शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागपुरातील जुन्या पुस्तकांची बाजारपेठ उठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 10:31 IST

८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला.

ठळक मुद्देप्रशासनाची टोलवाटोलवी पर्यायी जागेसाठी आता अधिवेशनावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८५ वर्षे जुना आणि उपराजधानीची ओळख असलेला जुन्या पुस्तकांचा बाजार मेट्रो रेल्वेमुळे उद्ध्वस्त करण्यात आला. व्यवसायासाठी सर्व जुन्या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जुन्या पुस्तक विक्रेत्यांना देण्यात आले होते. परंतु आता प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. परिणामी या पुस्तक विक्रेत्यांपुढे कुटुंबाच्या पालनपोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील जागेत तब्बल ८५ वर्षांपासून जुन्या पुस्तकांचा बाजार भरत होता. हा बाजार म्हणजे नागपूरची ओळख झाला होता. या बाजारातील पुस्तकांच्या विक्रीवर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. परंतु मेट्रो रेल्वेने हा आधारच हिरावला आहे. या पुस्तक विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळावी, यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेतही हा प्रश्न उपस्थित केला होता.शहराच्या विकास कामासाठी येथील पुस्तक विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाची जागा दिली. तेव्हा प्रशासनानेही त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाकडून टोलवाटोलवी सुरू आहे. तेव्हा पर्यायी जगा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी आता पुस्तक विक्रेत्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने पावसाळी अधिवेशनादरम्यान ७ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.आता आम्ही जगायचे कसे?मेट्रोच्या विकासासाठी मेट्रो रेल्वे हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे जुन्या पुस्तक विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपली जागा सोडली. परंतु आता पुस्तक विकेत्यांसह दुकानात काम करणाऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन व शासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पर्यायी जागा द्यावी.- नरेश वाहाणे, अध्यक्ष,नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था

 

टॅग्स :Governmentसरकार