शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आता निवडणूक कामातून पळवाट नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 11:02 IST

निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार विभागाला पत्रनिवडणूक विभागाच्या एनओसीनंतरच पगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीचे काम हे देशहिताचे काम असले तरी निवडणूक लागली की, अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळी कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून पळवाट काढत असतात. परंतु आता अशा कर्मचाऱ्यांना पळवाट काढता येणार नाही. कारण निवडणूक विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंरतच (एनओसी) अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार काढावे, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला दिले आहे. यामुळे निवडणुकीच्या कामापासून पळवाट काढणाºयांची चांगलीच अडचण होणार आहे.निवडणुकीचे काम देशहिताचे आहे. या कामाला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणूक होणार असून याची तयारी प्रशासनकडून करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात नागपूर आणि रामटेक अशा दोन लोकसभा जागा आहेत. या कामासाठी जवळपास ४० हजार कर्मचाऱ्यांनी गरज भासणार आहे.महूसल विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा या कामासाठी घेण्यात येते. या करता जिल्हा निवडणूक विभागाने सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे.मात्र आतापर्यंत अनेक विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नावेच पाठविण्यात आली नाही. काहींची नावे असली तरी अद्याप नोंद केली नाही. यामुळे निवडणुकीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे.संबंधित विभागप्रमुखांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आली नसल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार करताना निवडणूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय पगारच काढू नये, असे पत्रच जिल्हाधिकारी यांनी कोषागार विभागाला पाठविले आहे. यामुळे आता निवडणूक कामात रुजू न होणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांना पगारच होणार नसल्याचे सांगण्यात येते.त्याच प्रमाणे काही विभागांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्रांकडून मिळाली.

टॅग्स :Electionनिवडणूक