शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

आता माघार नाहीच!

By admin | Updated: October 15, 2016 03:28 IST

नागपूर-विदर्भातूनच दोन ज्येष्ठ समीक्षकांनी परस्परांविरुद्ध निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन होऊन

मदन कुलकर्णी : उपेक्षित साहित्य प्रवाहांना संमेलनाच्या मंचावर आणण्याचा संकल्प नागपूर : नागपूर-विदर्भातूनच दोन ज्येष्ठ समीक्षकांनी परस्परांविरुद्ध निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ तिसराच उमेदवार घेईल. ते टाळण्यासाठी कुणीतरी एकाने माघार घ्यावी, असे कुणाला वाटत असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे. याच भावनेतून मलाही दोन फोन आलेत. परंतु माझा निर्धार पक्का आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही, अशा ठाम शब्दात ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मदन कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली. शुक्रवारी ते विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. संमेलनाध्यक्षाचे विचार गांभीर्याने समाजापर्यंत पोहोचतात म्हणून मी ही निडणूक लढवित आहे. माझा अजेंडा खूपच स्पष्ट आहे. ग्रामीण, दलित व आदिवासी साहित्यामध्ये अनेक जण अतिशय ताकदीने लिहित आहेत. परंतु त्यांना अजूनही मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संधी मिळत नाही. ती मिळावी असा माझा प्रयत्न आहे. याशिवाय दिव्यांगांच्या क्षेत्रातही कसदार साहित्य निर्मिती होत आहे. परंतु तिकडेही साहित्य विश्वाचे लक्ष नाही. या सर्व उपेक्षित घटकांसोबतच मुख्य प्रवाहातील साहित्याला एक नवा विचार देता यावा हा माझा प्रयत्न आहे. हे संमेलन साधेपणाने व्हावे, या महामंडळाच्या भूमिकेचे मी समर्थन करतो. संमेलनाचा अध्यक्ष कुणीही होवो. त्याने महामंडळाकडून मिळणारा एक लाखाचा निधी भारतीय लष्कराच्या कल्याणार्थ द्यायला हवा आणि वर्षभर जी साहित्यविषयक भ्रमंती करायची आहे ती स्वखर्चाने करायला हवी, असे मला वाटते, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी) ...म्हणून लिफाफा बंद होता मी विदर्भ साहित्य संघाकडे जो लिफाफा सोपवला त्यात माझा उमेदवारी अर्जच होता. परंतु माझी उमेदवारी वैध ठरेपर्यंत माझे सूचक व अनुमोदक यांची नावे समोर यायला नको, असे मला वाटत होते. कारण, ती नावे समोर आली असती तर माध्यमांचे फोन त्यांना सुरू झाले असते. निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी उमेदवारी वैध असल्याचे जाहीर करेपर्यंत असा त्रास कुणाला होऊ नये, केवळ इतकाच हेतू होता. म्हणूनच मी बंद लिफाफा दिला व तो १० आॅक्टोबरपर्यंत उघडू नये, अशी सूचनाही विदर्भ साहित्य संघाला केली होती, असा खुलासाही यावेळी डॉ. मदन कुलकर्णी यांनी केला.