शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

कधी होता पार्लरचा मालक, आता धुतो कप बशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 11:15 IST

crime news Nagpur News पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला.

ठळक मुद्देटोळक्याने आणले रस्त्यावरलोभाने केले कंगाल

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाच वर्षांपूर्वी तो एका पॉश आईस्क्रीम पार्लरचा मालक होता. चालबाज गुंडांच्या मायाजालात तो अडकला अन अक्षरशः बरबाद झाला.

आज त्याच्यावर हॉटेलमध्ये कपबशी धुण्याची वेळ आली. आमिष कुणाला, कसे रस्त्यावर आणून सोडते, त्याचा नमुना ठरू पाहणारी ही घटना आहे. या घटनेतील पात्र अमरावती अमरावती शहरातील रहिवासी आहे.

२०१४ पर्यंत या व्यक्तीचे शहरात पॉश आइस्क्रीम पार्लर होते. अकोल्यातील ओळखीच्या एका आरोपीने त्याला मुंबईत अल्प किमतीत कस्टमचे सोने मिळते, इच्छा असेल तर पाहायला चल. नंतर घ्यायच की नाही ते ठरवू, असे म्हटले. पात्र तयार झाले. ऑगस्ट २०१४ मध्ये हे मुंबईला पोहोचले. जाळे लावून बसलेल्या टोळक्याने पात्राला सोने दाखवले. एअरपोर्टवर कस्टम विभाग जे सोने जप्त करते, त्यातील काही अलगद काढून काढून घेतले जाते. हे सोने आम्हाला अत्यल्प किमतीत मिळते आणि ते आम्ही कमी किमतीत विकतो, असे सांगितले गेले. सोने असली की नकली ते तपासून बघा,असेही सांगण्यात आले. सोन्याची तपासणी झाली आणि ते अस्सल असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पात्राला लोभ सुटला. पात्र अमरावतीला परतले आणि इकडचे तिकडचे सर्व विकून, कर्ज काढून २७ लाख रुपये गोळा केले. सहा लाख मित्राकडून घेतले. ३३ लाख रुपये घेऊन पात्र पुन्हा मुंबईला पोहोचले. टोळी सज्ज होती. सोने मोजून-मापून हातात देण्यात आले. अर्ध्या किंमतीत सोने मिळण्याचा आनंद गगनात मावत नव्हता. एवढे मोठे सोने एकट्याने मुंबईहून अमरावतीला नेणे योग्य होणार नाही, त्यासाठी आमची माणसं सोबत न्या, असा सल्ला त्यांनी दिला. टोळक्याच्या सल्ल्यानुसार टॅक्सी करून ही मंडळी मुंबईहून अमरावती कडे निघाली. ज्याच्याकडे सोन्याची बॅग होती, तो वाटेत गायब झाला. टोळीतील इतर सदस्यांनी ''आमच्या माणसाने आमच्याशी दगाबाजी केली'', असा कांगावा केला.

दीड महिन्यानंतर पात्राला पुन्हा फोन आला. सोने घेऊन पळालेला माणूस सापडला, मुंबईत या आणि सोने घेऊन जा, असेही म्हटले. त्यामुळे पात्र पुन्हा मुंबईला पोहोचले. पुन्हा चार-पाच जण कथित सोने घेऊन अमरावतीकडे निघाले. भुसावळजवळ खाकी वेशातील चौघांनी त्यांना पकडले आणि त्याच व्यक्तीला सोने तस्करीच्या आरोपात ताब्यात घेऊन निघून गेले. पोलिसांचा छापा पडला. त्यामुळे आता आम्ही काही करू शकणार नाही, असे सांगून टोळक्याने हात झटकले. दरम्यान, चार-पाच दिवस निघून गेले. पोलिसांच्या छाप्याची आणि सोने जप्तीची बातमी एकाही वृत्तपत्रात न आल्यामुळे पात्राच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने टोळक्यावर संशय घेऊन फसवणुकीचा आरोप लावला. पोलिसांकडे जाण्याची धमकीही दिली. त्यामुळे टोळक्याने त्याला कसेबसे शांत करून तुझी रक्कम तुला परत करतो, असे म्हटले. नोव्हेंबर २०१५ मध्ये आमचा बॉस नागपुरात राहतो, तुम्ही या आणि रक्कम परत घेऊन जा, असे म्हटले. ठरल्याप्रमाणे पात्र नागपुरात पोहोचले. त्याला कुख्यात संतोष आंबेकरच्या बंगल्यावर नेण्यात आले. तेथे त्याची बेदम धुलाई करून पिस्तूल दाखवण्यात आले. जिवंत राहायचे असेल तर सगळं विसर, असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. होते नव्हते ते सारेच गमावले आणि कर्जदारांचा तगादा सुरू झाला. रस्त्यावर आलेले पात्र जीव लपविण्यासाठी दुसऱ्या राज्यात निघून गेले. तब्बल पाच वर्ष मिळेल ते काम करत त्याने पोटाची व्यवस्था केली.

दरम्यान, नागपुरातील कुख्यात संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केल्याचे वृत्तपत्रातून त्याला कळले. त्यामुळे पात्र नागपुरात पोहोचले. त्याने पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर संतोष आंबेकर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी रविवारी अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. त्याची चौकशी होईल आणि पुढे जे काही व्हायचे ते होईल. मात्र कमी किंमतीत सोने विकत घेण्यासाठी होते नव्हते सर्व विकून संतोष आणि साथीदाराच्या हातात आयुष्यभराची कमाई ठेवल्यामुळे पात्र अगदीच कंगाल झाले आहे. दोन सांजेची सोय करण्यासाठी सध्या हे पात्र एका हॉटेलमध्ये चहाच्या कपबशा धूत आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी