शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अबब! विष्णू मनोहर यांनी शिजविली १५०० किलो भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 10:20 IST

नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

ठळक मुद्देपुन्हा एक नवा विक्रम सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. विष्णू यांनी हा भव्य उपक्रम कुठल्याही विक्रमासाठी केला नाही, तर नागपुरकरांना विषमुक्त अन्न मिळावे, सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सेंद्रिय उत्पादनाची चव नागपूरकरांना व्हावी, या उद्देशातून १५०० किलोची भाजी शिजविली.बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे सकाळी ६.३० वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा करून त्यांनी भाजी शिजवायला सुरुवात केली. सखे सोबती फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दीड हजार किलो भाजी शिजेल एवढी मोठी कढई, १० फुटाचा सराटा, शेकडो किलो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मसाले, खाद्यतेलाचा वापर करून चार तासात त्यांनी भाजी शिजविली. हे सर्व प्रीपरेशन गोवºया आणि लाकडांवर करण्यात आले. विष्णू यांनी केलेल्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. १० वाजताच्या सुमारास भाजी तयार झाली. आमदार गिरीश व्यास, मनसेचे प्रवक्ते हेमंत गडकरी, राजे मुधोजी भोसले यांच्या उपस्थितीत उपस्थितांना त्याचे वितरण करण्यात आले.अनेकांनी विष्णू यांनी तयार केलेल्या भाजीचा आस्वाद घेतला, काही कुटुंबीयांसाठीही घेऊन गेले. विष्णू यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि धन्यवादही दिले.सर्वकाही नैसर्गिकदीड हजार किलोच्या भाजीत १२० किलो गांजर, १७५ किलो बटाटे, १०० किलो कांदे, अद्रक, लसूण, मिरची प्रत्येकी ५० किलो, १०० किलो सांभार, १०० किलो कोबी, १०० किलो वांगे, टोमॅटो १५०, मेथी २५ यासह मसाले व १५० किलो खाद्यतेलाचा वापर करण्यात आला होता. ‘फार्म २ फ्रीज’ या संस्थेकडून सर्व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करण्यात आला होता.खूप टेस्टी झालीविष्णू यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या सर्व खवय्येगिरीच्या उपक्रमात आम्ही सहभागी होतोे. त्यांनी केलेली खिचडी, हलवाही खाल्ला. त्यांच्या हातची भाजीही खूपच टेस्टी झाली आहे. जे काही भव्यदिव्य ते करताहेत, त्यांना त्यातून आनंद मिळतो आहे आणि आम्हालाही त्यांच्या हातचे खायला मिळत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी त्यांनी केलेला हा उपक्रम अभिमानास्पद आहे.-वृषाली दारव्हेकर

टॅग्स :foodअन्नVishnu Manoharविष्णु मनोहर