शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

एका अधिकाऱ्याकडे तीन पदाचा कार्यभार

By admin | Updated: May 9, 2014 02:35 IST

नगर परिषदेचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे कामे रेंगाळली असून नगर परिषदेत एखाद्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला ताटकळत राहिल्याशिवाय पर्याय नाही.

कामठी पालिका : सहा महिन्यांपासून मुख्याधिकारी नाहीबंडू नारनवरे■ कामठीनगर परिषदेचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे कामे रेंगाळली असून नगर परिषदेत एखाद्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला ताटकळत राहिल्याशिवाय पर्याय नाही. एका अधिकार्‍याकडे तीन-तीन पदाचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेचा कार्यभार मुख्याधिकार्‍यांकडून चालविला जात असताना गेल्या सहा महिन्यांपासून स्थायी मुख्याधिकारी नाही.कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांची यवतमाळ येथे बदली झाल्यानंतर या पदाचा प्रभार कळमेश्‍वरच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे देण्यात आला. मात्र काही दिवसांतच त्यांच्याकडून हा प्रभार काढून नायब तहसीलदार संजय रामटेके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. काही दिवस त्यांच्याकडे हा पदभार ठेवल्यानंतर उमरेडचे मुख्याधिकारी देशमुख यांच्याकडे काही दिवसापूर्वी अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. देशमुख यांच्याकडे आता उमरेडसोबतच कामठी आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी अशा तीन पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते एकाही विभागाला बरोबर न्याय देऊ शकत नसल्याचा आरोप केला जात आहे.नोव्हेंबर २0१३ ला स्थायी मुख्याधिकारी पांढरे यांची बदली झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून स्थायी मुख्याधिकारी न मिळणे हे या नगर परिषदेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रभारी मुख्याधिकार्‍यांपैकी केवळ माधुरी मडावी यांनी पालिकेचा कार्यभार सांभाळण्याचा प्रयत्न केला.मुख्याधिकार्‍यांसोबतच नगर परिषदेतील मुख्य लिपिक धानफुले यांच्याकडे कर विभाग प्रमुख व न्यायालयीन प्रकरण असे तीन कार्यभार देण्यात आले आहे. गाडकिले यांच्याकडे अंतर्गत लेखा परीक्षक व लेखापाल असे दोन कार्यभार सोपविण्यात आले आहे. बलराज नामपल्लीवार यांच्याकडे सभा लिपिकसोबतच कॅशियरचासुद्धा भार आहे. विद्युत निरीक्षक खाडे हे ३0 एप्रिलला सेवानवृत्त झाले असून त्यांचा हा कार्यभार आणखी कुणाकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात येईल, याबाबत अजून निश्‍चित केले नाही.एकापेक्षा अधिक कार्यभार असल्याचा ताण येथील कर्मचार्‍यांच्या व अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे जाणवत आहे. २00६ पासून कामठी नगर परिषदेत एकूण २२ पदे रिक्त असून ती अद्याप भरण्यात आले नाही. येथील कर्मचार्‍यांना वेळेवर नियमितपणे पगार तर देण्यात येत नाही. उलट त्यांच्याकडे दोन-तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवून त्यांचा ताण वाढवत असल्याचा आक्रोश येथील कर्मचार्‍यांमध्ये दिसून येत आहे.