शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जगावे की मरावे हाच एकच प्रश्न! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. ...

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवत राज्य सरकारने दिशानिर्देशांसह नाट्यप्रयोग करण्याची परवानगी दिली खरी. मात्र, ती परवानगी जीवघेणी ठरत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणारे चार कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने आयोजकांची व कलावंतांची भंबेरी उडाली आहे.

कोरोना संक्रमणामुळे मरण्याआधी नाट्यप्रयोग झाले नाही तर असेच मरण आहे, असली भावविव्हळ वक्तव्ये नाट्यनिर्माता आणि कलावंतांनी यापूर्वी केली होती. त्यांचे हे वक्तव्य अनेकार्थाने सरकारसाठी आत्मक्लेशाचे ठरणार होते. हे पाप सरकारला नको होते म्हणा वा विविध सांस्कृतिक संघटनांचा हेका म्हणा राज्य सरकारने सांस्कृतिक क्षेत्र तब्बल आठ महिन्यानंतर अनलॉक केले आणि भाऊबीजेपासून झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यप्रयोगांना सुरुवात झाली. एका खुर्चीपासून दुसरी खुर्ची सहा फूट अंतरावर ठेवणे, मास्क आग्रहाने घालणे, व्यक्तिश: अंतर पाळणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर नित्यनेमाने करणे आणि महत्त्वाचे म्हणजे २००च्या वर प्रेक्षक नको, अशा मार्गदर्शिका देण्यात आल्या. मात्र, या मार्गदर्शिकांचे उल्लंघन करणे अगदी पहिल्याच प्रयोगापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तब्बल दोन-तीन हजार प्रेक्षकांची गर्दी नाट्यप्रयोगाला उसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच झाडीपट्टी रंगभूमीवरील तीन निर्माते आणि एक कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने खळबळ उडाली आहे. आता या रंगभूमीवरील नाटकांमध्ये काम करणारे ३० ते ४० टक्के कलावंत शहरातून अर्थात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, पुणे, मुंबई येथून असतात. आणि या शहरांमध्ये कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आदळली आहे. येथून येणारे कलावंत थेट रंगभूमीवर उतरत आहेत आणि इतर कलावंतांमध्ये मिसळत आहेत. त्याचे दुष्परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता वाढली आहे.

-------------

बॉक्स....

आरोग्य केंद्राच्या नोटिशी धडकल्या

नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बघून आणि गर्दी प्रचंड वाढत असल्याचे बघून संबंधित तालुक्याच्या आरोग्य केंद्रांनी आयोजकांना धडाघड नोटिशी पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम अनेक नाट्यसंघांचे ठरलेले प्रयोग रद्द झाले आहेत. शहरातील कलावंतांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

----------

बॉक्स...

कुणीच बोलण्यास तयार नाहीत

एरवी आपली मते रोखठोक मांडणारे कलावंत या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही कलावंत आपले मत व्यक्त करत आहेत. सध्या नाटक नकोच करायला. तसेही नाट्यप्रयोग लागत नाहीत. नाट्यप्रयोग झाले नाही तर जगणे अडचणीचे होईल. मात्र, अशा स्थितीत नाट्यप्रयोग झाले तर मरण निश्चित आहे. विशेष म्हणजे, नाट्यप्रयोगामुळे एकापासून अनेकांना संसर्ग होण्याची भीती कलावंत व्यक्त करत आहेत.

.............