शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

महाराष्ट्रात 'एनआरसी' व 'सीएए' लागू करू नये : नागपुरात मुस्लिमांचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:42 IST

: भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.

ठळक मुद्देमोर्चाने केले शासनाला आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. केंद्र सरकारने संसदेत एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे पारित करून अख्ख्या देशात हिंसात्मक वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले. 

मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे व केंद्र सरकारने एनआरसी व सीएए लादलेले हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा विधिमंडळावर आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात समावेश होता. हजारोच्या संघटने मुस्लीमबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात रंगा-बिल्लाचे सरकार सुरू आहे. देशाची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी निरर्थक कायदे तयार केले जात आहेत. त्यामुळे देशात हिंसाचार माजला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा देश संकटात असून, सरकारकडे बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठलेही धोरण नाही. महाराष्ट्रात असे कायदे लागू होऊ देणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘एनआरसी’ व ‘सीएए’ असे कायदे लागू करू नये. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण प्रदान केले होते. परंतु भाजप सरकारने मुस्लीम आरक्षणाला विरोध केला. आमचे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावर आधारित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. 

नेतृत्व : जावेद पाशा, डॉ. अनवर सिद्धीकी, शिराज अहमद कासमी, शाहीद रंगुनवाला, हाजी परवेज बेग, रुबीना पटेल, शाहिस्ता खान, शकील महोम्मदी, प्रा. शरद वानखेडे, वसीम शेख, तौसिफ जाफर खान, अफजल फारुक, शकील महोम्मद, शकील पटेल, हनीफ कुरेशी, वकारुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, शमीम एजाज.

टॅग्स :Morchaमोर्चाMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक