शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नैसर्गिक आपत्तीची माहिती देण्यासाठी आता ‘सॅटेलाईट’ तयार करणार; मदत व पुनर्वसन विभागाचा पुढाकार

By आनंद डेकाटे | Updated: September 29, 2023 16:36 IST

शास्त्रज्ञांची नियुक्ती करणार, विविध विभागांनाही जोडणार

नागपूर : पूर, भूकंप आदींसारख्या नैसर्गीक आपत्तीची माहिती आधीच मिळाली तर व त्या रोखता येऊ शकतात. होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यादृष्टीने मदत व पुनर्वसन विभागाने पुढाकार घेत एक ‘सॅटेलाईट’(उपग्रह) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.

नागपुरात गेल्या २३ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले होते. आढावा घेतल्यानंतर पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. अनिल पाटील यांनी सांगितले की, नैसर्गीक आपत्तीत जीवित हानी व मालमत्तांचे बरेच नुकसान हाेते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागाचा स्वत:चा ‘सॅटेलाईट’ तयार करण्यात येणार आहे.

भूगर्भातील घडामोडी, हवामान, पाऊस आदींबाबत किमान २४ तासापूर्वी तसेच जास्तीत जास्त एक आठवड्यापूर्वी याद्वारे माहिती उपलब्ध होऊ शकते. यासाठी एका शास्त्रज्ञाची नियुक्ती केली जाईल. तसेच कृषीसह विविध विभागांना या उपग्रहाचा फायदो होऊ शकोत, अशा सर्व विभागांना सुद्धा यात सहभागी करून घेतले जाईल. हा उपग्रह लॉंच करायला दीड ते दोन वर्षे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

- प्रत्येक गावात प्रथमोपचार किट

नैसर्गीक आपत्तीच्या काळात एखाद्याला रूग्णालयात हलवण्याची वेळ आलीच तर त्यापूर्वी दवाखान्यात पोहोचेपर्यंत प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक असते. तसे झाले नाही. त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे गावपातळीवर अशा प्रथमोपचाराची किट उपलब्ध करून देण्याचा निर्णयही मदत व पुनर्वसन विभाग घेत असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.

- गल्लीबोळात जाण्यासाठी अग्नीशमन बाईक

अग्नीशमनाच्या गाळ्या या गल्लीबोळात जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणी घटना घडली तर त्यांना तातडीने मदत मिळत नाही. त्यामुळे अशा गल्लीबोळाच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्नीशमन बाईक तयार करण्याची योजनाही मदत व पुनर्वसन विभाग तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्तीnagpurनागपूर