शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

परीक्षेत मिळाली जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 22:27 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासानंतर या प्रश्नपत्रिका बदलविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोपविण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा प्रणालीतील त्रुटीमुळे ‘बीबीए’च्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांना चक्क जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. तब्बल दीड तासानंतर या प्रश्नपत्रिका बदलविण्यात आल्या व विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका सोपविण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे काही परीक्षा केंद्रांवर तर विद्यार्थ्यांनी जुन्याच प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत.यंदा ‘बीबीए’ प्रथम सत्राचा अभ्यासक्रम बदलविण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी पहिलाच पेपर होता. सोबतच जुन्या अभ्यासक्रमानुसार ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांचाही पेपर होता. सकाळी ९.३० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. वर्धा, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतील १७ ते १८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती. नवीन आणि जुन्या पेपरचा विषय सारखाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांना चूक लक्षात आलीच नाही. मात्र काही विद्यार्थ्यांना ही तफावत लक्षात आली व तत्काळ त्यांनी ही बाब परीक्षा केंद्र अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत परीक्षा भवनातदेखील कळविण्यात आले.परीक्षा भवनातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर जुन्या व नवीन अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे एक ते दीड तासांनी प्रश्नपत्रिका बदलून देण्यात आल्या, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली.‘त्या’ विद्यार्थ्यांचे काय होणार ?दरम्यान, दोन परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांना जुन्या व नव्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकेतील तफावत लक्षातच आली नाही. त्यामुळे त्यांनी नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असूनदेखील जुनीच प्रश्नपत्रिका सोडविली. संबंधित विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परत परीक्षा घेण्याची मागणी केली. यासंदर्भात अधिष्ठाता, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निर्णय घ्यावा लागेल, असे डॉ.खटी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा