शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

नागपुरातील जुन्या पुस्तकांची बाजारपेठ उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 10:31 IST

८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला.

ठळक मुद्देप्रशासनाची टोलवाटोलवी पर्यायी जागेसाठी आता अधिवेशनावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला. व्यवसायासाठी सर्व जुन्या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जुन्या पुस्तक विक्रेत्यांना देण्यात आले होते. परंतु आता प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. परिणामी या पुस्तक विक्रेत्यांपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील जागेत तब्बल ८५ वर्षांपासून जुन्या पुस्तकांचा बाजार भरत होता. हा बाजार म्हणजे नागपूरची ओळख झाला होता. या बाजारातील पुस्तकांच्या विक्रीवर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. परंतु मेट्रो रेल्वेने हा आधारच हिरावला आहे. या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळावी, यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता.शहराच्या विकास कामासाठी येथील पुस्तक विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाची जागा दिली. तेव्हा प्रशासनानेही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. तेव्हा पर्यायी जगा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी आता पुस्तक विक्रेत्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने पावसाळी अधिवेशनादरम्यान ७ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.आता आम्ही जगायचे कसे?मेट्रोच्या विकासासाठी मेट्रो रेल्वे हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे जुन्या पुस्तक विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपली जागा सोडली. परंतु आता पुस्तक विकेत्यांसह दुकानात काम करणाऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन व शासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यायी जागा द्यावी.- नरेश वाहाणे, अध्यक्ष,नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था

 

टॅग्स :Governmentसरकार