शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५७० शाळांमधील शिक्षकांची पोषण आहाराची डोकेदुखी संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 21:24 IST

Nagpur News आता शालेय पोषण आहार विभागाने शिक्षकांची ही डोकेदुखीच संपविली आहे. महापालिकेच्या हद्दीतील ५७० शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी ४३ बचत गटांना दिली आहे.

नागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित करण्यात येतो. या पोषण आहाराची जबाबदारी शाळेतील एखाद्या शिक्षकावर सोपविली जाते. पोषण आहाराच्या वितरणात थोडी जरी गडबड झाली की, त्याची भरपाई शिक्षकांना करावी लागते. त्यामुळे बहुतांश शिक्षक ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात. पण आता शालेय पोषण आहार विभागाने शिक्षकांची ही डोकेदुखीच संपविली आहे. महापालिकेच्या हद्दीतील ५७० शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी ४३ बचत गटांना दिली आहे.

यात महापालिकेच्या १०० टक्के शाळा असून, उर्वरित शाळा खासगी अनुदानित आहेत. आता बचत गटांच्या माध्यमातून ९० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. बचत गटांना शिक्षण विभागातर्फे तांदूळ पुरविला जाईल व उर्वरित साहित्य हे बचत गटांना खरेदी करून पोषण आहार तयार करायचा आहे. जुलै २०२२ पासून ही प्रक्रिया रखडली होती. पोषण आहार विभागातर्फे याची निविदा काढून बचत गटांना वितरणाची जबाबदारी दिली आहे.

- १४२ शाळांमध्ये स्वत:चे किचन

महापालिकेच्या हद्दीतील मनपाच्या व खासगी अनुदानित शाळांपैकी बहुतांश शाळांना बचत गटांतर्फे पोषण आहार पुरविला जाईल. परंतु, अजूनही १४२ शाळांनी पोषण आहाराची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे. या शाळांचे स्वत:चे किचन असून, पोषण आहार तयार करण्यासाठी त्यांनी स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा