शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:08 IST

Books Nagpur News टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत.

ठळक मुद्देमोबाईल वाढेल का वाचनसंस्कृती?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रत्येकच व्यवहारात सरसकट ऑनलाईनचे प्रचलन वाढते आहे. मात्र, त्यात पुस्तकांचे स्थान काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत.

वाचनसंस्कृतीच्या बाबतीत ती कधीचीच रसातळाला गेली, असा आरोप होतो. टाळेबंदीत अनेकांनी फ्रस्ट्रेशन घालविण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला. मात्र, तशी तथ्यात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. कारण, मनोरंजनाचे अनेक पर्याय पूर्वी होतेच आणि नंतरही असणारच आहेत. अशा स्थितीत पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय अखेरच्या घटका मोजत असल्याचे सांगितले जाते. अनेक प्रकाशन संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, काळानुसार मोबाईल टेक्नोसॅव्ही काळाच्या जवळ जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. मात्र, हा मार्ग प्रकाशन संस्थांना तारेल का, असा प्रश्न आहे.

वाचन जागर अभियान

वाचन संस्कृतीवर आलेली मरगळ बघता आणि प्रकाशन संस्थांची बिकट स्थिती बघता राज्यातील प्रमुख दहा प्रकाशन संस्थांनी एकत्रित येत ‘वाचन जागर अभियान’ राबवले आहे. १ ते २५ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून, राज्यातील ३२ ठिकाणी २५ टक्के सवलतीने ही पुस्तके उपलब्ध होणार आहेत. यात राजहंस, मनोविकास, मेहता, मॅजेस्टिक, ज्योत्स्ना, साधना, पद्मगंधा, रोहण, डायमंड, साकेत या दहा प्रकाशन संस्थांच्या प्रत्येकी २५ पुस्तकांचा समावेश आहे.

चिंता रोजगाराची, पुस्तके काय वाचणार? - अरविंद पाटणकर

खरे सांगायचे तर सुरुवातीला ऑनलाईन पुस्तके मागवण्याचे प्रचलन नाहीच्या बरोबर होते. टाळेबंदीत दुकाने बंद असल्याने ऑनलाईन पुस्तके मागवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्या काळात तेही शक्य नव्हते. नंतर रोजगाराची चिंता निर्माण झाली आणि तेव्हा वाचनात कुणाचे मन रमत असेल, असे वाटत नाही. आभासी माध्यमाद्वारे काही पुस्तकांचे प्रकाशन झाले आणि विक्रीलाही उपलब्ध आहेत. मात्र, दिवाळीनंतर सर्व मार्केट ओपन झाल्यावरच काय ती आशा बळावेल. यामुळे मात्र, प्रकाशकांचे सगळेच काम थांबल्याचे मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटणकर यांनी सांगितले.

ऑनलाईन पुस्तके वाचणेच मुळात बेकायदेशीर - नरेश सब्जीवाले

ऑनलाईन पुस्तके वाचणे, हे बेकायदेशीर आहे. एखाद्याला पुस्तकाची पीडीएफ कॉपी पाठवली तर तो आणखी अनेकांना ती पाठवतो. अशाने प्रकाशकांचा व्यवसाय चौपट होईल. त्यामुळे असा पर्याय प्रकाशक देणार नाहीत. शिवाय ऑनलाईन वाचन हे मर्यादित आहे. पुस्तकांची जागा ही व्यवस्था घेऊ शकत नाही. त्यामुळे, अनेकांचे वाचन अर्धेच असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे मोबाईल किंवा ई-बुकद्वारे काहीसे शुल्क आकारून तसा पर्याय देण्यावर आम्ही प्रयत्न करतो आहोत. काही दिवसांसाठी ते पुस्तक टॅग करून ठेवल्यावर त्यांना पुस्तक खरेदी करण्याचा पर्याय असतो. तेव्हा ऑनलाईन विक्री केली जात असल्याचे राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Mobileमोबाइल