शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

डंपिंग यार्डवर पोहचणार शंभर टक्के वेगवेगळा ओला व सुका कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 19:58 IST

Nagpur News स्वच्छ भारत अभियानात माघारल्यानंतर अखेर मनपाची झोप उडाली आहे. याअंतर्गत कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करून ओला व सुका कचरा भांडेवाडी येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देस्वच्छता रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न

नागपूर : स्वच्छ भारत अभियानात माघारल्यानंतर अखेर मनपाची झोप उडाली आहे. याअंतर्गत कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करून ओला व सुका कचरा भांडेवाडी येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ७० टक्के कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. भांडेवाडी येथे ओला व सुका कचरा वेगवेगळा पोहचविण्यासाठी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना आवश्यक दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहे.

शहरात दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. यात ५५० मेट्रिक टन ओला व ४०० मेट्रिक टन सुका कचरा असतो. तर १५० टन कचरा संमिश्र असतो. बांधकाम साहित्यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी लवकरच नवीन कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यासाठी घनकचरा विभाग कामाला लागला आहे. काही दिवसांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दोन्ही कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत.

जनजागृतीसाठी स्मार्ट टीम

शहरातील नागरिकांत जनजागृती करण्यासाठी ५०० सफाई कर्मचाऱ्यांची स्मार्ट टीम गठित करण्यात आली आहे. या पथकाद्वारे शहरातील ३८ प्रभागात कचरा वेगवेगळा संकलित करण्याबाबत जनजागृती करून याचे फायदे सांगत आहे. चार पथकांवर नियंत्रणासाठी एक स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे.

स्वच्छतेला प्राधान्य

स्वच्छतेत नागपूर शहराचे रँकिंग सुधारण्यासाठी व नागरिकांत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी आवश्यक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. शंभर टक्के ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आल्याची माहिती मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

- घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा संकलन कंपन्यांना आवश्यक दिशा-निर्देश जारी केले.

- सध्या भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे ७० टक्के वर्गीकृत कचरा आणला जातो.

-शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न