शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी आता दिल्लीवर दबाव आणणार

By admin | Updated: March 27, 2016 02:39 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता काँग्रेस व भाजपा विरोधी असलेल्या आप, बसपासह विविध पक्षांना सोबत घेऊन...

भाजप व काँग्रेस विरोधी पक्षांची घेणार साथ : श्रीहरी अणे यांनी मांडली भूमिकानागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता काँग्रेस व भाजपा विरोधी असलेल्या आप, बसपासह विविध पक्षांना सोबत घेऊन दिल्लीतील केंद्र सरकारवर दबाब आणण्यात येईल, अशी माहिती विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे दिली. टिळक पत्रकार भवन येथे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करतांना त्यांनी विदर्भ आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्याची निर्मिती करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. त्यामुळे आता दिल्लीवर दबाव आणला जाईल. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र विदर्भाला समर्थन दिले आहे. बहुजन समाज पार्टीचा विदर्भाला पाठिंबा आहेच. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटाचे विदर्भाला समर्थनच आहे. याशिवाय ममता बॅनर्जी, नितीश चौधरी यांच्यासह डावे पक्ष आदी जे कुणी विदर्भाला समर्थन देऊ इच्छितात त्या सर्वांची मदत घेऊन दिल्लीतील केंद्र सरकारवर दबाब निर्माण केला जाईल. येत्या ३१ मार्च रोजी दिल्लीमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात आपण सहभागी होऊ. तेव्हा विदर्भासाठी ज्यांना ज्यांना भेटता येईल, त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि भाजपमधील अनेक नेत्यांनी सुद्धा स्वतंत्र विदर्भाला जाहीर समर्थन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाबाबत डोकं वापरणच बंद केले आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी आता कुणी टाळू शकत नाही. ही मागणी केवळ भावनिक नाही. ती अस्तित्वासाठी सुद्धा नाही तर ती वस्तुस्थिती आहे. त्याची ठोस कारणे आहे, परंतु ती कारणे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना जाणून घ्यायचीच नाहीत, असेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या विकासासाठी प्राथमिकता चुकत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील प्रश्नांना येथे प्राथमिकताच नाही. नक्षलवादसुद्धा यातूनच निर्माण झालेला आहे. पनवेलचे विमानतळ महत्त्वाचे की, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यावर उपाय महत्त्वाचा. असा प्रश्न उभा राहतो तेव्हा पनवेलचे विमानतळ अधिक महत्त्वाचे आहे, यासाठी बहुमत असते. अगोदर विदर्भाला पैसै दिले जात नव्हते. दिले तर खर्च होत नव्हते. दुसऱ्या वर्षी ते वळविले जायचे. परंतु आता तर राज्य सरकारकडे पैसे सुद्धा नाही. विदर्भाचा विकास करण्याची महाराष्ट्राची पत राहिली नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होऊच शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी टिळक पत्रकार भवनचे प्रदीप मैत्र व ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जोसेफ राव यांनी आभार मानले. विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ आदी व्यासपीठावर होते. मी निवडणूक लढणार नाहीमी यापुढे विदर्भाच्या आंदोलनात पूर्णवेळ सक्रि य राहील. विदर्भात जास्त वेळ घालवणार आहे. मी निवडणूक लढणार नाही. परंतु जे कुणी विदर्भाचे समर्थक उभे राहतील, त्यांना मदत करेल. त्यांना विदर्भाचे प्रतिनिधी म्हणून मदत करेल. तसेच विदर्भ विरोधी उमेदवाराला पराभूत करण्याचे कामही करीत राहील. सरकारने जनमत घ्यावे स्वतंत्र विदर्भाबाबत सरकारने जनमताचा कौल घ्यावा. ५१ टक्के लोकांना विदर्भ नको असेल तर आम्ही ही मागणी सोडून देऊ, परंतु सरकार जनमत घ्यायला घाबरते. जनमत घेणे कठीण नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र विदर्भासाठी एक बॅलेट बॉक्स वेगळा ठेवा, असेही अ‍ॅड. अणे म्हणाले.