शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरात वाढतेय वाहनांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाकडे वेगाने अग्रेसर असलेल्या नागपूर शहरात लोकांचे राहणीमानदेखील बदलताना दिसून येत आहे. नवीन वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, यामुळे शहरात वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. २०१३ सालापासून शहरात ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या कालावधीत शहर ‘आरटीओ’ला थोडाथोडका नव्हे तर ३०१ ...

ठळक मुद्देसाडेचार वर्षांत ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी : कराच्या माध्यमातून शहर ‘आरटीओ’ला ३०१ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकासाकडे वेगाने अग्रेसर असलेल्या नागपूर शहरात लोकांचे राहणीमानदेखील बदलताना दिसून येत आहे. नवीन वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला असून, यामुळे शहरात वाहनांची संख्यादेखील वाढत आहे. २०१३ सालापासून शहरात ८२ हजारांहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे या कालावधीत शहर ‘आरटीओ’ला थोडाथोडका नव्हे तर ३०१ कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. यातील ७६ टक्के महसूल हा नवीन वाहनांच्या नोंदणीतून मिळाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ‘आरटीओ’कडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१३ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत शहरात किती नवीन वाहनांची नोंदणी झाली व त्यांच्यापासून किती कर मिळाला, वंशनिमय या बस कंपनीने किती कर भरलेला नाही, किती वाहनचालकांपासून कर वसूल होऊ शकलेला नाही, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, या कालावधीत शहर ‘आरटीओ’त ८२ हजार ४२४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. याच्या करापोटी ‘आरटीओ’ला २३१ कोटी ८३ लाख ८४ हजार ८२० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. दरम्यान, १ जानेवारी २०१३ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत‘आरटीओ’ला विविध करांच्या माध्यमातून मिळालेला एकूण महसूल हा ३०१ कोटी ५८ लाख ९४ हजार ५९५ रुपये इतका होता.दरम्यान वंशनिमय या बस कंपनीने १० बसेसचा कर भरलेला नाही. थकीत कराबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे, असे उत्तरात नमूद आहे.३५ लाखांच्या कराची वसुली नाहीदरम्यान, या कालावधीत २०६ वाहनधारकांनी ‘आरटीओ’चा कर थकविला आहे. कराची रक्कम ही ३५ लाख ९३ हजार ७८८ इतकी आहे. ही वसुली अद्यापपर्यंत झालेली नाही. दरम्यान, वेळेवर कर न भरणाºया वाहनचालकांना दर महिन्याला २ टक्के व्याजाप्रमाणे दंड आकारण्यात येतो, असे ‘आरटीओ’ने स्पष्ट केले आहे.