शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अरे! प्रेमासाठी जीव का घेता, आयुष्य का संपविता ?

By योगेश पांडे | Updated: March 10, 2023 07:00 IST

Nagpur News प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देप्रेमातूनही केली जातेय आत्महत्या‘लव्ह मॅरेज’नंतर वाद ठरतोय जीवघेणा, सुन्न करताहेत घटना

नागपूर : स्वत:च्या पत्नीचीच हातोड्याने वार करून हत्या केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. मात्र आयुष्य हे सुंदर असल्याची कल्पना असूनही ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रेम हे प्रेम असते, सर्वांचे सेम नसते असे म्हणतात. मात्र प्रेमाची भावना सारखीच असते. प्रेमात अनेकजण आंधळे होतात. परंतु ज्याच्यावर प्रेम केले, त्याचा शुल्लक वादातून जीव घेण्यासाठीदेखील लोक मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. कसलाही संबंध नसताना जीव गेल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तसेच प्रेमातून आत्महत्या करण्याच्या घटनादेखील दिसून आल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शहर पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास, पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत त्यांच्यात होणार आहे. यासाठी पोलिसांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

 

पत्नीशी वाद, स्वत:सह मुलांनाही संपविले

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर मुलांचा जीव घेत आत्महत्या केल्याने शहर हादरले होते. वैष्णोदेवी नगर येथे मनोज अशोक बेले (४५) याचे त्याची पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचे व त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहायचे. त्याने सातवर्षीय तनिष्का व बारावर्षीय प्रिन्स यांना खाऊमधून विष देऊन मारले व स्वत: आत्महत्या केली होती.

 

‘एक दुजे के लिए’ म्हणत आत्महत्या

सप्टेंबर महिन्यात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीने चक्क रेल्वेगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली होती. त्यांना लग्न करावयाचे होते. मात्र, नातं आड येत असल्याने समाज आपल्याला स्वीकारणार नाही, याची जाणीव दोघांनाही असल्याने त्यांनी सोबत जीव देण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. जितेंद्र काशिराम नेवारे (३५, रा. बाबा फरीदनगर, मानकापूर, नागपूर) व स्वाती पप्पू बोपचे (१९, रा. तुमखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) अशी मृतांची नावे होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी