शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

नवमतदारांना जोडण्यासाठी आता ‘भाजयुमो’ चे ‘कॉफी विथ यूथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 06:00 IST

नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे.

ठळक मुद्देराज्यभरात राबविणार उपक्रमभाजप नेते साधणार तरुणाईशी संवादया मुद्यांवर असेल भर कलम-३७०, ट्रीपल तलाकच्या निर्णयांबाबत तरुणाईचे मत भविष्यातील भारताच्या कल्पना देशातील नेतृत्व व सरकारच्या कामगिरीबाबत मत तरुणाईच्या अपेक्षा भाजपने तरुणाईसाठी उचललेली पावले

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने नवमतदारांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे. विशेष म्हणजे संबंधित नेते हे ४५ वर्षे वयाच्या खालीलच असावे असा प्रयत्न राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणूकांच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या माध्यमातून पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत नेण्यात व मतदारांना पक्षाशी जोडण्यात यश आले होते.महाराष्ट्रात सद्यस्थितीत एकूण ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार आहेत. यातील नवमतदारांची संख्या ही २१ लाखांहून जास्त आहे. नवमतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत व विविध उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत. याच साखळीत ‘भाजयुमो’कडून ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केवळ नवमतदारांसाठीच असेल. तेथे भाजपचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते त्यांच्याशी संवाद साधतील. त्यांच्या विकासाच्या कल्पना, भाजपबद्दलचे मत जाणून घेतील, अशी माहिती ‘भाजयुमो’चे प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांनी दिली. ‘कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात राष्ट्रीय व राज्य पातळीवर नावाजलेले तरुण नेते सहभागी व्हावेत असा ‘भाजयुमो’चा प्रयत्न आहेत. याअंतर्गत काही नावे अंतिम करण्यात आली आहे. यात बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या, मनोज तिवारी, पूनम महाजन, सुजय विखे पाटील, गौतम गंभीर इत्यादी नेते तरुणाईशी थेट संवाद साधण्याची शक्यता आहे. ते तरुणाईच्या प्रश्नांचीदेखील उत्तरे देतील. प्रत्येक जिल्ह्याच्या ऐतिहासिक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचा ‘भाजयुमो’चा मानस होता. परंतु पावसाने अद्याप उसंत घेतली नसल्याने जिल्हानिहाय स्थिती पाहून स्थळ अंतिम करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019