शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

अरेच्च्या... वीज खंडित झालेल्या ग्राहकांचा आकडा एवढा माेठा? काय आहे गौडबंगाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 07:30 IST

Nagpur News कंपनीचे संचालक (ऑपरेशन) यांनी काढलेल्या आंतरिक परिपत्रकानुसार कंपनीने १ एप्रिल २०२१ पासून वीज बिल थकविणाऱ्या ७ लाख ३२ हजार ग्राहकांचे कनेक्शन तात्पुरते कापण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे मुख्यालयाचे विशेष पथक करणार सर्वेक्षणमहावितरणप्रमुखांनाच संशय

आशिष राॅय

नागपूर : एमएसईडीसीएलतर्फे लाखाे वीज थकबाकीदारांचे कनेक्शन कपात केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, स्वत: कंपनीचे महासंचालक (सीएमडी) विजय सिंघल यांनीच या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. सिंघल यांनी वीज खंडित झालेल्या ग्राहकांच्या सर्वेक्षणासाठी चार विशेष पथके नियुक्त केली आहेत जे फील्डवरील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी सादर केलेला वीज कनेक्शन कापण्याचा डाटा खरा आहे की खाेटा, हे तपासतील.

कंपनीचे संचालक (ऑपरेशन) यांनी काढलेल्या आंतरिक परिपत्रकानुसार कंपनीने १ एप्रिल २०२१ पासून वीज बिल थकविणाऱ्या ७ लाख ३२ हजार ग्राहकांचे कनेक्शन तात्पुरते कापण्यात आले आहेत. मात्र, सीएमडी यांच्या मते हे अशक्य आहे. सध्याच्या काळात ४८ तास विजेशिवाय राहणे कठीण जात असताना एवढ्या माेठ्या प्रमाणात ग्राहक वीज पुरवठ्याशिवाय राहत असतील, हे अशक्य आहे. यावरून एकतर वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी अनधिकृत वीज कनेक्शन जाेडले असेल किंवा कर्मचाऱ्यांनी दिलेला डाटा चुकीचा असेल. दोन्ही परिस्थिती अतिशय चिंताजनक आहेत. कारण यामुळे तोटा आणि वसूल न झालेली थकबाकी वाढत आहे. त्यामुळे कंपनीच्या सर्व मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांना विशेष पथकाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.

सिंघल यांनी मुख्यालयातील आठ अधिकाऱ्यांचे चार पथके तयार केली आहेत, जे सादरीत डाटाच्या स्तरावर उलट तपासणी करतील. नागपूर झाेनसाठी कार्यकारी अभियंता नीलकमल चाैधरी व उपकार्यकारी अभियंता भालचंद्र कुळकर्णी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील जवळपास ३५ हजार ग्राहकांचे कनेक्शन एप्रिल २०२१ पाासून कापण्यात आले आहेत, हे विशेष. त्यांनी क्राॅस तपासणी केलेल्या अहवालांचे तपशीलवार पुनरावलोकन केले जाईल आणि डिस्कनेक्ट केलेल्या ग्राहकांच्या खोट्या अहवालाकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असा इशाराही दिला आहे.

महावितरणकडे ग्राहकांची थकबाकी आता ७५,००० कोटींच्या पुढे गेली असून, कंपनीसाठी हा आकडा खाली आणणे अत्यावश्यक झाले आहे; अन्यथा भविष्यात कर्ज मिळणार नाही. बहुतांश अधिकाऱ्यांना हे कळत असताना काही अधिकारी त्यांचे सरधाेपट मार्ग साेडायला तयार नाहीत.

टॅग्स :electricityवीज