शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

अपंग नव्हे दिव्यांग म्हणा; अधिसूचना निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली.

ठळक मुद्दे इंग्रजीत म्हणता येईल ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये अपंग अथवा विकलांग या नकारार्थी शब्दांऐवजी ‘दिव्यांग’ या सकारात्मक शब्दाचा वापर करण्याची सूचना केली होती. अखेर त्याची अधिसूचना निघाली. हिंदीत ‘दिव्यांग’ तर इंग्रजीत ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’ म्हणण्याचे व लिहिण्याचे निर्देश केंद्राच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाने दिले आहे.राज्यात पूर्वी ‘अपंग’ या शब्दाएवजी अनेक सकारात्मक शब्दांचा वापर करण्याच्या सूचना आल्या होत्या. यात ‘सक्षम’, ‘सर्वत: सक्षम’ तर शासनातील लिपिकांनी ‘निशक्तजन’, अंधांना ‘दृिष्टबाधित’, ‘प्रज्ञाचक्षु’, ‘सूरदास’ असे वेगवेगळे विषेशण लावत होते. परंतु ५ जुलै रोजी निघालेल्या अधिसूचनावर आता केवळ हिंदीत ‘दिव्यांग’ तर इंग्रजीत ‘पर्सन्स विथ डिसॅब्लिटीज्’ म्हणण्याचे व लिहिण्याचा सूचना आल्या आहेत. विशेष म्हणजे, मराठीत काय म्हणायचे याला घेऊन अद्यापही संभ्रम असला तरी, दरम्यानच्या काळात मराठीतही ‘दिव्यांग’ शब्दाचा वापर होऊ लागल्याने तूर्तास तरी यावर विशेष चर्चा नाही. मात्र, ‘दिव्यांग’ संबोधून त्यांचा विकास होणार नसल्याचे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.त्यांच्या मते, नावातील बदलांसोबतच, अपंगांना जी पूरक संसाधने शासकीय अनुदानाच्या आधारे कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यास, शासकीय अस्थापनातील त्यांच्या नोकºयांचा अनुशेष प्रामाणिकपणे खºया अपंगांना देऊन भरून काढल्यास, अपंगांसाठीच्या विद्यमान योजनांची प्रामाणिक आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास दिव्यांगाचा विकास होईल. संबंधित विभागाने याकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

राज्यात दिव्यांग बांधव अधिकारांपासून वंचितदिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असलेतरी आजही राज्यात केवळ दहाच दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्राने २०१६च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली. नऊ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.

टॅग्स :Governmentसरकार