्यांमध्ये ती स्पष्टता जाणवत नाही. त्यामुळे खरी संकल्पना संमजून घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.वैद्य यांनी केले.देशात व संपूर्ण जगात शांतता निर्माण करणे भारतीयांचीच जबाबदारी असून, हे कार्य प्रत्येकाचे आहे. भारताचे अस्तित्व जगाला सांगणे, दाखविणे आणि शिकविणे हेच आपले काम असून, त्यासाठी देशातल्या प्रत्येक तरुणाला भारत जाणून घ्यावा लागेल असेदेखील ते म्हणाले . अंकिता देशकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रेमलता डागा यांनी आभार मानले.नेहरू यांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाआपल्या देशात भारतीय संकल्पनेवर विश्वास असणारे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा चष्मा घालून फिरणारे असा दोन विचारधारांमध्ये जुना संघर्ष आहे. पं.जवाहरलाल नेहरू हे भारतविरोधी नव्हते, मात्र त्यांच्या भारतीय संकल्पनेवर पश्चिमी विचारांचा पगडा होता, असेदेखील डॉ.वैद्य म्हणाले. यावेळी त्यांनी १९४८ साली सोमनाथ मंदिराचे जीणोद्धार व त्यासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना जाण्यास नेहरू यांनी केलेला विरोध याचे उदाहरण दिले. नवीन पिढीने भारताबाबत जाणून घ्यावे, देशाला मानावे, देशासाठी बनावे आणि देशाला बनवावे असे आवाहन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर