शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सेवाव्रती शिक्षकांचे ऋण जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:30 IST

व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी नावाची कथा लिहिली होती. या कथेतला नायक एक शिक्षक असतो.

ठळक मुद्देआज शिक्षक दिन : उत्कृष्ट शिक्षकांनी व्यक्त केले स्वअनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी नावाची कथा लिहिली होती. या कथेतला नायक एक शिक्षक असतो. अध्यापनाचे सरकारी कार्य एवढीच त्या शिक्षकाची जबाबदारी असते. परंतु तो त्या गावाशी इतका एकरूप होतो, की गावातल्या तक्रारी, गाºहाणी सोडविण्यासाठी लोक त्याच्याकडे येतात. हा बनगरवाडीचा शिक्षक अध्यापनाच्या चौकटीतील मर्यादा ओलांडून अख्ख्या गावाच्या विकासाचे प्रतीक होतो. घडाळ्याच्या काट्याकडे पाहून चालणाºया शिक्षकांच्या आजच्या व्यवहारी युगात बनगरवाडीतील शिक्षक सापडणे दुर्मिळच. पण काही सेवाव्रती शिक्षक आजही अध्यापनासोबतच समाजसेवेचा वसा अधिक प्रमाणिकपणे जपत आहे, त्यातलाच एक शिक्षक म्हणजे प्रमोद नागोराव वानखेडे.काटोल तालुक्यातील येणवा येथील रहिवासी असलेले प्रमोद वानखेडे १९८९ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. रायगडपासून त्यांची सेवा सुरू झाली, आज ते त्यांच्या गृह जिल्ह्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. २०१४ मध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांची काटोल तालुक्यातील लिंगा या गावात नियुक्ती झाली. गावकºयांना शिक्षणाचा गंध नव्हता, मुले शाळेत येत नव्हती, एवढेच नव्हे तर शाळासुद्धा नादुरुस्त होती, मुलेच येत नसल्यामुळे पटसंख्येचा अभाव, अशा वातावरणात शिक्षणाचे आव्हान त्यांच्यापुढे होते. पण बनगरवाडीतील शिक्षकाप्रमाणेच त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि गावकºयांमध्ये सहभागी झाले. शिक्षणाचे मोल गावकºयांना समजविले, गावाचा सरपंच आणि काही प्रमुख व्यक्तींचे प्रबोधन केले. या प्रबोधनाचा असा परिणाम झाला की गावकºयांनी शिक्षणासाठी खिशातून पैसा काढला. गोळा झालेल्या लोकवर्गणीतून शाळेचा विकास साधला, शाळेला नवीन रूप दिले. अध्यापनाच्या पद्धतीत बदल करून, मुलांमध्ये शिक्षणाप्रती आकर्षण वाढविले. काटोल तालुक्यात पहिल्या डिजिटल शाळेचा मान त्यांनी पटकाविला. त्याच्या प्रयत्नामुळे शाळेतील पटसंख्या वाढली, गावकºयांचा विश्वास त्यांच्यावर वाढला. त्यांच्यामुळे भंगार पडलेल्या वास्तूत शिक्षणाचे मंदिर घडले.कुठल्याही मानधनाशिवाय प्रशासनाला मदतशिक्षण विभागात वानखेडे यांची ख्याती आदर्श शिक्षक म्हणूनच नाही तर प्रशासनाचा दुवा म्हणून सुद्धा आहे. त्यांनी सर्वशिक्षा अभियानात गटसमन्वयक म्हणून केलेले काम व त्यांची शिक्षण क्षेत्रातील तत्परता, कामाचा उत्साह बघून शिक्षणाधिकाºयांनी त्यांना प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे धोरण यशस्वी राबविण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त केले. शाळेतील कामकाज यशस्वीपणे सांभाळून प्रशासनालाही ते तेवढ्यात उत्साहाने कुठल्याही मानधनाशिवाय मदत करीत आहेत.विद्यार्थी घडविणे हाच उद्देशमी फार काही वेगळे करीत नाही, शासन ज्यासाठी मला पगार देते, तेच काम मी करतो आहे. हे काम प्रशासनाचे असले तरी, यामागे विद्यार्थी घडविणे हाच उद्देश आहे. काम करण्याची मानसिकता आणि कामात आनंद येत असला तर कुठलीही जबाबदारी पेलणे कठीण नाही.प्रमोद वानखेडे,मुख्याध्यापक