शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

आता पाँझी योजनांमध्ये लोकांची फसवणूक थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 10:36 IST

कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे फसवणुकीवर निर्बंध येणारकठोर शिक्षेची तरतूद

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परतावा अर्थात पाँझी योजनांमध्ये गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वटहुकूमामुळे थांबणार आहे. नव्या वटहुकूमान्वये अशा योजना सुरू करणाऱ्यांना १ ते १० वर्षे शिक्षा आणि अशा व्यक्तीश २ लाख ते ५० कोटींपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पाँझी योजना राबविणाऱ्यांवर आळा बसणार आहे. पण लोकांनाही जागृत होऊन फसव्या आर्थिक योजनांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

पाँझी योजना म्हणजे कायगुंतवणूक केलेल्या रकमेचे कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राबविण्यात येणाऱ्या योजनांना पाँझी योजना म्हणतात. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यास बाध्य करण्यात येते. तशी जाहिरातही कंपनीच्या संचालकांतर्फे प्रकाशित करण्यात येते किंवा मौखिक प्रसिद्धी करून लोकांना योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची लालूच दाखविण्यात येते. या सर्व योजनांमध्ये परताव्याची साखळी बंद झाल्यास गुंतवणूकदाराला दुप्पट परतावाच नव्हे तर साधे मुद्दलही मिळत नाही. अखेर कंपनीच्या संचालकांनी पलायन केल्यानंतर गुंतवणूकदारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते.नागपुरात पाच हजार कोटींपेक्षा अधिक फसवणूकनागपुरात गेल्या काही वर्षांत अनेक ठगबाजांनी राबविलेल्या पाँझी योजनांच्या माध्यमातून लोकांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली आहे. प्रमोद अग्रवाल यांनी लोकांना जमिनीत गुंतवणूक करण्याचे आवाहन करीत दोन वर्षांत रक्कम दुप्पट देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांनी गुंतवणुकदारांची जवळपास ५०० कोटींची फसवणूक केली आहे.श्रीसूर्या समूहाचे समीर जोशी, वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचे प्रशांत वासनकर, सात्त्विक इन्व्हेंस्टमेंटचे अमोल ढाके, रविराज इन्व्हेस्टमेंटचे राजेश जोशी, हरिभाऊ मंचलवार, प्रवीण झामरे यांनी हजारो गुुंतवणूकदारांची पाच हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी मुद्दलही लोकांना मिळालेले नाही. उपरोक्त सर्व संचालकांपैकी काही कारागृहात तर काही फरार आहेत. काहींवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शहरात अनेकजण पाँझी योजना चालवित असून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात न आल्यामुळे अनेक घोटाळे अजूनही उजेडात आले नाहीत.

लोकांमध्ये जनजागृतीची गरजपाँझी योजनांपासून दूर राहण्यासाठी लोकांमध्येही जनजागृतीची गरज आहे. देशात मोठ्या कंपन्यांनी केलेले घोटाळे सर्वांना ज्ञात आहेत. राष्ट्रीयकृत वा सहकारी बँका लोकांना गुंतविलेली रक्कम १० वर्षांत दुप्पट देत असेल तर खासगी कंपन्या दोन वा तीन वर्षांत रक्कम दुप्पट कशी देते, याचा खोलात जाऊन विचार करण्याची गुंतवणूकदारांना गरज आहे. आयुष्याची कमाई आकर्षक योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही महत्त्वाचे ठरते.

लोकांनी बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यातराष्ट्रपतींच्या वटहुकूमामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. गुंतवणूकदार पाँझी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकांमध्ये ठेवी ठेवतील आणि अल्प कालावधीत दुप्पट व तिप्पट रक्कम देणाºया योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापासून वाचतील. छोट्या गुंतवणूकदारांना वटहुकूमामुळे फायदा झाला आहे. वटहुकूमात काही बाबी स्पष्ट नसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. सरकारने त्यात स्पष्टता आणावी.- सीए अनिल पारख.

टॅग्स :fraudधोकेबाजी