शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

केवळ ८ राज्यात १०० टक्के ग्रामीण कुटुंबाकडे वैयक्तिक नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 08:10 IST

Nagpur News जलजीवन मिशनच्या आकडेवारीनुसार १० काेटी ४४ लाख ५ हजार ६५२ कुटुंबापर्यंत कनेक्शन पाेहोचले असून ७ काेटी २० लक्ष ४२ हजार कुटुंब अजूनही यापासून दूर आहेत.

ठळक मुद्दे पाणीपुरवठ्याचा स्तर सुधारल्याचा जलशक्ती मंत्रालयाचा दावा

निशांत वानखेडे

नागपूर : देशातील ३६ पैकी केवळ ८ राज्ये ९० ते १०० टक्के ग्रामीण कुटुंबांपर्यंत वैयक्तिक नळ कनेक्शन पाेहोचविण्यात यशस्वी ठरले आहेत. ३१ मे २०२२ पर्यंत देशातील ५४.५२ टक्के कुटुंबापर्यंत वैयक्तिक किंवा परिसरात नळ कनेक्शन पाेहोचले आहे. जलजीवन मिशनच्या आकडेवारीनुसार १० काेटी ४४ लाख ५ हजार ६५२ कुटुंबापर्यंत कनेक्शन पाेहोचले असून ७ काेटी २० लक्ष ४२ हजार कुटुंब अजूनही यापासून दूर आहेत.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन फंड आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने (डीडीडब्ल्यूएस) तसेच जलशक्ती मंत्रालयाशी निगडित चार संस्थांच्या आकड्यांवरून हा अहवाल सादर केला आहे. ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचे १०० टक्के नळ कनेक्शन पाेहोचविणाऱ्या राज्यामध्ये गाेवा, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, व पुदुचेरी, अंदमान निकाेबार, दादरा नगर हवेली व दमन दिव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तर पंजाब (९९.९३), हिमाचल प्रदेश (९५.८८), बिहार (९५.६७) हे राज्य टाॅप टेनमध्ये आहेत. ७१.४६ टक्के कुटुंबासह महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे. सर्वात वाईट स्थिती असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (१९.६४), झारखंड (२४.५०), छत्तीसगड (३१.५९), राजस्थान (२८.४२), पश्चिम बंगाल (३१.०६)व आसाम (३९.३७) राज्यांचा समावेश आहे.

दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाने १० वर्षांत ग्रामीण भारतात पिण्याचे पाणीपुरवठ्याचा स्तर सुधारल्याचा दावा केला आहे. यानुसार ८९ टक्के ग्रामीणांपर्यंत पिण्याच्या पाण्याची सुविधा पाेहोचल्याचा आणि ५० टक्के अधिक कुटुंबांपर्यंत सुधारलेल्या स्रोताद्वारे पाणीपुरवठा हाेत आहे. डीडीडब्ल्यूएस २०११ ते २०१८ पर्यंत तुलनात्मक अहवाल सादर करण्यात आला आहे. याअंतर्गत २०११ साली ग्रामीण भारतातील २७ टक्के कुटुंबापर्यंतच शुद्ध स्रोतांद्वारे पिण्याचे पाणी पाेहचले हाेते. ३५ टक्के कुटुंबाना जवळच्या स्रोतांवर पाणी मिळत हाेते तर ७१ टक्के कुटुंबांच्या घरापर्यंत नळ कनेक्शन पाेहोचले हाेते. २०१८ पर्यंत ५६ टक्के कुटुंबांना शुद्ध स्त्राेतांद्वारे पुरवठा हाेत आहे. ५८ टक्के कुटुंबाच्या जवळपास तर ९४.५ टक्के कुटुंबांच्या घरापर्यंत नळ कनेक्शन पाेहोचले आहेत.

मंत्रालयाच्या अहवालातील इतर मुख्य बिंदू

- २०२१ पर्यंत २३ राज्यातील ९० टक्के ग्रामीण लाेकसंख्या शुद्ध पाण्याच्या स्राेतांशी जाेडले. महाराष्ट्रात ८९ टक्के.

- २०१८ पर्यंत ७० टक्के ग्रामीण कुटुंबांना सुधारित स्राेतांशी जाेडले.

- केवळ ७ राज्यात ७० टक्के कुटुंबांपर्यंत शुद्धा स्राेतांचे वैयक्तिक कनेक्शन.

- २०२१-२२ दरम्यान ५५० हजार गावांमधून पाण्याचे नमुने घेतले. ७७.५ टक्के नमुने प्रयाेगशाळेत तपासले. त्यातील ११ टक्के नमुने प्रदूषित आढळले. मात्र प्रदूषणाचे डिटेल नाहीत.

युएनच्या शंका व सूचना

युनायटेड नेशनसने जलस्राेतांच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली आहे. मंत्रालयाच्या अहवालात स्राेत आणि गुणवत्तेच्या तपासणीबाबत सविस्तर माहिती नसल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालात इंडिकेटर्सची माहिती आणि मानक शब्दावलीचा वापर करणे, सर्व गुणवत्ता संकेतांकाचा वापर करून सर्वेक्षण करणे, स्मार्ट माॅनिटरिंग सिस्टिमद्वारे देशातील सर्व गावांचे सर्वेक्षण करणे, स्राेतांची जलगुणवत्ता तपासण्यासाठी कॉम्प्युटर वाॅटर क्वालिटी इंडेक्सचा उपयाेग करण्यासारख्या अनेक सूचना संघटनेने दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी