शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

महाराष्ट्रात 'एनआरसी' व 'सीएए' लागू करू नये : नागपुरात मुस्लिमांचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:42 IST

: भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.

ठळक मुद्देमोर्चाने केले शासनाला आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. केंद्र सरकारने संसदेत एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे पारित करून अख्ख्या देशात हिंसात्मक वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले. 

मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे व केंद्र सरकारने एनआरसी व सीएए लादलेले हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा विधिमंडळावर आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात समावेश होता. हजारोच्या संघटने मुस्लीमबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात रंगा-बिल्लाचे सरकार सुरू आहे. देशाची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी निरर्थक कायदे तयार केले जात आहेत. त्यामुळे देशात हिंसाचार माजला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा देश संकटात असून, सरकारकडे बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठलेही धोरण नाही. महाराष्ट्रात असे कायदे लागू होऊ देणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘एनआरसी’ व ‘सीएए’ असे कायदे लागू करू नये. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण प्रदान केले होते. परंतु भाजप सरकारने मुस्लीम आरक्षणाला विरोध केला. आमचे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावर आधारित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. 

नेतृत्व : जावेद पाशा, डॉ. अनवर सिद्धीकी, शिराज अहमद कासमी, शाहीद रंगुनवाला, हाजी परवेज बेग, रुबीना पटेल, शाहिस्ता खान, शकील महोम्मदी, प्रा. शरद वानखेडे, वसीम शेख, तौसिफ जाफर खान, अफजल फारुक, शकील महोम्मद, शकील पटेल, हनीफ कुरेशी, वकारुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, शमीम एजाज.

टॅग्स :Morchaमोर्चाMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक