शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

दरवर्षी सव्वा लाख मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून यासाठी भाजप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून यासाठी भाजप आणि काँग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले,२००६ साली शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी मिळून सरकारला खासगी शिक्षण संस्थेतही आरक्षणाचा कायदा करायला भाग पाडले. तो कायदा म्हणजे महाराष्ट्र प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्युशन (रिझर्व्हेशन ऑफ सिट्स फॉर ॲडमिशन फॉर शेड्युल कास्ट, शेड्युल्ड ट्राईब्स, विमुक्त जाती) असा आहे. या कायद्याच्या कलम ४ व ५ नुसार अनुसूचित जमातीसाठी ७ टक्के, अनुसूचित जातीसाठी १३ टक्के,ओबीसीसाठी १९ टक्के आणि व्हीजे व्हीएनटीचे वेगवेगळे गटानुसार आरक्षण देण्यात आले हाेते. यामुळे विविध विद्याशाखेत उच्च शिक्षणासाठी खाासगी संस्थेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थांना ५० टक्के आरक्षण मिळाले होते. हा कायदाा वर्षभर अमलात राहिला. यानंतर राज्य सरकारने एक अधिनिियम काढून हे ५० टक्के आरक्षण २५ टक्केवर आणले. राज्यात जवळपास मेडिकलला साडेसहा हजारावर जागा मंजूर आहेत. इंजिनियरिंगच्या जवळपास १ लाखावर जागा आहेत. यासेबतच कॅटरिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. एका अधिनयमामुळे तब्बल १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी दरवर्षी या उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहे. हे देशाचे नुकसान आहे. परंतु शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघातून निवडून गेलेल्या एकाही आमदाराने यावर आवाज उचलला नाही. त्यामुळे आम्ही शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रपरिषदेला वंचितचे नेते राजू लोखंडे, रमेश पिसे, राहुल वानखेडे, व शहराध्यक्ष रवी शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.