शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त : संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:23 IST

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी करून आजवर संमेलनाध्यक्ष पदाला लागलेल्या टीकेच्या गालबोटावरून लिंबलोण उतरून टाकलं आहे हे नक्की !

ज्येष्ठ इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे उपासक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या सुकन्या डॉ. अरुणा ढेरे यांनी वडिलांचा वारसा अतिशय समर्थपणे जपला आहे. त्यांनी आजवर कथा, कविता, कादंबरी, ललितबंध, संशोधन, संपादन, लोकसाहित्य, चरित्रलेखन असे अनेक प्रकार लीलया हाताळले असले तरी त्यांची ठळक ओळख आहे ती कवयित्री म्हणूनच! पद्मा गोळे, शांता शेळके, इंदिरा संत या कवयित्रींच्या पुढच्या काळाची कविता अतिशय ताकदीने लिहिली ती अरुणा ढेरे यांनी! मात्र तरी ती आपल्या पूर्वसुरींचा प्रभाव मिरवणारी नाही तर त्यांची स्वत:ची स्वतंत्र वाट चोखाळणारी ठरली. अरुणा ढेरे यांचं ललितलेखन ज्याप्रमाणे अगदी समोरासमोर बसून जिव्हाळ्याच्या गप्पा केल्यासारखं सहज आणि सुंदर आहे त्याचप्रमाणे त्यांची कविता आहे. एखाद्या मनस्विनीने कॅनव्हासवर आपल्याच तंद्रीत कुंचला चालवावा किंवा आषाढातल्या मध्यरात्री तानपुऱ्यावर एखादी तीव्रोत्कट बंदिश गावी तशी कविता. त्या भरजरी कवितेला, तापलेल्या सतारीच्या तारेने नकळत बोट कापावं तसा दुखून सुखावल्याचा तलम पोत आहे. तिच्यात उपजत समजूत आहे. नख लावणं नाही, विखार नाही, बोचकारणं नाही. आकांत आहे पण कर्कश्शपणा नाही. मात्र स्पष्ट भूमिका आहे. सूक्ष्म निरीक्षण आहे.शोक करावा साऱ्यांनी असा नसतो प्रसंगफक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो ...ही अतिशय संवेदनशील अभिव्यक्ती आहे.माझ्या मित्रा, अनय, शैशवतारा, मायबाई या कवितेतून मानवी नातेसंबंधांवरचा त्यांचा विश्वास वारंवार दिसतो आणि कवितेतून त्यातल्या सौन्दर्यासह वाचकापुढे येऊन उभं रहातं.हसतो आपण मनातल्या मनातमनातल्या मनात आपल्याला शोधून दमलेल्याजगातल्या शहाण्या पुरुषालाअन आपल्याला तसलं हसता येतं हेही तो जाणत नाहीमनात आणलंच तरजग हसून पेटवू शकतो आपणपण तसलं काही आपण मनातही आणत नाही !आपण किती ओळखतो एकमेकींना ?ही कॅथार्सिसची अनुभूती देणारी कविताही त्यांचीच. म्हणूनच कदाचित वाचकाला ती आपली, स्वत:ची वाटू लागते. शब्द या अभिव्यक्ती माध्यमावर कमालीचा जीव आहे त्यांचा आणि त्या शब्दाबद्दल एक कुतूहल देखील त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच मंत्राक्षर या कवितासंग्रहात एक स्वतंत्र विभागाच या कवितांचा आहे. कलावंताला शब्द कसा भेटतो? त्यांची अनेक रूपं त्यात सापडतील.सांप्रतच्या काळात इतक्या ताकदीच्या कवयित्रीने अध्यक्षपदावर विराजमान व्हावं ही खरंच काळाची गरज होती. कविता सोपी नाही. ती समाज माध्यमांवर टिचकी मारावी तितकी सहज साध्य नाही हे कळायला हवं आहे नव्याने लिहिणाऱ्यांना!अरुणा ढेरे तर स्पष्ट म्हणतातचचूड प्राणांची लावून कर आयुष्याची होळीतेव्हा कुठे जुळतील दोन कवितेच्या ओळी !माधवी भट

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेmarathiमराठी