शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

गुंतवणूक कमी केल्यानंतरच कागद उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 10, 2016 03:38 IST

कागद उद्योग संकटात आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासह

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : पेपर ट्रेडर्स असोसिएशनची बैठकनागपूर : कागद उद्योग संकटात आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासह गुणवत्तेत सुधारणा आणि विजेचा खर्च कमी करावा लागेल. या गोष्टी ध्यानात ठेवून उत्पादन केल्यास कागद उद्योगाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. फेडरेशन आॅफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एफपीटीए) नागपूर शाखेतर्फे आयोजित व्यवस्थापकीय समितीची दुसरी बैठक वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी पार पडली. मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. ‘एफपीआयए’चे अध्यक्ष सी. बालासुब्रमणियन अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, सेंच्युरी पल्प अ‍ॅण्ड पेपरचे मुख्य विक्री अधिकारी डॉ. अलोक प्रकाश आणि कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅटचे) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, पूनमचंद मालू होते. यावेळी स्मरणिका आणि एफपीटीएच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. आयातीत कागदाची कमी किंमतगडकरी म्हणाले, आयातीत कागदाची किंमत उत्पादन किमतीपेक्षा कमी आहे. सरकार खुल्या जागेवर उद्योजकांना झाडे लावण्याची परवानगी देण्याच्या विचारात आहे. त्याचा उपयोग कागद उद्योगांना होणार आहे. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारतात पाण्याच्या माध्यमातून केवळ ३.५ टक्के उत्पादनांची वाहतूक केली जाते. हे प्रमाण अन्य देशात ३० टक्के आहे. या माध्यमातून वाहतूक वाढविण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या कागदाच्या उत्पादनासाठी उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग आणि पर्यावरणाच्या हितार्थ टाकाऊ कागदाचा योग्यपणे निपटारा करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. प्रवीण दटके यांनी नागपुरातील कागद उद्योग आणि प्रिटिंगचा इतिहास सांगितला. हा व्यवसाय हळूहळू कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली ‘एफपीटीए’चे अध्यक्ष सी. बालासुब्रमणियन यांनी असोसिएशनची स्थापना आणि महत्त्व सांगितले. विदेशाच्या तुलनेत कागद उद्योग उत्तम असल्याचे म्हणाले. बी. सी. भरतीया म्हणाले, उद्योजकांच्या हितासाठी सरकारने अनेक कायदे तयार केले असून त्याची माहिती नाही. कायद्याची माहिती करून घ्यावी. डॉ. आलोक प्रकाश म्हणाले, उद्योजकांनी उत्पादन आणि गुणवत्तेसह सेवेवर विशेष लक्ष द्यावे. बाजारपेठांच्या मागणीनुसार व्यवसाय टिकून राहतो, यावर त्यांनी सोदाहरण माहिती दिली. मूल्यवर्धित सेवेची गरज असल्याचे सांगितले. ‘एफपीटीए’चे माजी अध्यक्ष महेश खंडेलवाल यांनी नागपुरात या उद्योगाच्या वाढीची शक्यता व्यक्त केली. नागपुरात अनेक महत्त्वपूर्ण कंपन्या आणि संस्था सुरू होत आहेत. अशा स्थितीत या उद्योगाचे भविष्य उज्ज्वल आहे. (प्रतिनिधी)असोसिएशनचे पदाधिकारीयावेळी पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष सुशील अग्रवाल, सचिव पीयूष फत्तेपुरीया, उपाध्यक्ष आल्हाद शास्त्री, कोषाध्यक्ष संजय कौशिक, सहसचिव राम खुबचंदानी, माजी अध्यक्ष मनोज बिर्ला, व्यवस्थापकीय समिती सदस्य विजय खंडेलवाल, असीम बोरडिया, राजेश आर. खंडेलवाल, गिरीश झुनझुनवाला, ललित सूद, अमर ग्यानचंदानी, आशिष पी. खंडेलवाल, विमल केयाल, नीरज खंडेलवाल, ओमप्रकाश मुद्रा, सतीश आहुजा, असीम बोरडिया, सुधीर जैन, सुनील गोयंका, जयप्रकाश अग्रवाल, निर्मल कोहाळ आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.