शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नागपुरात लोकसहभागातून एक घर, दोन वृक्ष मोहीम : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 21:13 IST

यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९८ लाख ३९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत सभागृहात ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनरेगा आयुक्त ए.एस.आर. नायक, प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, प्रधान मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, जिल्हा वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, उपायुक्त के.एन.के. राव तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.ज्या विभागांकडे वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध नाही अशा सर्व विभागांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वृक्षारोपण करताना सार्वजनिक ठिकाणी वृक्षाचे संगोपन व्हावे, यासाठी ट्री-गार्डचा वापर बंधनकारक करण्यात यावा. वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीसंंबंधीची संपूर्ण माहिती वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच वृक्षारोपणासंबंधी व्हिडिओग्राफी करून ती सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करावे.सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी वृक्षारोपण मोहिमेचा विभागनिहाय आढावा घेताना या मोहिमेसाठी विभागांनी केलेले नियोजन तसेच ऑनलाईन सादर केलेली माहिती याचा आढावा घेतला, जिल्ह्यातील खासगी शाळा-महाविद्यालये यांनाही वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट देऊन त्यानुसार या मोहिमेत जास्तीतजास्त वृक्षांची लागवड होईल, यादृष्टीने विभागप्रमुखांना सूचना दिल्या.मोहिमेतील प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंगवृक्षारोपण मोहीम यशस्वी करताना प्रत्येक लावलेल्या रोपट्याचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी संबंधित विभागांकडे राहणार असून, प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. मागील वर्षी जिल्ह्यात १५ लाख ८५ हजार ८८२ झाडे लावण्यात आली असून, त्यापैकी १३ लाख १५ हजार ४६३ झाडे जिवंत असून, सरासरी ८३ टक्के झाडे जिवंत आहेत. याच पद्धतीने या मोहिमेतही वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देऊन प्रत्येक लावलेले झाड जिवंत राहील यादृष्टीने नियोजन करावे,असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.असे आहे नियोजनवृक्षारोपण मोहिमेचे संपूर्ण नियोजन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात आले आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी विविध नर्सरीमार्फत वृक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षारोपण मोहिमेसाठी आतापर्यंत ६८ लाख २६ हजार खड्डे पूर्ण झाले आहेत. वृक्षारोपण मोहीम जिल्ह्यातील ७ हजार ६०६ ठिकाणी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नद्या व उपनद्यांच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात येणार आहेत. यामध्ये कन्हान, पेंच, वैनगंगा व वर्धा नदीच्या सुमारे ३२७ किलोमीटर लांबीच्या परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या झाडांची उपलब्धता व्हावी, यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण तसेच एफडीसीएम यांच्याकडे ७० रोपवाटिकेत ४० लाख ५३ हजार वृक्ष उपलब्ध आहेत. तसेच जिल्ह्यात मागील वर्षी तयार केलेले ३४ लाख ५ हजार वृक्ष असे एकूण ७५ लाख वृक्ष या मोहिमेसाठी उपलब्ध आहेत.

  • प्रादेशिक वन विभाग २६ लाख ६२ हजार वृक्ष लावणार
  • सामाजिक वनीकरण विभाग १५ लाख वृक्ष लावणार
  • महाराष्ट्र वन विभाग ५ लाख ८१ हजार वृक्ष लावणार
  • ग्रामपंचायती २५ लाख ६ हजार वृक्ष लावणार
  • इतर सर्व विभाग मिळून २५ लाख ९० हजार वृक्ष लावतील

केंद्र सरकारचे विभाग

  • ऑर्डनन्स फॅक्टरी २५ हजार
  • वेकोलि ८० हजार
  • मॉईल १५ हजार
  • एनटीपीसी ५ हजार
  • कॉन्कर ३ हजार
  • एफसीआय ५ हजार
  • कॉटन रिसर्च सेंटर ३ हजार
  • रेल्वे ३० हजार वृक्ष लावणार

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेenvironmentवातावरण