शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक सुरू केल्याचा केवळ देखावा

By admin | Updated: April 23, 2016 03:11 IST

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू केल्याचा गवगवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला.

अनिल देशमुख यांचा आरोप : कर्जासाठी टाकल्या जाचक अटीनागपूर : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू केल्याचा गवगवा राज्य सरकारतर्फे करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी आता टाळाटाळ केली जात आहे. ही बँक सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होणार नाही. सरकारने जाचक अटी टाकून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करीत राज्य सरकारवर नेम साधला आहे. देशमुख यांनी म्हटले आहे की, आपण मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडून ३१९ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. यानंतर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. याच निवडणुकीच्या काळात प्रचाराचा मुदा करीत भाजपने सत्तेत येताच नागपूर जिल्हा बँक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्यावर यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र, तब्बल दीड वर्ष लागले. आता ही बँक सुरू झाल्याने आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना मदत होईल असे वाटत होते. मात्र, कर्ज देण्यासाठी जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना कर्ज घेण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे. ज्यांनी यापूर्वीच बँक डबघाईस असताना मदत व्हावी म्हणून कर्ज चुकते केले त्यांना यावर्षी कर्ज देण्यात येणार नाही. यामुळे कर्ज चुकवून शेतकऱ्यांनी गुन्हा केला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांच्यावर आता कर्ज आहे त्यांनी जर पूर्ण कर्ज भरले तर त्यांना नव्याने एक लाख रुपये कर्ज देण्यात येईल. एवढेच नव्हे तर कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रातही वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून कर्ज देण्यास सुरुवात केली असताना आतापर्यंत केवळ १५ लाख रुपयांच्या कर्जाचे तुटपुंजे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँक सुरू झाल्याने आपणास सुलभतेने कर्ज मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. परंतु ही बँक सुरू करून कर्ज न देता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)थकीत कर्ज कसे भरणार?सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाने एक रुपयाचीही मदत केलेली नाही. कापसाला योग्य भाव मिळाला नाही. संत्रा मातीमोल भावाने गेला. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांच्याकडे पुढील हंगामात पेरणीसाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत शेतकरी थकीत कर्ज कसे भरणार, यावर सरकारने विचार केलेला नाही अशी टीकाही देशमुख यांनी केली आहे.