शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आता एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाचे ओझे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:47 IST

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकताच एक आदेश जारी करून एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची नोंद सातबारावर करणे अनिवार्य नाही, असे स्पष्ट केले. या आदेशामुळे शेतकऱ्यांची पायपीट थांबली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेशशेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेने पीक कर्ज मंजूर केल्यानंतर त्याचा बोजा सातबारावर नोंदवित नाही, तोपर्यंत बँक शेतकऱ्यांना त्या रकमेची उचल करण्यासाठी परवानगी देत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्याचा शोध घेण्यापासून तहसील कार्यालयाचे खेटे घालण्यापर्यंतचा खटाटोप करावा लागतो. मात्र, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नुकताच एक आदेश जारी करून एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची नोंद सातबारावर करणे अनिवार्य नाही, असे स्पष्ट केले. तशा सूचनाही त्यांनी महसूल विभाग व बँक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांची पायपीट थांबली असून, त्यांना दिलासा मिळाला आहे.राज्य शासनाने पीक कर्ज घेण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा आणखी क्लिष्ट केली आहे.पीक कर्ज मंजूर करण्यासाठी सातबारा कोरा असणे तसेच ते बँकेने मंजूर केल्यानंतर त्या कर्जाच्या रकमेची नोंद सातबारावर करणे अनिवार्य केले होते. सध्याच्या ‘आॅनलाईन’ पद्धतीमध्ये कोणताही फेरफार करण्यासाठी किमान १५ दिवसांची तांत्रिक अटही शासनाने घातली. ही सर्व कामे शेतकऱ्यांनाच करावी लागत असल्याने ऐन हंगामात त्यांना पैशासोबतच वेळही खर्ची घालवावा लागतो.या संपर्ण प्रकाराबाबत लोकमतमध्ये वारंवार वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तांमध्ये ‘आॅनलाईन’ सातबारासह अन्य तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकला होता. तहसील कार्यालयातील सातबारा व्हेंडर मशीन व लिंक बंद असणे, हस्तलिखित सातबारा न स्वीकारणे, प्रसंगी तलाठी किंवा महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्याचा शोध घेत फिरणे यासह अन्य बाबी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यांमध्ये कराव्या लागल्या. त्यातून त्यांना मनस्तापही सहन करावा लागला.या सर्व बाबींची प्रशासनाने दखल घेत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल एक लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जानी नोंद सातबारावर करणे अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करीत तसा आदेश संबंधित कार्यलयावर बँकांना पाठविला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी