शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:47 IST

सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत.

ठळक मुद्देमध्यम व हलक्या दर्जाची जास्त आवकआणखी भाव कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवड्यापासून कांदे शेतातून मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात येत असून राज्यातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जात आहेत. पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, औरंगाबाद येथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे भाव २० ते ३० रुपये किलो कमी झाले आहेत. याशिवाय कळमना आलू-कांदे बाजारात पूर्वीपेक्षा आवक वाढल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात हलक्या व मध्यम दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ५५ रुपयादरम्यान आहेत.

उत्तम प्रतीचे १० टक्के तर मध्यम व हलक्या दर्जाची ९० टक्के आवककळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कळमन्यात सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून आवक वाढल्यामुळे भाव प्रति किलो २० ते ३० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांनी खरेदी कमी केल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून कांद्याची उचल कमी आहे. त्याचाही परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. कळमन्यात दररोज २० ते २२ ट्रकची आवक आहे. त्यात उत्तम प्रतीचा कांदा केवळ १० टक्के येत आहे. उर्वरित कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. भाव जास्त मिळत असल्यामुळे शेतकरी रात्री कांदा शेतातून काढून थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. चार दिवसांपासून सोलापूर बाजारात एकाच दिवशी ४०० ट्रक आले होते.एवढेच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातील बहुतांश कांदे खराब झाले. पुढे आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे.

कळमन्यात दररोज २० ट्रकची आवकवसानी म्हणाले, आवक वाढली, पण लोकांची खरेदीची क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. पूर्वी लागवड केलेले कांदे पावसाने खराब झाले. नंतरच्या लागवडीचे कांदे काही दिवसात बाजारात येणार आहे. त्याचा दर्जा चांगला राहील. शिवाय भावही कमी राहण्याची शक्यता आहे. इराण, इजिप्त आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. मुंबई बंदरात आवक वाढली आहे. सध्या औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि अहमदनगर येथून कांद्याची आवक आहे. भाव कमी झाल्यामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून आवक बंद झाली आहे.नंदनवन आठवडी बाजारातील कांदे विक्रेते दिलीप लिल्हारे म्हणाले, गेल्या आठवड्यात जास्त भावामुळे ग्राहकांनी कांदे खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे १५०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कळमन्यातून खरेदी केलेल्या कांद्याला ग्राहक न मिळाल्यामुळे कांदे खराब झाले. अखेर फेकावे लागले. भाव स्थिर होईपर्यंत कांद्याऐवजी अन्य भाज्यांची विक्री सुरू केली आहे.बटाटे महागपावसाचा फटका बटाटे पिकाला फटका बसल्यामुळे आवक कमी झाली. परिणाम भाव वाढले आहेत. कळमन्यात १८ ते २० रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ३० रुपये भावाने विक्री होत आहे. छिंदवाडा येथून नवीन मालाची आवक आहे, शिवाय जुन्या बटाट्याची विक्री सुरू आहे. अलाहाबाद, कानपूर आणि उत्तर प्रदेशातील काही भागातून बटाट्यांची आवक जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. तोपर्यंत भाव कमी होणार नाहीत, असे वसानी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :onionकांदा