शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

अबब! विष्णू मनोहर यांनी शिजविली १५०० किलो भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 10:20 IST

नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

ठळक मुद्देपुन्हा एक नवा विक्रम सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरनंतर दिल्लीत शिजविलेली दलित खिचडी, जळगावकरांना खाऊ घातलेले भरीत आणि नागपूरकरांच्या तोंडाला पाणी सोडणाऱ्या संत्र्याच्या हलव्यानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी १५०० किलोची भाजी शिजवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. विष्णू यांनी हा भव्य उपक्रम कुठल्याही विक्रमासाठी केला नाही, तर नागपुरकरांना विषमुक्त अन्न मिळावे, सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सेंद्रिय उत्पादनाची चव नागपूरकरांना व्हावी, या उद्देशातून १५०० किलोची भाजी शिजविली.बजाजनगरातील विष्णूजी की रसोई येथे सकाळी ६.३० वाजता अन्नपूर्णा देवीची पूजा करून त्यांनी भाजी शिजवायला सुरुवात केली. सखे सोबती फाऊंडेशनतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला. दीड हजार किलो भाजी शिजेल एवढी मोठी कढई, १० फुटाचा सराटा, शेकडो किलो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मसाले, खाद्यतेलाचा वापर करून चार तासात त्यांनी भाजी शिजविली. हे सर्व प्रीपरेशन गोवºया आणि लाकडांवर करण्यात आले. विष्णू यांनी केलेल्या भाजीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण उपस्थित होते. १० वाजताच्या सुमारास भाजी तयार झाली. आमदार गिरीश व्यास, मनसेचे प्रवक्ते हेमंत गडकरी, राजे मुधोजी भोसले यांच्या उपस्थितीत उपस्थितांना त्याचे वितरण करण्यात आले.अनेकांनी विष्णू यांनी तयार केलेल्या भाजीचा आस्वाद घेतला, काही कुटुंबीयांसाठीही घेऊन गेले. विष्णू यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि धन्यवादही दिले.सर्वकाही नैसर्गिकदीड हजार किलोच्या भाजीत १२० किलो गांजर, १७५ किलो बटाटे, १०० किलो कांदे, अद्रक, लसूण, मिरची प्रत्येकी ५० किलो, १०० किलो सांभार, १०० किलो कोबी, १०० किलो वांगे, टोमॅटो १५०, मेथी २५ यासह मसाले व १५० किलो खाद्यतेलाचा वापर करण्यात आला होता. ‘फार्म २ फ्रीज’ या संस्थेकडून सर्व सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करण्यात आला होता.खूप टेस्टी झालीविष्णू यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या सर्व खवय्येगिरीच्या उपक्रमात आम्ही सहभागी होतोे. त्यांनी केलेली खिचडी, हलवाही खाल्ला. त्यांच्या हातची भाजीही खूपच टेस्टी झाली आहे. जे काही भव्यदिव्य ते करताहेत, त्यांना त्यातून आनंद मिळतो आहे आणि आम्हालाही त्यांच्या हातचे खायला मिळत आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी त्यांनी केलेला हा उपक्रम अभिमानास्पद आहे.-वृषाली दारव्हेकर

टॅग्स :foodअन्नVishnu Manoharविष्णु मनोहर