शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आता पाण्यासाठी जिल्ह्यांमध्ये वाॅर, जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर आवश्यक

By आनंद डेकाटे | Updated: June 7, 2025 17:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : विदर्भ पाणी परिषदेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याचे वाॅर सुरू झालेलं आहे. ऑपरेशन सिंदुरच्या वेळी आपल्या पंतप्रधानांनी सिंधु जल करार मागे घेण्याचा निर्णय घेताच पाकिस्तान जगभरात मदत मागू लागला. इतके त्या पाण्याचे महत्त्व आहे. पाण्यासाठी आता देशांदेशांत किंवा राज्या-राज्यांमध्येच नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये वाॅर सुरू झाले आहेत. नाशिक, नगर व मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये असे वाॅर पाहायला मिळतात. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर होय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ येथे विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते. आमदार डॉ. परिणय फुके,प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अतुल वैद्य, वनामतीच्या संचालक डॉ. वसुमनी पंत, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक राजेश सोनटक्के, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर, राष्ट्रीय मृदा विज्ञान ब्युरो नागपूरचे संचालक डॉ. नितीन पाटील, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे, प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी एक टक्के पाण्यावर संपूर्ण जग व जीवन चाललेल आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ कारणच पाणी होते. सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. आता सिंचनाची बरीच कामे झाली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चांगले शास्त्रोक्त परिणाम दिसून येत आहेत. ज्या गावात जलयुक्त शिवारची कामे झाली त्या गावातील पाण्याची पातळी वर आली असून दुष्काळाचा धोका कमी झाला आहे.

नदी-नाले ओढे प्रदूषित झाले आहेत. यात १० टक्के वाटा उद्योगांचा असला तरी ९० टक्के वाटा आपल्या सर्वांचा आहे. याचा परिणाम शेतीसह सर्वांवरच होत आहे. पाण्याचा पुर्नवापर आणि जलधारण ही काळाची गरज आहे. ते जाणीवपूर्वक केले नाही तर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ राजू हिवसे यांनी मानले. 

वैनगंगा-नळगंगा सह पाच नदीजोड प्रकल्पवैनगंगा-नळगंगा हा नदीजोड प्रकल्प विदर्भाचे चित्र बदलवणारा ठरणार आहे. यासोबतच राज्य सरकारने पाच नवीन नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच तापी जलपुनर्भरण योजनेबाबत मध्यप्रदेश सरकारसोबत करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे २० ते २२ टिएमसी पाणी अमरावती विभागातील जिल्ह्यांना मिळणार आहे, या प्रकल्पातून महाराष्ट्र जल स्वयंपूर्ण कसा होईल, याचा संपूर्ण रोडमॅपच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितला.

जलदूत निर्माण करणार - कुलगुरू डाॅ. खोडेपाण्याच्या योग्य वापराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून जलदूत निर्माण करणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाई