शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनिवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

ऑनलाईन व्यवहारात, ग्रंथांचे स्थान काय? प्रकाशनसंस्थांनी घेतला धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 11:08 IST

Books Nagpur News टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत.

ठळक मुद्देमोबाईल वाढेल का वाचनसंस्कृती?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रत्येकच व्यवहारात सरसकट ऑनलाईनचे प्रचलन वाढते आहे. मात्र, त्यात पुस्तकांचे स्थान काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाळेबंदीपूर्वीही ऑनलाईन पुस्तके मागवण्यात कुचराई होती, तशीच स्थिती टाळेबंदी आणि अनलॉकनंतरही असल्याचे प्रकाशक सांगत आहेत.

वाचनसंस्कृतीच्या बाबतीत ती कधीचीच रसातळाला गेली, असा आरोप होतो. टाळेबंदीत अनेकांनी फ्रस्ट्रेशन घालविण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला. मात्र, तशी तथ्यात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. कारण, मनोरंजनाचे अनेक पर्याय पूर्वी होतेच आणि नंतरही असणारच आहेत. अशा स्थितीत पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय अखेरच्या घटका मोजत असल्याचे सांगितले जाते. अनेक प्रकाशन संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, काळानुसार मोबाईल टेक्नोसॅव्ही काळाच्या जवळ जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. मात्र, हा मार्ग प्रकाशन संस्थांना तारेल का, असा प्रश्न आहे.

वाचन जागर अभियान

वाचन संस्कृतीवर आलेली मरगळ बघता आणि प्रकाशन संस्थांची बिकट स्थिती बघता राज्यातील प्रमुख दहा प्रकाशन संस्थांनी एकत्रित येत ‘वाचन जागर अभियान’ राबवले आहे. १ ते २५ नोव्हेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून, राज्यातील ३२ ठिकाणी २५ टक्के सवलतीने ही पुस्तके उपलब्ध होणार आहेत. यात राजहंस, मनोविकास, मेहता, मॅजेस्टिक, ज्योत्स्ना, साधना, पद्मगंधा, रोहण, डायमंड, साकेत या दहा प्रकाशन संस्थांच्या प्रत्येकी २५ पुस्तकांचा समावेश आहे.

चिंता रोजगाराची, पुस्तके काय वाचणार? - अरविंद पाटणकर

खरे सांगायचे तर सुरुवातीला ऑनलाईन पुस्तके मागवण्याचे प्रचलन नाहीच्या बरोबर होते. टाळेबंदीत दुकाने बंद असल्याने ऑनलाईन पुस्तके मागवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्या काळात तेही शक्य नव्हते. नंतर रोजगाराची चिंता निर्माण झाली आणि तेव्हा वाचनात कुणाचे मन रमत असेल, असे वाटत नाही. आभासी माध्यमाद्वारे काही पुस्तकांचे प्रकाशन झाले आणि विक्रीलाही उपलब्ध आहेत. मात्र, दिवाळीनंतर सर्व मार्केट ओपन झाल्यावरच काय ती आशा बळावेल. यामुळे मात्र, प्रकाशकांचे सगळेच काम थांबल्याचे मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटणकर यांनी सांगितले.

ऑनलाईन पुस्तके वाचणेच मुळात बेकायदेशीर - नरेश सब्जीवाले

ऑनलाईन पुस्तके वाचणे, हे बेकायदेशीर आहे. एखाद्याला पुस्तकाची पीडीएफ कॉपी पाठवली तर तो आणखी अनेकांना ती पाठवतो. अशाने प्रकाशकांचा व्यवसाय चौपट होईल. त्यामुळे असा पर्याय प्रकाशक देणार नाहीत. शिवाय ऑनलाईन वाचन हे मर्यादित आहे. पुस्तकांची जागा ही व्यवस्था घेऊ शकत नाही. त्यामुळे, अनेकांचे वाचन अर्धेच असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे मोबाईल किंवा ई-बुकद्वारे काहीसे शुल्क आकारून तसा पर्याय देण्यावर आम्ही प्रयत्न करतो आहोत. काही दिवसांसाठी ते पुस्तक टॅग करून ठेवल्यावर त्यांना पुस्तक खरेदी करण्याचा पर्याय असतो. तेव्हा ऑनलाईन विक्री केली जात असल्याचे राजहंस प्रकाशनचे नरेश सब्जीवाले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Mobileमोबाइल