शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

आता पाँझी योजनांमध्ये लोकांची फसवणूक थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 10:36 IST

कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे फसवणुकीवर निर्बंध येणारकठोर शिक्षेची तरतूद

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे. नव्या वटहुकूमान्वये अशा योजना सुरू करणाऱ्यांना १ ते १० वर्षे शिक्षा आणि अशा व्यक्तीश २ लाख ते ५० कोटींपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पाँझी योजना राबविणाऱ्यांवर आळा बसणार आहे. पण लोकांनाही जागृत होऊन फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

पाँझी योजना म्हणजे कायगुंतवणूक केलेल्या रकमेचे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राबविण्यात येणाऱ्या योजनांना पाँझी योजना म्हणतात. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यास बाध्य करण्यात येते. तशी जाहिरातही कंपनीच्या संचालकांतर्फे प्रकाशित करण्यात येते किंवा मौखिक प्रसिद्धी करून लोकांना योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची लालूच दाखविण्यात येते. या सर्व योजनांमध्ये परताव्याची साखळी बंद झाल्यास गुंतवणूकदाराला दुप्पट परतावाच नव्हे तर साधे मुद्दलही मिळत नाही. अखेर कंपनीच्या संचालकांनी पलायन केल्यानंतर गुंतवणूकदारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते.नागपुरात पाच हजार कोटींपेक्षा अधिक फसवणूकनागपुरात गेल्या काही वर्षांत अनेक ठगबाजांनी राबविलेल्या पाँझी योजनांच्या माध्यमातून लोकांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे. प्रमोद अग्रवाल यांनी लोकांना जमिनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन करीत दोन वर्षांत रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी गुंतवणुकदारांची जवळपास ५०० कोटींची फसवणूक केली आहे.श्रीसूर्या समूहाचे समीर जोशी, वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे प्रशांत वासनकर, सात्त्विक इन्व्हेंस्टमेंटचे अमोल ढाके, रविराज इन्व्हेस्टमेंटचे राजेश जोशी, हरिभाऊ मंचलवार, प्रवीण झामरे यांनी हजारो गुुंतवणूकदारांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी मुद्दलही लोकांना मिळालेले नाही. उपरोक्त सर्व संचालकांपैकी काही कारागृहात तर काही फरार आहेत. काहींवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शहरात अनेकजण पाँझी योजना चालवित असून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात न आल्यामुळे अनेक घोटाळे अजूनही उजेडात आले नाहीत.

लोकांमध्ये जनजागृतीची गरजपाँझी योजनांपासून दूर राहण्यासाठी लोकांमध्येही जनजागृतीची गरज आहे. देशात मोठ्या कंपन्यांनी केलेले घोटाळे सर्वांना ज्ञात आहेत. राष्ट्रीयकृत वा सहकारी बँका लोकांना गुंतविलेली रक्कम १० वर्षांत दुप्पट देत असेल तर खासगी कंपन्या दोन वा तीन वर्षांत रक्कम दुप्पट कशी देते, याचा खोलात जाऊन विचार करण्याची गुंतवणूकदारांना गरज आहे. आयुष्याची कमाई आकर्षक योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते.

लोकांनी बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यातराष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. गुंतवणूकदार पाँझी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवतील आणि अल्प कालावधीत दुप्पट व तिप्पट रक्कम देणाºया योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापासून वाचतील. छोट्या गुंतवणूकदारांना वटहुकूमामुळे फायदा झाला आहे. वटहुकूमात काही बाबी स्पष्ट नसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. सरकारने त्यात स्पष्टता आणावी.- सीए अनिल पारख.

टॅग्स :fraudधोकेबाजी