शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

अरे! प्रेमासाठी जीव का घेता, आयुष्य का संपविता ?

By योगेश पांडे | Updated: March 10, 2023 07:00 IST

Nagpur News प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देप्रेमातूनही केली जातेय आत्महत्या‘लव्ह मॅरेज’नंतर वाद ठरतोय जीवघेणा, सुन्न करताहेत घटना

नागपूर : स्वत:च्या पत्नीचीच हातोड्याने वार करून हत्या केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. मात्र आयुष्य हे सुंदर असल्याची कल्पना असूनही ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रेम हे प्रेम असते, सर्वांचे सेम नसते असे म्हणतात. मात्र प्रेमाची भावना सारखीच असते. प्रेमात अनेकजण आंधळे होतात. परंतु ज्याच्यावर प्रेम केले, त्याचा शुल्लक वादातून जीव घेण्यासाठीदेखील लोक मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. कसलाही संबंध नसताना जीव गेल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तसेच प्रेमातून आत्महत्या करण्याच्या घटनादेखील दिसून आल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शहर पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास, पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत त्यांच्यात होणार आहे. यासाठी पोलिसांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

 

पत्नीशी वाद, स्वत:सह मुलांनाही संपविले

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर मुलांचा जीव घेत आत्महत्या केल्याने शहर हादरले होते. वैष्णोदेवी नगर येथे मनोज अशोक बेले (४५) याचे त्याची पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचे व त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहायचे. त्याने सातवर्षीय तनिष्का व बारावर्षीय प्रिन्स यांना खाऊमधून विष देऊन मारले व स्वत: आत्महत्या केली होती.

 

‘एक दुजे के लिए’ म्हणत आत्महत्या

सप्टेंबर महिन्यात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीने चक्क रेल्वेगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली होती. त्यांना लग्न करावयाचे होते. मात्र, नातं आड येत असल्याने समाज आपल्याला स्वीकारणार नाही, याची जाणीव दोघांनाही असल्याने त्यांनी सोबत जीव देण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. जितेंद्र काशिराम नेवारे (३५, रा. बाबा फरीदनगर, मानकापूर, नागपूर) व स्वाती पप्पू बोपचे (१९, रा. तुमखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) अशी मृतांची नावे होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी