शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ८ राज्यात १०० टक्के ग्रामीण कुटुंबाकडे वैयक्तिक नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 08:10 IST

Nagpur News जलजीवन मिशनच्या आकडेवारीनुसार १० काेटी ४४ लाख ५ हजार ६५२ कुटुंबापर्यंत कनेक्शन पाेहोचले असून ७ काेटी २० लक्ष ४२ हजार कुटुंब अजूनही यापासून दूर आहेत.

ठळक मुद्दे पाणीपुरवठ्याचा स्तर सुधारल्याचा जलशक्ती मंत्रालयाचा दावा

निशांत वानखेडे

नागपूर : देशातील ३६ पैकी केवळ ८ राज्ये ९० ते १०० टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत वैयक्तिक नळ कनेक्शन पाेहोचविण्यात यशस्वी ठरले आहेत. ३१ मे २०२२ पर्यंत देशातील ५४.५२ टक्के कुटुंबापर्यंत वैयक्तिक किंवा परिसरात नळ कनेक्शन पाेहोचले आहे. जलजीवन मिशनच्या आकडेवारीनुसार १० काेटी ४४ लाख ५ हजार ६५२ कुटुंबापर्यंत कनेक्शन पाेहोचले असून ७ काेटी २० लक्ष ४२ हजार कुटुंब अजूनही यापासून दूर आहेत.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन फंड आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने (डीडीडब्ल्यूएस) तसेच जलशक्ती मंत्रालयाशी निगडित चार संस्थांच्या आकड्यांवरून हा अहवाल सादर केला आहे. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचे १०० टक्के नळ कनेक्शन पाेहोचविणाऱ्या राज्यामध्ये गाेवा, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, व पुदुचेरी, अंदमान निकाेबार, दादरा नगर हवेली व दमन दिव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तर पंजाब (९९.९३), हिमाचल प्रदेश (९५.८८), बिहार (९५.६७) हे राज्य टाॅप टेनमध्ये आहेत. ७१.४६ टक्के कुटुंबासह महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. सर्वात वाईट स्थिती असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (१९.६४), झारखंड (२४.५०), छत्तीसगड (३१.५९), राजस्थान (२८.४२), पश्चिम बंगाल (३१.०६)व आसाम (३९.३७) राज्यांचा समावेश आहे.

दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाने १० वर्षांत ग्रामीण भारतात पिण्याचे पाणीपुरवठ्याचा स्तर सुधारल्याचा दावा केला आहे. यानुसार ८९ टक्के ग्रामीणांपर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा पाेहोचल्याचा आणि ५० टक्के अधिक कुटुंबांपर्यंत सुधारलेल्या स्रोताद्वारे पाणीपुरवठा हाेत आहे. डीडीडब्ल्यूएस २०११ ते २०१८ पर्यंत तुलनात्मक अहवाल सादर करण्यात आला आहे. याअंतर्गत २०११ साली ग्रामीण भारतातील २७ टक्के कुटुंबापर्यंतच शुद्ध स्रोतांद्वारे पिण्याचे पाणी पाेहचले हाेते. ३५ टक्के कुटुंबाना जवळच्या स्रोतांवर पाणी मिळत हाेते तर ७१ टक्के कुटुंबांच्या घरापर्यंत नळ कनेक्शन पाेहोचले हाेते. २०१८ पर्यंत ५६ टक्के कुटुंबांना शुद्ध स्त्राेतांद्वारे पुरवठा हाेत आहे. ५८ टक्के कुटुंबाच्या जवळपास तर ९४.५ टक्के कुटुंबांच्या घरापर्यंत नळ कनेक्शन पाेहोचले आहेत.

मंत्रालयाच्या अहवालातील इतर मुख्य बिंदू

- २०२१ पर्यंत २३ राज्यातील ९० टक्के ग्रामीण लाेकसंख्या शुद्ध पाण्याच्या स्राेतांशी जाेडले. महाराष्ट्रात ८९ टक्के.

- २०१८ पर्यंत ७० टक्के ग्रामीण कुटुंबांना सुधारित स्राेतांशी जाेडले.

- केवळ ७ राज्यात ७० टक्के कुटुंबांपर्यंत शुद्धा स्राेतांचे वैयक्तिक कनेक्शन.

- २०२१-२२ दरम्यान ५५० हजार गावांमधून पाण्याचे नमुने घेतले. ७७.५ टक्के नमुने प्रयाेगशाळेत तपासले. त्यातील ११ टक्के नमुने प्रदूषित आढळले. मात्र प्रदूषणाचे डिटेल नाहीत.

युएनच्या शंका व सूचना

युनायटेड नेशनसने जलस्राेतांच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली आहे. मंत्रालयाच्या अहवालात स्राेत आणि गुणवत्तेच्या तपासणीबाबत सविस्तर माहिती नसल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालात इंडिकेटर्सची माहिती आणि मानक शब्दावलीचा वापर करणे, सर्व गुणवत्ता संकेतांकाचा वापर करून सर्वेक्षण करणे, स्मार्ट माॅनिटरिंग सिस्टिमद्वारे देशातील सर्व गावांचे सर्वेक्षण करणे, स्राेतांची जलगुणवत्ता तपासण्यासाठी कॉम्प्युटर वाॅटर क्वालिटी इंडेक्सचा उपयाेग करण्यासारख्या अनेक सूचना संघटनेने दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी