शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

महापालिकेत पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 21:22 IST

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले.

ठळक मुद्दे नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होणार : कमी क्षेत्रामुळे विकासाला चालना मिळेल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने हा निर्णय बदलविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीचे सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सादर केले. हे विधेयक मंजूर होताच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे, हे विशेष. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना केल्यामुळे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र भरपूर मोठे झाले होते. एवढा मोठा भूभाग असल्यामुळे एका टोकावरील नगरसेवकाला दुसऱ्या टोकावरील नागरिकाशी संपर्क साधण्यात, त्याचे प्रश्न सोडविण्यात अडचणी जात होत्या. शिवाय एका प्रभागात चार नगरसेवक असल्यामुळे कामाची जबाबदारी निश्चित होत नव्हती. नगरसेवकांकडून जनतेची कामे करताना टोलवाटोलवी व्हायची.प्रभागातील चारही नगरसेवक एकाच पक्षाचे असतील तर त्यांनी एरियानुसार प्रभाग आपापसात वाटून घेतले होते. मात्र, जेथे एका प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांचे नगरसेवक विजयी झाले आहेत तेथे विकास कामांवरून सातत्याने वाद होत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये उमेदवारासोबतच पक्षाला अधिक महत्त्व मिळत होते. या पद्धतीचा भाजपला राज्यात सर्वत्र फायदाही झाला. पक्षाच्या ताकदीच्या बळावर बहुतांश महापालिका ताब्यात घेण्यात तसेच आपला ग्राफ वाढविण्यात भाजपला यश आले. तेव्हापासूनच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबद्दल अस्वस्थता होती. ही पद्धत रद्द करून जुन्या वॉर्ड पद्धतीच्या धर्तीवर एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात त्या दिशेने पाऊल टाकत सरकारने तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग आहेत. यापैकी एकूण ३७ प्रभागात प्रत्येकी ४ नगरसेवक होते. तर शेवटच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ३ नगरसेवक होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक