शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

कधी होता पार्लरचा मालक, आता धुतो कप बशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 11:15 IST

crime news Nagpur News पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला.

ठळक मुद्देटोळक्याने आणले रस्त्यावरलोभाने केले कंगाल

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला.

आज त्याच्यावर हॉटेलमध्ये कपबशी धुण्याची वेळ आली. आमिष कुणाला, कसे रस्त्यावर आणून सोडते, त्याचा नमुना ठरू पाहणारी ही घटना आहे. या घटनेतील पात्र अमरावती अमरावती शहरातील रहिवासी आहे.

२०१४ पर्यंत या व्यक्तीचे शहरात पॉश आइस्क्रीम पार्लर होते. अकोल्यातील ओळखीच्या एका आरोपीने त्याला मुंबईत अल्प किमतीत कस्टमचे सोने मिळते, इच्छा असेल तर पाहायला चल. नंतर घ्यायच की नाही ते ठरवू, असे म्हटले. पात्र तयार झाले. ऑगस्ट २०१४ मध्ये हे मुंबईला पोहोचले. जाळे लावून बसलेल्या टोळक्याने पात्राला सोने दाखवले. एअरपोर्टवर कस्टम विभाग जे सोने जप्त करते, त्यातील काही अलगद काढून काढून घेतले जाते. हे सोने आम्हाला अत्यल्प किमतीत मिळते आणि ते आम्ही कमी किमतीत विकतो, असे सांगितले गेले. सोने असली की नकली ते तपासून बघा,असेही सांगण्यात आले. सोन्याची तपासणी झाली आणि ते अस्सल असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पात्राला लोभ सुटला. पात्र अमरावतीला परतले आणि इकडचे तिकडचे सर्व विकून, कर्ज काढून २७ लाख रुपये गोळा केले. सहा लाख मित्राकडून घेतले. ३३ लाख रुपये घेऊन पात्र पुन्हा मुंबईला पोहोचले. टोळी सज्ज होती. सोने मोजून-मापून हातात देण्यात आले. अर्ध्या किंमतीत सोने मिळण्याचा आनंद गगनात मावत नव्हता. एवढे मोठे सोने एकट्याने मुंबईहून अमरावतीला नेणे योग्य होणार नाही, त्यासाठी आमची माणसं सोबत न्या, असा सल्ला त्यांनी दिला. टोळक्याच्या सल्ल्यानुसार टॅक्सी करून ही मंडळी मुंबईहून अमरावती कडे निघाली. ज्याच्याकडे सोन्याची बॅग होती, तो वाटेत गायब झाला. टोळीतील इतर सदस्यांनी ''आमच्या माणसाने आमच्याशी दगाबाजी केली'', असा कांगावा केला.

दीड महिन्यानंतर पात्राला पुन्हा फोन आला. सोने घेऊन पळालेला माणूस सापडला, मुंबईत या आणि सोने घेऊन जा, असेही म्हटले. त्यामुळे पात्र पुन्हा मुंबईला पोहोचले. पुन्हा चार-पाच जण कथित सोने घेऊन अमरावतीकडे निघाले. भुसावळजवळ खाकी वेशातील चौघांनी त्यांना पकडले आणि त्याच व्यक्तीला सोने तस्करीच्या आरोपात ताब्यात घेऊन निघून गेले. पोलिसांचा छापा पडला. त्यामुळे आता आम्ही काही करू शकणार नाही, असे सांगून टोळक्याने हात झटकले. दरम्यान, चार-पाच दिवस निघून गेले. पोलिसांच्या छाप्याची आणि सोने जप्तीची बातमी एकाही वृत्तपत्रात न आल्यामुळे पात्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने टोळक्यावर संशय घेऊन फसवणुकीचा आरोप लावला. पोलिसांकडे जाण्याची धमकीही दिली. त्यामुळे टोळक्याने त्याला कसेबसे शांत करून तुझी रक्कम तुला परत करतो, असे म्हटले. नोव्हेंबर २०१५ मध्ये आमचा बॉस नागपुरात राहतो, तुम्ही या आणि रक्कम परत घेऊन जा, असे म्हटले. ठरल्याप्रमाणे पात्र नागपुरात पोहोचले. त्याला कुख्यात संतोष आंबेकरच्या बंगल्यावर नेण्यात आले. तेथे त्याची बेदम धुलाई करून पिस्तूल दाखवण्यात आले. जिवंत राहायचे असेल तर सगळं विसर, असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. होते नव्हते ते सारेच गमावले आणि कर्जदारांचा तगादा सुरू झाला. रस्त्यावर आलेले पात्र जीव लपविण्यासाठी दुसऱ्या राज्यात निघून गेले. तब्बल पाच वर्ष मिळेल ते काम करत त्याने पोटाची व्यवस्था केली.

दरम्यान, नागपुरातील कुख्यात संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केल्याचे वृत्तपत्रातून त्याला कळले. त्यामुळे पात्र नागपुरात पोहोचले. त्याने पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर संतोष आंबेकर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी रविवारी अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याची चौकशी होईल आणि पुढे जे काही व्हायचे ते होईल. मात्र कमी किंमतीत सोने विकत घेण्यासाठी होते नव्हते सर्व विकून संतोष आणि साथीदाराच्या हातात आयुष्यभराची कमाई ठेवल्यामुळे पात्र अगदीच कंगाल झाले आहे. दोन सांजेची सोय करण्यासाठी सध्या हे पात्र एका हॉटेलमध्ये चहाच्या कपबशा धूत आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी