शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

आता व्हीसीए आणि नागपूर पोलिसांदरम्यान टी-२०

By admin | Updated: January 31, 2017 02:37 IST

भारत आणि इंग्लंड दरम्यानचा टी-२० सामना रविवारी पोलिसांच्या विना परवानगीविनाच पार पडला. मात्र,

सुरक्षेच्या मुद्यांवरून मतभेद : विना परवानगीने झाला सामना नागपूर : भारत आणि इंग्लंड दरम्यानचा टी-२० सामना रविवारी पोलिसांच्या विना परवानगीविनाच पार पडला. मात्र, या सामन्याच्या निमित्ताने विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि शहर पोलिसांमध्ये सुरक्षेच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवरून मतभेद झाल्याने व्हीसीए आणि पोलिसांदरम्यान टी-२० रंगला आहे. या सामन्यातून धक्कादायक परिणाम पुढे येण्याचेही संकेत मिळाले आहेत. सुरक्षेच्या अनेक महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित करून आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याची व्हीसीएसच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी चालविली होती. मात्र, त्यामुळे मोठा धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्यामुळे पोलिसांनी व्हीसीए पदाधिकाऱ्यांना सुरक्षेच्या अनेक महत्त्वपूर्ण बाबींना प्राधान्य देण्याचे सांगितले. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता, अग्निशमन दल, आपात्कालीन मार्गाचे निर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र, सुरक्षा रक्षक म्हणून वावरणाऱ्यांची यादी, त्यांची शहानिशा करण्यासाठी पोलिसांना त्यांचे नंबर, पार्किंग व्यवस्था आदी सुरक्षेबाबतच्या या सूचना होत्या. यासंबंधीचे पत्र देतानाच त्यांना सशर्त परवानगी दिली होती. व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी अखेरपर्यंत या बाबींची पूर्तता न केल्यामुळे पोलिसांनी दिलेली सामन्याची सशर्त परवानगी रद्द केली. ही परवानगी नाकारतानाच विना परवानगी क्रिकेट सामना घेतला गेला अन् कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्यास कारवाई करू, असा इशाराही दिला. मात्र, त्याला दाद न देता व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी क्रिकेट सामना आयोजित केला. इकडे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि हजारोंच्या संख्येत येणारे क्रिकेटप्रेमी या सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आपली सर्व शक्ती लावून बंदोबस्त केला. हजारोच्या संख्येत या मार्गावर वाहने धावत असतानादेखील जागोजागी आणि प्रसंगी मध्ये शिरून पोलिसांनी वाहतुकीला अडसर किंवा कुणाच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घेतली. सामना होण्याच्या एक दिवसापूर्वीपासून तो सामना संपल्यानंतरही पोलिसांचा बंदोबस्त सुरूच होता. सोमवारी पहाटे २ वाजता पोलिसांचा क्रिकेट सामन्याचा बंदोबस्त संपला. पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. मात्र, या सामन्याच्या निमित्ताने आता अनेक घडामोडी सुरू झाल्या आहेत.(प्रतिनिधी) लोकमतने केले उघड दरम्यान, हा सामना परवानगी नसतानाच खेळवला गेल्याची बाब गोपनीय ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न झाले. मात्र, लोकमतने व्हीसीएने आंतरराष्टीय क्रिकेट सामन्याचे आयोजन विना परवाना केल्याचे वृत्त सोमवारी ठळकपणे प्रकाशित केले. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. या बाबीची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आल्यामुळे शहर पोलिसांना अनेकांकडून विचारणा होत आहे. त्यामुळे आता पोलिसही अडचणीत सापडले आहेत. त्याचमुळे सोमवारी दिवसभर पोलीस विभागात वरिष्ठांची धावपळ, बैठका आणि वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू होती. त्यातून व्हीसीए आणि पोलिसांदरम्यान टी-२० चा सामना रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.