शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:45 IST

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले.

ठळक मुद्देअंजू बॉबी जॉर्जने केले मत व्यक्त राष्ट्रकुल व विश्व स्पर्धेच्या तुलनेत ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या उदघाट्नसाठी अंजू रविवारी नागपुरात आली होती.पॅरिसमध्ये २००३ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये कांस्यपदक पटकावण्याचा इतिहास घडविणारी अंजू पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली,‘राष्ट्रकुल व विश्व चॅम्पियनशिपच्या तुलनेत ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये पदक पटकावणे भारतासाठी सोपे नाही. ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा असतो.’याबाबत कारण विषद करताना अंजू म्हणाली,‘तुम्हाला भारतातील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. तुम्हाला देशात अधिक ट्रॅक व सुविधांची गरज आहे.सध्या येथील सुविधा पुरेशा नाहीत. आपले ज्युनिअर खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करीत आहेत. आपल्याकडे विश्वविक्रमी भालफेकपटू आहे. त्यामुळे आपल्याला सध्याच भाकीत करता येणार नाही.’उदयोन्मुख खेळाडू १८ वर्षीय हिमा दासबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘अल्प वेळात हिमाने बरेच काही मिळवले आहे. तिच्यावर दडपण यायला नको.’अंजूने प्रतिभावान युवा खेळाडू शंकरचीही प्रशंसा केली. तो क्रीडा पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातील आहे. त्याने आपली छाप सोडली आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याने कसून मेहनत घेण्याची गरज आहे.डोपिंगबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘डोपिंग दुसरे तिसरे काही नसून गुन्हा आहे. डोपिंगच्या दुष्परिणामांबाबत खेळाडूंना शिक्षित करायला हवे. मलाही डोपिंगाची झळ बसली आहे. त्यामुळे प्रशिक्षकांना दोष देण्यापेक्षा खेळाडूंनी स्वत:च माहिती करुन घ्यायला हवी.’बेंगळुरूमध्ये अ‍ॅथ्लेटिक्स अकादमी चालवित असलेल्या अंजूने भारतीय प्रशिक्षकांना अधिक प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानी राहिलेल्या अंजूने भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाची प्रशंसा करताना आता खेळाडूंसाठी शिबिर व स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे म्हटले.क्रिकेटच्या तुलनेत कार्पोरेट जगताकडून अ‍ॅथ्लेटिक्सला मदत मिळत नसल्याचे सांगताना ऑलिम्पिक पदक मिळवता न आल्याचे शल्य असल्याचे अंजूने सांगितले.नागपुरात सुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवीअंजू सध्या टॉप्सची (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम) अध्यक्ष व खेलो इंडिया प्रोजेक्टची कार्यकारी सदस्य आहे. नागपूरने लांब पल्ल्याचे चांगले धावपटू दिले असले तरी येथे सुविधांची वानवा आहे. अंजू म्हणाली,‘नागपूर लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचसोबत सरकारच्या सहकार्याने येथे सुविधांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे.’

टॅग्स :cultureसांस्कृतिक