शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

निमित्त : संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:23 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी करून आजवर संमेलनाध्यक्ष पदाला लागलेल्या टीकेच्या गालबोटावरून लिंबलोण उतरून टाकलं आहे हे नक्की !

ज्येष्ठ इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे उपासक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सुकन्या डॉ. अरुणा ढेरे यांनी वडिलांचा वारसा अतिशय समर्थपणे जपला आहे. त्यांनी आजवर कथा, कविता, कादंबरी, ललितबंध, संशोधन, संपादन, लोकसाहित्य, चरित्रलेखन असे अनेक प्रकार लीलया हाताळले असले तरी त्यांची ठळक ओळख आहे ती कवयित्री म्हणूनच! पद्मा गोळे, शांता शेळके, इंदिरा संत या कवयित्रींच्या पुढच्या काळाची कविता अतिशय ताकदीने लिहिली ती अरुणा ढेरे यांनी! मात्र तरी ती आपल्या पूर्वसुरींचा प्रभाव मिरवणारी नाही तर त्यांची स्वत:ची स्वतंत्र वाट चोखाळणारी ठरली. अरुणा ढेरे यांचं ललितलेखन ज्याप्रमाणे अगदी समोरासमोर बसून जिव्हाळ्याच्या गप्पा केल्यासारखं सहज आणि सुंदर आहे त्याचप्रमाणे त्यांची कविता आहे. एखाद्या मनस्विनीने कॅनव्हासवर आपल्याच तंद्रीत कुंचला चालवावा किंवा आषाढातल्या मध्यरात्री तानपुऱ्यावर एखादी तीव्रोत्कट बंदिश गावी तशी कविता. त्या भरजरी कवितेला, तापलेल्या सतारीच्या तारेने नकळत बोट कापावं तसा दुखून सुखावल्याचा तलम पोत आहे. तिच्यात उपजत समजूत आहे. नख लावणं नाही, विखार नाही, बोचकारणं नाही. आकांत आहे पण कर्कश्शपणा नाही. मात्र स्पष्ट भूमिका आहे. सूक्ष्म निरीक्षण आहे.शोक करावा साऱ्यांनी असा नसतो प्रसंगफक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो ...ही अतिशय संवेदनशील अभिव्यक्ती आहे.माझ्या मित्रा, अनय, शैशवतारा, मायबाई या कवितेतून मानवी नातेसंबंधांवरचा त्यांचा विश्वास वारंवार दिसतो आणि कवितेतून त्यातल्या सौन्दर्यासह वाचकापुढे येऊन उभं रहातं.हसतो आपण मनातल्या मनातमनातल्या मनात आपल्याला शोधून दमलेल्याजगातल्या शहाण्या पुरुषालाअन आपल्याला तसलं हसता येतं हेही तो जाणत नाहीमनात आणलंच तरजग हसून पेटवू शकतो आपणपण तसलं काही आपण मनातही आणत नाही !आपण किती ओळखतो एकमेकींना ?ही कॅथार्सिसची अनुभूती देणारी कविताही त्यांचीच. म्हणूनच कदाचित वाचकाला ती आपली, स्वत:ची वाटू लागते. शब्द या अभिव्यक्ती माध्यमावर कमालीचा जीव आहे त्यांचा आणि त्या शब्दाबद्दल एक कुतूहल देखील त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच मंत्राक्षर या कवितासंग्रहात एक स्वतंत्र विभागाच या कवितांचा आहे. कलावंताला शब्द कसा भेटतो? त्यांची अनेक रूपं त्यात सापडतील.सांप्रतच्या काळात इतक्या ताकदीच्या कवयित्रीने अध्यक्षपदावर विराजमान व्हावं ही खरंच काळाची गरज होती. कविता सोपी नाही. ती समाज माध्यमांवर टिचकी मारावी तितकी सहज साध्य नाही हे कळायला हवं आहे नव्याने लिहिणाऱ्यांना!अरुणा ढेरे तर स्पष्ट म्हणतातचचूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळीतेव्हा कुठे जुळतील दोन कवितेच्या ओळी !माधवी भट

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेmarathiमराठी