शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

नवमतदारांना जोडण्यासाठी आता ‘भाजयुमो’ चे ‘कॉफी विथ यूथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे.

ठळक मुद्देराज्यभरात राबविणार उपक्रमभाजप नेते साधणार तरुणाईशी संवादया मुद्यांवर असेल भर कलम-३७०, ट्रीपल तलाकच्या निर्णयांबाबत तरुणाईचे मत भविष्यातील भारताच्या कल्पना देशातील नेतृत्व व सरकारच्या कामगिरीबाबत मत तरुणाईच्या अपेक्षा भाजपने तरुणाईसाठी उचललेली पावले

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने नवमतदारांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे. विशेष म्हणजे संबंधित नेते हे ४५ वर्षे वयाच्या खालीलच असावे असा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूकांच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या माध्यमातून पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत नेण्यात व मतदारांना पक्षाशी जोडण्यात यश आले होते.महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकूण ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार आहेत. यातील नवमतदारांची संख्या ही २१ लाखांहून जास्त आहे. नवमतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत व विविध उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. याच साखळीत ‘भाजयुमो’कडून ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केवळ नवमतदारांसाठीच असेल. तेथे भाजपचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते त्यांच्याशी संवाद साधतील. त्यांच्या विकासाच्या कल्पना, भाजपबद्दलचे मत जाणून घेतील, अशी माहिती ‘भाजयुमो’चे प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांनी दिली. ‘कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात राष्ट्रीय व राज्य पातळीवर नावाजलेले तरुण नेते सहभागी व्हावेत असा ‘भाजयुमो’चा प्रयत्न आहेत. याअंतर्गत काही नावे अंतिम करण्यात आली आहे. यात बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या, मनोज तिवारी, पूनम महाजन, सुजय विखे पाटील, गौतम गंभीर इत्यादी नेते तरुणाईशी थेट संवाद साधण्याची शक्यता आहे. ते तरुणाईच्या प्रश्नांचीदेखील उत्तरे देतील. प्रत्येक जिल्ह्याच्या ऐतिहासिक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा ‘भाजयुमो’चा मानस होता. परंतु पावसाने अद्याप उसंत घेतली नसल्याने जिल्हानिहाय स्थिती पाहून स्थळ अंतिम करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019