शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा थोडा घसरला; किरकोळमध्ये ६० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 10:47 IST

सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत.

ठळक मुद्देमध्यम व हलक्या दर्जाची जास्त आवकआणखी भाव कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवड्यापासून कांदे शेतातून मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात येत असून राज्यातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी जात आहेत. पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, औरंगाबाद येथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे भाव २० ते ३० रुपये किलो कमी झाले आहेत. याशिवाय कळमना आलू-कांदे बाजारात पूर्वीपेक्षा आवक वाढल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात हलक्या व मध्यम दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ५५ रुपयादरम्यान आहेत.

उत्तम प्रतीचे १० टक्के तर मध्यम व हलक्या दर्जाची ९० टक्के आवककळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कळमन्यात सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याचे भाव ६० ते ६५ रुपये, मध्यम ५० ते ५५ आणि हलक्या दर्जाच्या कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून आवक वाढल्यामुळे भाव प्रति किलो २० ते ३० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांनी खरेदी कमी केल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून कांद्याची उचल कमी आहे. त्याचाही परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. कळमन्यात दररोज २० ते २२ ट्रकची आवक आहे. त्यात उत्तम प्रतीचा कांदा केवळ १० टक्के येत आहे. उर्वरित कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. भाव जास्त मिळत असल्यामुळे शेतकरी रात्री कांदा शेतातून काढून थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. चार दिवसांपासून सोलापूर बाजारात एकाच दिवशी ४०० ट्रक आले होते.एवढेच नव्हे तर देशाच्या सर्वच भागात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातील बहुतांश कांदे खराब झाले. पुढे आवक वाढून भाव कमी होण्याची शक्यता आहे.

कळमन्यात दररोज २० ट्रकची आवकवसानी म्हणाले, आवक वाढली, पण लोकांची खरेदीची क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे. पूर्वी लागवड केलेले कांदे पावसाने खराब झाले. नंतरच्या लागवडीचे कांदे काही दिवसात बाजारात येणार आहे. त्याचा दर्जा चांगला राहील. शिवाय भावही कमी राहण्याची शक्यता आहे. इराण, इजिप्त आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या कांद्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आले आहे. मुंबई बंदरात आवक वाढली आहे. सध्या औरंगाबाद, धुळे, जळगाव आणि अहमदनगर येथून कांद्याची आवक आहे. भाव कमी झाल्यामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथून आवक बंद झाली आहे.नंदनवन आठवडी बाजारातील कांदे विक्रेते दिलीप लिल्हारे म्हणाले, गेल्या आठवड्यात जास्त भावामुळे ग्राहकांनी कांदे खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे १५०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कळमन्यातून खरेदी केलेल्या कांद्याला ग्राहक न मिळाल्यामुळे कांदे खराब झाले. अखेर फेकावे लागले. भाव स्थिर होईपर्यंत कांद्याऐवजी अन्य भाज्यांची विक्री सुरू केली आहे.बटाटे महागपावसाचा फटका बटाटे पिकाला फटका बसल्यामुळे आवक कमी झाली. परिणाम भाव वाढले आहेत. कळमन्यात १८ ते २० रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ३० रुपये भावाने विक्री होत आहे. छिंदवाडा येथून नवीन मालाची आवक आहे, शिवाय जुन्या बटाट्याची विक्री सुरू आहे. अलाहाबाद, कानपूर आणि उत्तर प्रदेशातील काही भागातून बटाट्यांची आवक जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. तोपर्यंत भाव कमी होणार नाहीत, असे वसानी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :onionकांदा