शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात 'एनआरसी' व 'सीएए' लागू करू नये : नागपुरात मुस्लिमांचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:42 IST

: भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.

ठळक मुद्देमोर्चाने केले शासनाला आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. केंद्र सरकारने संसदेत एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे पारित करून अख्ख्या देशात हिंसात्मक वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले. 

मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे व केंद्र सरकारने एनआरसी व सीएए लादलेले हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा विधिमंडळावर आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात समावेश होता. हजारोच्या संघटने मुस्लीमबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात रंगा-बिल्लाचे सरकार सुरू आहे. देशाची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी निरर्थक कायदे तयार केले जात आहेत. त्यामुळे देशात हिंसाचार माजला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा देश संकटात असून, सरकारकडे बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठलेही धोरण नाही. महाराष्ट्रात असे कायदे लागू होऊ देणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘एनआरसी’ व ‘सीएए’ असे कायदे लागू करू नये. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण प्रदान केले होते. परंतु भाजप सरकारने मुस्लीम आरक्षणाला विरोध केला. आमचे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावर आधारित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. 

नेतृत्व : जावेद पाशा, डॉ. अनवर सिद्धीकी, शिराज अहमद कासमी, शाहीद रंगुनवाला, हाजी परवेज बेग, रुबीना पटेल, शाहिस्ता खान, शकील महोम्मदी, प्रा. शरद वानखेडे, वसीम शेख, तौसिफ जाफर खान, अफजल फारुक, शकील महोम्मद, शकील पटेल, हनीफ कुरेशी, वकारुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, शमीम एजाज.

टॅग्स :Morchaमोर्चाMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक