शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

महापालिकेत पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 21:22 IST

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले.

ठळक मुद्दे नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होणार : कमी क्षेत्रामुळे विकासाला चालना मिळेल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने हा निर्णय बदलविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीचे सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सादर केले. हे विधेयक मंजूर होताच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे, हे विशेष. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना केल्यामुळे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र भरपूर मोठे झाले होते. एवढा मोठा भूभाग असल्यामुळे एका टोकावरील नगरसेवकाला दुसऱ्या टोकावरील नागरिकाशी संपर्क साधण्यात, त्याचे प्रश्न सोडविण्यात अडचणी जात होत्या. शिवाय एका प्रभागात चार नगरसेवक असल्यामुळे कामाची जबाबदारी निश्चित होत नव्हती. नगरसेवकांकडून जनतेची कामे करताना टोलवाटोलवी व्हायची.प्रभागातील चारही नगरसेवक एकाच पक्षाचे असतील तर त्यांनी एरियानुसार प्रभाग आपापसात वाटून घेतले होते. मात्र, जेथे एका प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांचे नगरसेवक विजयी झाले आहेत तेथे विकास कामांवरून सातत्याने वाद होत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये उमेदवारासोबतच पक्षाला अधिक महत्त्व मिळत होते. या पद्धतीचा भाजपला राज्यात सर्वत्र फायदाही झाला. पक्षाच्या ताकदीच्या बळावर बहुतांश महापालिका ताब्यात घेण्यात तसेच आपला ग्राफ वाढविण्यात भाजपला यश आले. तेव्हापासूनच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबद्दल अस्वस्थता होती. ही पद्धत रद्द करून जुन्या वॉर्ड पद्धतीच्या धर्तीवर एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात त्या दिशेने पाऊल टाकत सरकारने तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग आहेत. यापैकी एकूण ३७ प्रभागात प्रत्येकी ४ नगरसेवक होते. तर शेवटच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ३ नगरसेवक होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक