शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

आता पाकिस्तान व चीनही भारताला हरवू शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : आधुनिक शस्त्रास्त्र, उपग्रह शक्ती, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या तांत्रिक बाबतीत चीन हा भारतापेक्षा निश्चित वरचढ आहे. ...

निशांत वानखेडे

नागपूर : आधुनिक शस्त्रास्त्र, उपग्रह शक्ती, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स या तांत्रिक बाबतीत चीन हा भारतापेक्षा निश्चित वरचढ आहे. मात्र आपली शक्तीही या काळात चांगलीच वाढली आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करायला चीनला दहावेळा विचार करावा लागेल. एवढेच नाही तर पाकिस्तान व चीनने एकाचवेळी आपल्यावर हल्ला केला तरी त्यांचा हल्ला थाेपविण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे, असा विश्वास निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

कारगिल विजय दिनाच्या २२ व्या स्मृतीनिमित्त त्यांनी लाेकमतशी संवाद साधला.

प्रश्न : कारगिल युद्धाच्या २० वर्षांनंतर परिस्थितीत काय अंतर आले आहे?

कर्नल : १९९८-९९ मध्ये भारत व पाकिस्तान हे दाेन्ही देश अण्वस्त्रधारी बनले हाेते. मात्र यादरम्यान दाेन्ही देशांमध्ये करार करण्यात आला व दाेन्हीकडच्या सीमेवरून सैन्य परत घेण्याचे सांगण्यात आले. हिवाळ्यात भारतीय सैनिकांनी सीमेवरून हटायला सुरुवात केली. ही पहिली चूक ठरली कारण पाकिस्तानने करार माेडला. त्यांनी सैनिक परत पाठविले नाहीत. दुसरी चूक म्हणजे राॅ किंवा भारतीय गुप्तचर संस्थांनी हवाई सर्व्हिलेन्स ठेवण्यात दुर्लक्ष केले आणि तिसरी गाेष्ट म्हणजे लडाख व कारगिल भागात अत्यल्प प्रमाणात सेना हाेती. या गाेष्टींचा फायदा घेत भारतीय सैनिक परतल्यानंतर तोच भाग पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतला व त्यामुळे कारगिल युद्ध घडले. आपण हे युद्ध जिंकले, हे सैन्याचे शाैर्यच आहे. त्यावेळी कारगिल, लडाख सेक्टरमध्ये माती, दगडांचे बंकर हाेते. लडाखमध्ये २० हजार सैनिकांचे एक डिव्हिजन तैनात हाेते व त्यातील ६ हजार सैनिकांची एक तुकडी कारगिलमध्ये व बाकी पूर्व लडाखमध्ये हाेते. आज परिस्थिती बदलली आहे. आता ७० हजार सैनिकांना पूर्वी लडाखसह कारगिलपर्यंत तैनात केले आहे. ते सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज आहेत. आता पाकड्यांनी गडबड केली तर त्यांनाच जड जाईल.

प्रश्न : चीनच्या हालचाली किती धाेकादायक?

कर्नल : चीन तांत्रिकदृष्ट्या अधिक वरचढ असला तरी भारतावर डाेळा टाकण्याची त्याची हिंमत हाेणार नाही. चीनने तिबेटमध्ये हालचाली सुरू केल्या आहेत, त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. तसे भारतानेही आपल्या भूभागात सैन्य सज्ज केले आहे. ब्रह्मोस मिसाईलपासून राफेल व सुखाेईसारखी हवाई टीम तैनात करण्यात आली आहे. उपग्रहाद्वारे चीनच्या बाह्य हालचालींची माहिती आपल्याला मिळते पण आंतरिक गाेष्टींची गुप्त माहिती घेणे आवश्यक आहे. चीनकडे ते आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आहे पण भारताने त्यांचे मनसुबे पूर्ण हाेऊ दिले नाहीत. त्यामुळे चीन किंवा पाकिस्तानने एकाच वेळी जरी हल्ला केला तरी भारताला नमविणे आता कठीण आहे.

प्रश्न : चीन-पाकिस्तान आर्थिक काॅरिडाेरमुळे काय हाेईल?

कर्नल : चीनने आर्थिक फायद्यासाठी हा काॅरिडाेर तयार करण्याचे काम चालविले आहे. तिबेटमधून काराकाेरम पास हाेत पाकव्याप्त काश्मीरमधून ५० किमीचा रस्ता तयार केला जाणार आहे. या काॅरिडाेरचा फायदा किंवा नुकसान भारताला नाही. मात्र चीन या भागातून आक्रमण करण्याचा धाेका आहे. भारत सरकार या दृष्टीने पावले उचलत आहे, हे महत्त्वाचे आहे.