शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:45 IST

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले.

ठळक मुद्देअंजू बॉबी जॉर्जने केले मत व्यक्त राष्ट्रकुल व विश्व स्पर्धेच्या तुलनेत ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या उदघाट्नसाठी अंजू रविवारी नागपुरात आली होती.पॅरिसमध्ये २००३ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये कांस्यपदक पटकावण्याचा इतिहास घडविणारी अंजू पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली,‘राष्ट्रकुल व विश्व चॅम्पियनशिपच्या तुलनेत ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये पदक पटकावणे भारतासाठी सोपे नाही. ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा असतो.’याबाबत कारण विषद करताना अंजू म्हणाली,‘तुम्हाला भारतातील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. तुम्हाला देशात अधिक ट्रॅक व सुविधांची गरज आहे.सध्या येथील सुविधा पुरेशा नाहीत. आपले ज्युनिअर खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करीत आहेत. आपल्याकडे विश्वविक्रमी भालफेकपटू आहे. त्यामुळे आपल्याला सध्याच भाकीत करता येणार नाही.’उदयोन्मुख खेळाडू १८ वर्षीय हिमा दासबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘अल्प वेळात हिमाने बरेच काही मिळवले आहे. तिच्यावर दडपण यायला नको.’अंजूने प्रतिभावान युवा खेळाडू शंकरचीही प्रशंसा केली. तो क्रीडा पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातील आहे. त्याने आपली छाप सोडली आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याने कसून मेहनत घेण्याची गरज आहे.डोपिंगबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘डोपिंग दुसरे तिसरे काही नसून गुन्हा आहे. डोपिंगच्या दुष्परिणामांबाबत खेळाडूंना शिक्षित करायला हवे. मलाही डोपिंगाची झळ बसली आहे. त्यामुळे प्रशिक्षकांना दोष देण्यापेक्षा खेळाडूंनी स्वत:च माहिती करुन घ्यायला हवी.’बेंगळुरूमध्ये अ‍ॅथ्लेटिक्स अकादमी चालवित असलेल्या अंजूने भारतीय प्रशिक्षकांना अधिक प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानी राहिलेल्या अंजूने भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाची प्रशंसा करताना आता खेळाडूंसाठी शिबिर व स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे म्हटले.क्रिकेटच्या तुलनेत कार्पोरेट जगताकडून अ‍ॅथ्लेटिक्सला मदत मिळत नसल्याचे सांगताना ऑलिम्पिक पदक मिळवता न आल्याचे शल्य असल्याचे अंजूने सांगितले.नागपुरात सुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवीअंजू सध्या टॉप्सची (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम) अध्यक्ष व खेलो इंडिया प्रोजेक्टची कार्यकारी सदस्य आहे. नागपूरने लांब पल्ल्याचे चांगले धावपटू दिले असले तरी येथे सुविधांची वानवा आहे. अंजू म्हणाली,‘नागपूर लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचसोबत सरकारच्या सहकार्याने येथे सुविधांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे.’

टॅग्स :cultureसांस्कृतिक