शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जगावे की मरावे हाच एकच प्रश्न! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. ...

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवत राज्य सरकारने दिशानिर्देशांसह नाट्यप्रयोग करण्याची परवानगी दिली खरी. मात्र, ती परवानगी जीवघेणी ठरत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणारे चार कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने आयोजकांची व कलावंतांची भंबेरी उडाली आहे.

कोरोना संक्रमणामुळे मरण्याआधी नाट्यप्रयोग झाले नाही तर असेच मरण आहे, असली भावविव्हळ वक्तव्ये नाट्यनिर्माता आणि कलावंतांनी यापूर्वी केली होती. त्यांचे हे वक्तव्य अनेकार्थाने सरकारसाठी आत्मक्लेशाचे ठरणार होते. हे पाप सरकारला नको होते म्हणा वा विविध सांस्कृतिक संघटनांचा हेका म्हणा राज्य सरकारने सांस्कृतिक क्षेत्र तब्बल आठ महिन्यानंतर अनलॉक केले आणि भाऊबीजेपासून झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यप्रयोगांना सुरुवात झाली. एका खुर्चीपासून दुसरी खुर्ची सहा फूट अंतरावर ठेवणे, मास्क आग्रहाने घालणे, व्यक्तिश: अंतर पाळणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर नित्यनेमाने करणे आणि महत्त्वाचे म्हणजे २००च्या वर प्रेक्षक नको, अशा मार्गदर्शिका देण्यात आल्या. मात्र, या मार्गदर्शिकांचे उल्लंघन करणे अगदी पहिल्याच प्रयोगापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तब्बल दोन-तीन हजार प्रेक्षकांची गर्दी नाट्यप्रयोगाला उसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच झाडीपट्टी रंगभूमीवरील तीन निर्माते आणि एक कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने खळबळ उडाली आहे. आता या रंगभूमीवरील नाटकांमध्ये काम करणारे ३० ते ४० टक्के कलावंत शहरातून अर्थात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, पुणे, मुंबई येथून असतात. आणि या शहरांमध्ये कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आदळली आहे. येथून येणारे कलावंत थेट रंगभूमीवर उतरत आहेत आणि इतर कलावंतांमध्ये मिसळत आहेत. त्याचे दुष्परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता वाढली आहे.

-------------

बॉक्स....

आरोग्य केंद्राच्या नोटिशी धडकल्या

नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बघून आणि गर्दी प्रचंड वाढत असल्याचे बघून संबंधित तालुक्याच्या आरोग्य केंद्रांनी आयोजकांना धडाघड नोटिशी पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम अनेक नाट्यसंघांचे ठरलेले प्रयोग रद्द झाले आहेत. शहरातील कलावंतांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

----------

बॉक्स...

कुणीच बोलण्यास तयार नाहीत

एरवी आपली मते रोखठोक मांडणारे कलावंत या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही कलावंत आपले मत व्यक्त करत आहेत. सध्या नाटक नकोच करायला. तसेही नाट्यप्रयोग लागत नाहीत. नाट्यप्रयोग झाले नाही तर जगणे अडचणीचे होईल. मात्र, अशा स्थितीत नाट्यप्रयोग झाले तर मरण निश्चित आहे. विशेष म्हणजे, नाट्यप्रयोगामुळे एकापासून अनेकांना संसर्ग होण्याची भीती कलावंत व्यक्त करत आहेत.

.............