शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

आता विद्यार्थ्यांचीही ‘हायटेक’ हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:38 IST

अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देहजेरी पुस्तकाऐवजी चक्क ‘बायोमेट्रिक’ प्रणाली : विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर अशीही नजर

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. नियमांना धाब्यावर बसवून पारंपरिक हजेरी पुस्तकात विद्यार्थ्यांची उपस्थितीही दाखविण्यात येते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘हायटेक’ नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चक्क ‘बायोमेट्रिक’ प्रणालीचा उपयोग सुरू केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात येत आहे.विदर्भातील अशाप्रकारचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.शिकवणी वर्गांमुळे अकरावी-बारावीदरम्यान विद्यार्थी महाविद्यालांमध्ये येऊन वर्गाला उपस्थिती लावत नाहीत. शिकवणी वर्गांशी ‘लिंक’ असलेल्या अनेक महाविद्यालयांत तर त्यांना तशी सूटच देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित असतानादेखील हजेरीपुस्तकावर त्यांना हजर दाखविण्यात येते. शिक्षण उपसंचालक कार्यालायाकडून विद्यार्थ्यांच्या हजेरीसंदर्भात यंदा काही महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आल्या होत्या. शिवाय वर्गांमध्ये उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असतो व महाविद्यालयांचे महत्त्वच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.वरील बाबी लक्षात घेऊन हुडकेश्वर येथील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाने ‘हायटेक’ हजेरीचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व या वर्षीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली.यासाठी महाविद्यालयाने तीन ‘बायोमेट्रिक मशीन’ लावल्या असून शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथे ‘पंचिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. त्यापद्धतीचे ओळखपत्रदेखील त्यांना बनवून देण्यात आले आहेत. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यकच आहे. त्यांना शिस्त लागावी, तसेच उपस्थिती वाढावी आणि आमच्याकडेदेखील अधिकृत ‘डाटा’ उपलब्ध रहावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शाळेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे यांनी सांगितले.बाहेरील राज्यांत आहे प्रणालीमहाराष्ट्रात मुंबईमधील मोजक्या महाविद्यालयांत हजेरीची ही प्रणाली दिसून येते. तर बाहेरील राज्यांमध्येदेखील काही ठिकाणी ही प्रणाली राबविण्यात येते. उत्तर प्रदेश शासनाने यासंदर्भात निर्णय घेतला होता. राजस्थान, कर्नाटक या राज्यांतदेखील काही ठिकाणी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्यात आले होते.महाविद्यालयांनी तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाशिकवणी वर्गांची ‘क्रेझ’ इतकी वाढली आहे की कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व संपण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडूनदेखील या बाबीला गंभीरतेने घेण्यात येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे उपस्थिती नोंद व्हावी, तसेच गैरप्रकार नियंत्रणात यावे, यासाठी महाविद्यालयानी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची आवश्यकता आहे.