शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अरे! प्रेमासाठी जीव का घेता, आयुष्य का संपविता ?

By योगेश पांडे | Updated: March 10, 2023 07:00 IST

Nagpur News प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देप्रेमातूनही केली जातेय आत्महत्या‘लव्ह मॅरेज’नंतर वाद ठरतोय जीवघेणा, सुन्न करताहेत घटना

नागपूर : स्वत:च्या पत्नीचीच हातोड्याने वार करून हत्या केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. प्रेमविवाह केल्यानंतर पार्टनरचा जीव घेणे किंवा प्रेमातून आत्महत्या करणे हे प्रकार मागील काही काळात बघायला मिळाले आहेत. मात्र आयुष्य हे सुंदर असल्याची कल्पना असूनही ज्याच्यावर प्रेम केले त्या व्यक्तीचा जीव घेणे किंवा स्वत:चे आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रेम हे प्रेम असते, सर्वांचे सेम नसते असे म्हणतात. मात्र प्रेमाची भावना सारखीच असते. प्रेमात अनेकजण आंधळे होतात. परंतु ज्याच्यावर प्रेम केले, त्याचा शुल्लक वादातून जीव घेण्यासाठीदेखील लोक मागे-पुढे पाहत नसल्याचे समोर आले आहे. कसलाही संबंध नसताना जीव गेल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. तसेच प्रेमातून आत्महत्या करण्याच्या घटनादेखील दिसून आल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी शहर पोलिस दलाकडून विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास, पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत त्यांच्यात होणार आहे. यासाठी पोलिसांनीच पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

 

पत्नीशी वाद, स्वत:सह मुलांनाही संपविले

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर मुलांचा जीव घेत आत्महत्या केल्याने शहर हादरले होते. वैष्णोदेवी नगर येथे मनोज अशोक बेले (४५) याचे त्याची पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचे व त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहायचे. त्याने सातवर्षीय तनिष्का व बारावर्षीय प्रिन्स यांना खाऊमधून विष देऊन मारले व स्वत: आत्महत्या केली होती.

 

‘एक दुजे के लिए’ म्हणत आत्महत्या

सप्टेंबर महिन्यात एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणीने चक्क रेल्वेगाडीखाली उडी घेत आत्महत्या केली होती. त्यांना लग्न करावयाचे होते. मात्र, नातं आड येत असल्याने समाज आपल्याला स्वीकारणार नाही, याची जाणीव दोघांनाही असल्याने त्यांनी सोबत जीव देण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. जितेंद्र काशिराम नेवारे (३५, रा. बाबा फरीदनगर, मानकापूर, नागपूर) व स्वाती पप्पू बोपचे (१९, रा. तुमखेडा, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) अशी मृतांची नावे होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी