शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ४० टक्केच औषध साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 10:08 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला लागलेल्या आगीच्या घटनेने औषध बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देऔषध बाजार बंदचा फटकारुग्ण अडचणीत येणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेने ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन दिवस बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून बाजार पूर्ववत न झाल्यास रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.शहरच नाही तर संपूर्ण विदर्भाला औषधांचा पुरवठा करणारे नागपुरात ३०० हून अधिक ठोक विक्रेते आहेत. गांधीबाग येथे १५० तर संदेश औषध बाजारातही एवढीच दुकाने आहेत. गुरुवारी रात्री संदेश औषध बाजाराला लागलेल्या भीषण आगीत बहुसंख्य दुकानांना झळ पोहोचली. सुमारे दीडशे कोटींची औषधे आगीत नष्ट झाल्याचे बोलले जाते. या घटनेवर ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवारपासून संदेशसोबतच गांधीबाग औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या ठोक विक्रेत्यांकडूनच किरकोळ औषधी दुकानांना सामान्यसोबतच महागडी औषधे वेळेवर उपलब्ध होत होती. परंतु तीन दिवस संदेश बाजार बंद असल्याने याचा फटका या दुकानांसोबतच रुग्णांना बसत आहे. धंतोली, रामदासपेठ व वर्धा रोडवरील औषध दुकानदाराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. संपूर्ण शहराला संदेश बाजारामधून ७५ टक्क्यांवर औषधांचा पुरवठा व्हायचा. हा बाजारच बंद पडल्याने दुकानात केवळ ४० टक्के व त्यापेक्षाही औषधांचा साठा कमी उरलेला आहे. विशेषत: जी दुकाने चार-पाच स्ट्रीप्ससाठी या बाजाराला फोन करून आॅर्डर द्यायचे, ते अडचणीत आले आहेत. सोमवारपासून हा औषधांचा बाजार सुरू न झाल्यास परिस्थिती कठीण होईल, असेही ते म्हणाले.

रविवारी वाढली रुग्णांची धावाधावरविवारी शहरातील अनेक औषधांची दुकाने बंद असतात. वर्धा रोड, धंतोली व इतर काही ठिकाणी मोजकीच दुकाने सुरू राहतात. यातच तीन दिवसांपासून औषध बाजार बंद असल्याने एकाच दुकानात सर्वच प्रकारच्या औषधी मिळणे कठीण झाले होते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर धावाधाव करण्याची वेळ आली होती.

काही दुकाने सुरू करण्याचा प्रयत्नसंदेश औषधांचा बाजारातील ज्या दुकानांना आगीची झळ पोहचली नाही, ती सोमवारपासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विजेसाठी जनरेटरची व्यवस्था केली जाणार आहे. अग्निशमन विभागाची मंजुरी मिळाल्यावरच दुकाने सुरू करता येणार आहे. मात्र,सोमवारीच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. औषधांचा तुटवडा पडणार नाही, यासाठी असोसिएशन पूर्ण प्रयत्न करीत आहे.- राजेंद्र कावलकर, अध्यक्ष, नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन

टॅग्स :medicineऔषधं