शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत पुन्हा एक सदस्यीय प्रभाग पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 21:22 IST

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले.

ठळक मुद्दे नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे सोपे होणार : कमी क्षेत्रामुळे विकासाला चालना मिळेल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आता पुन्हा एकदा एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार आहे. यासंबंधीचे सुधारणा विधेयक गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सादर केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने हा निर्णय बदलविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधीचे सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सादर केले. हे विधेयक मंजूर होताच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत एक सदस्यीय प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे, हे विशेष. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार रचना केल्यामुळे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र भरपूर मोठे झाले होते. एवढा मोठा भूभाग असल्यामुळे एका टोकावरील नगरसेवकाला दुसऱ्या टोकावरील नागरिकाशी संपर्क साधण्यात, त्याचे प्रश्न सोडविण्यात अडचणी जात होत्या. शिवाय एका प्रभागात चार नगरसेवक असल्यामुळे कामाची जबाबदारी निश्चित होत नव्हती. नगरसेवकांकडून जनतेची कामे करताना टोलवाटोलवी व्हायची.प्रभागातील चारही नगरसेवक एकाच पक्षाचे असतील तर त्यांनी एरियानुसार प्रभाग आपापसात वाटून घेतले होते. मात्र, जेथे एका प्रभागात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्षांचे नगरसेवक विजयी झाले आहेत तेथे विकास कामांवरून सातत्याने वाद होत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महापालिकेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली होती. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये उमेदवारासोबतच पक्षाला अधिक महत्त्व मिळत होते. या पद्धतीचा भाजपला राज्यात सर्वत्र फायदाही झाला. पक्षाच्या ताकदीच्या बळावर बहुतांश महापालिका ताब्यात घेण्यात तसेच आपला ग्राफ वाढविण्यात भाजपला यश आले. तेव्हापासूनच काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबद्दल अस्वस्थता होती. ही पद्धत रद्द करून जुन्या वॉर्ड पद्धतीच्या धर्तीवर एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात त्या दिशेने पाऊल टाकत सरकारने तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग आहेत. यापैकी एकूण ३७ प्रभागात प्रत्येकी ४ नगरसेवक होते. तर शेवटच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ३ नगरसेवक होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक