शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महाराष्ट्रात 'एनआरसी' व 'सीएए' लागू करू नये : नागपुरात मुस्लिमांचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:42 IST

: भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले.

ठळक मुद्देमोर्चाने केले शासनाला आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मुस्लीम परिषद, जमाते इस्लामी हिंद व अन्य संघटनांनी गुरुवारी विधिमंडळावर भव्य मोर्चा काढला. केंद्र सरकारने संसदेत एनआरसी (नॅशनल रजिस्टर सिटीझन्स) व सीएए (नागरिकता संशोधन अधिनियम) हे कायदे पारित करून अख्ख्या देशात हिंसात्मक वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात हे कायदे लागू करू नये, असे आवाहन मुस्लीम समाजाच्या मोर्चाने सरकारला केले. 

मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे व केंद्र सरकारने एनआरसी व सीएए लादलेले हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी भव्य मोर्चा विधिमंडळावर आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लीम महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणात समावेश होता. हजारोच्या संघटने मुस्लीमबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बल तैनात करण्यात आले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात रंगा-बिल्लाचे सरकार सुरू आहे. देशाची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. विकासाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष भरकटविण्यासाठी निरर्थक कायदे तयार केले जात आहेत. त्यामुळे देशात हिंसाचार माजला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. हा देश संकटात असून, सरकारकडे बेरोजगारी दूर करण्यासाठी कुठलेही धोरण नाही. महाराष्ट्रात असे कायदे लागू होऊ देणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘एनआरसी’ व ‘सीएए’ असे कायदे लागू करू नये. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने मुस्लीमांसाठी ५ टक्के आरक्षण प्रदान केले होते. परंतु भाजप सरकारने मुस्लीम आरक्षणाला विरोध केला. आमचे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावर आधारित होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. मोर्चाला चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. 

नेतृत्व : जावेद पाशा, डॉ. अनवर सिद्धीकी, शिराज अहमद कासमी, शाहीद रंगुनवाला, हाजी परवेज बेग, रुबीना पटेल, शाहिस्ता खान, शकील महोम्मदी, प्रा. शरद वानखेडे, वसीम शेख, तौसिफ जाफर खान, अफजल फारुक, शकील महोम्मद, शकील पटेल, हनीफ कुरेशी, वकारुद्दीन अन्सारी, निजामुद्दीन अन्सारी, शमीम एजाज.

टॅग्स :Morchaमोर्चाMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक