शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

ग्रामीण भागातील शिक्षणाची ऑनलाईन सत्यस्थिती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 13:33 IST

Nagpur News ऑनलाईन प्रक्रिया म्हटले की अँड्रॉइड मोबाइल आले, रेंज आली, व अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पालकांची परिस्थिती आली.

 लोकमत न्यूज नेटवर्क आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते ते तितकेच खरे आहे . जागतिक स्तरावर औद्योगिक क्रांती ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  होत आहे . जगावर कोविड—१९ चे सावट आले तसेच ते भारतावर सुद्धा आले. यामध्ये  खरी तंत्रज्ञानाची किती गरज आज आहे याची जाणीव सर्वांना झाली. त्यामध्ये शिक्षण क्षेत्र सुद्धा कसे सुटणार? शिक्षण क्षेत्रामध्ये ऑफलाईन शिक्षणाला अत्यंत महत्व आहे.  

ऑनलाईन प्रक्रियाही शिक्षण प्रक्रियेला पूरक म्हणून ठरवू शकते . परंतु सर्वस्वी ठरेल असे नाही. कोविड १९ चा हाहाकार सर्व जगभर निर्माण झाल्याने जगभर लॉक डाऊन लागले. यात शिक्षण प्रक्रिया थांबू नये म्हणून ऑनलाईन ह्या पूरक अध्ययन प्रक्रियेला महत्व देण्यात आले.  हे चालू असतानाच ग्रामीण भागातील मात्र वास्तविक ऑनलाईन शिक्षणाची सद्यस्थिती ही वेगळी आढळून आली. ऑनलाईन प्रक्रिया म्हटले की अँड्रॉइड मोबाइल आले, रेंज आली, व अँड्रॉइड मोबाईल घेण्यासाठी पालकांची परिस्थिती आली. अँड्रॉइड मोबाईल चे ज्ञान आले व मुलांना ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेची जाणीव ग्रामीण भागात किती आहे हेही आले.

ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करत असताना शेतीची कामे इतर कामे ही आली, रिचार्ज भरण्यासाठी पैसा आला. अशा अनेक संकटात ग्रामीण भागातील पालकांची परिस्थिती होती. अशाही परिस्थितीत एका छोट्याशा  खेड्यातील तांड्यात आम्ही प्राथमिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया करिता व्हाॅट्सअप ग्रुप तयार करुन शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.

काही दिवस प्रतिसाद मिळाला. परंतु हळूहळू मात्र पालक व विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी पठार अवस्था येत होती. अशाही परिस्थितीत आम्ही शिक्षक वारंवार प्रयत्न करतच होतो. गावात रेंज नाही , शेतात जावे लागते, मजुरीला जावे लागते, मोबाईल रिचार्ज मारण्यासाठी पैसे नाहीत अशा पालकांच्या तक्रारी येऊ लागल्या तर काही पालकांनी आमचे पाल्य हेडफोन लावून अभ्यास सोडून  कार्टून्स,गेम्स व म्युझिक मध्ये दंग राहात असल्याने मुले वेगळ्या वळणाला जात आहे. अशा तक्रारीसह अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते.

अशा अनेक अडचणी आल्या व येत असल्याने आॅफलाइन शाळा सुरु करा असा  आग्रह पालकांचा आहे. यावरुन  ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेची परिस्थिती लक्षात येत असून ही सत्य परिस्थिती नाकारून  चालणार नाही. हे आम्ही  अनुभवले.

सगळीकडे तंत्रज्ञानाचा गवगवा असताना ग्रामीण भागामध्ये मात्र या तंत्रज्ञानापासून आपण खरंच किठी लांब आहोत? हे दिसून येते. हे सर्व बघून पुन्हा जोमाने काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते .आलेल्या अडचणीवर मात करून शिक्षण प्रक्रिया पुन्हा कोविड १९च्या काळात सर्व दक्षता घेऊन आॅफलाइन पद्धतीने जोमाने सुरु करावी असे मनस्वी वाटते.

भविष्यात गावोगावी इंटरनेटची उपलब्धता करुन देऊन विद्यार्थ्यांकरीता कमीत कमी किंमतीचे स्मार्ट फोन,टॅब व कमीत —कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध करुन दिल्यास तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने शिक्षणात उंच भरारी घेतील यात तिळमात्र शंका नाही.  ऑफलाइन पद्धतीला  ऑनलाईन शिक्षणाची जोड दिली तर  ग्रामीण भागातील विद्यार्थी  शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकतील. अशी अपेक्षा बाळगू या .

➡ साहेबराव आत्माराम राठोडसहाय्यक शिक्षक जि.प.प्राथ.शाळा,वडसद(तांडा) पं.स.पुसद जि.यवतमाळ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र