शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

आता वायदे बाजारात कापसाचे ‘गाठीं’ऐवजी ‘खंडी’त होणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2023 08:00 IST

Nagpur News ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचे व्यवहार गाठींऐवजी ‘खंडी’त हाेणार असून, नवीन नियमानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्दे१३ तारखेपासून सुरू होणार नियमित साैदे

सुनील चरपे

नागपूर : ‘सेबी’ने कापसावरील वायदेबंदी हटविल्यानंतर कापसाचे वायदे साेमवार (दि. १३)पासून सुरू हाेणार असल्याचे ‘एमसीएक्स’ने स्पष्ट केले. ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचे व्यवहार गाठींऐवजी ‘खंडी’त हाेणार असून, नवीन नियमानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचेही ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी सांगितले.

‘एमसीएक्स’वर पूर्वी कापसाचे व्यवहार गाठींमध्ये (१७२ किलाे रुई) व्हायचे. यात बदल करण्यात आला असून, यापुढे ते खंडीमध्ये (३५६ किलाे रुई) हाेतील. पूर्वी २५ गाठींचे एक ट्रेडिंग युनिट होते. ते आता ४८ खंडीचे करण्यात आले आहे. शिवाय, कमाल ऑर्डर साईजमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, कमाल ऑर्डर साईज १,२०० गाठींऐवजी ५७६ खंडीचा करण्यात आला आहे.

कापसाचे वायदे येत्या १३ फेब्रुवारीपासून एप्रिल, जून व ऑगस्ट महिन्यांतील वायदे सुरू हाेणार आहे. ‘सेबी’च्या नवीन नियमानुसार कापूस वायद्यांच्या सिंबाॅल, डिस्क्रिप्शन, ट्रेडिंग युनिट, कोटेशन, कमाल ऑर्डर साईज, टिक साईज, डिलिवरी युनिट आणि सेंटर, तसेच गुणवत्ता स्पेसिफिकेशन, आदींमध्ये बदल केला असल्याचे ‘एमसीएक्स’ने स्पष्ट केले आहे.

वायदे बाजारात रुईचे व्यवहार होतात. शेतकऱ्यांना त्यांचा कापूस वायद्यांमधून विकता येईल. व्यापारी व उद्योजकांना वायद्यांच्या माध्यमातून जोखीम व्यवस्थापन करता येईल. त्यातून कापसाचा व्यापार वाढण्यास, तसेच वायदे सुरू झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा हाेणार असल्याची माहिती बाजार तज्ज्ञांनी दिली.

ओपन पोझिशनमध्ये बदल

कमाल ‘ओपन पोझिशन’मध्येही मोठे बदल केले असून, एका खरेदीदाराला ९,६०० खंडीची ओपन पोझिशन (२० हजार गाठी) घेता येईल. यापूर्वी ही मर्यादा ३ लाख ४० हजार गाठींची होती. तसेच एकत्रित खरेदीदारांसाठी ओपन इंटरेस्ट कमाल मर्यादा ९६ हजार खंडीची (२ लाख गाठी) करण्यात आली असून, पूर्वी ही मर्यादा ३४ लाख गाठी होती. या बदलांमुळे उद्योजक व व्यापाऱ्यांना व्यवहार करणे सोपे जाणार असल्याचे ‘पीएसी’ (प्राॅडक्ट ॲडव्हायझरी कमिटी-काॅटन)च्या सदस्यांनी सांगितले.

नवीन डिलिव्हरी सेंटर

पूर्वी ‘एमसीएक्स’चे यवतमाळ व जालना (महाराष्ट्र), काडी व मुंद्रा (गुजरात) आणि अदिलाबाद (तेलंगणा) येथे डिलिव्हरी सेंटर हाेते. यात आता पाच सेंटरची भर पडली आहेत. नवीन सेंटरमध्ये इंदोर (मध्य प्रदेश), भिलवाडा (राजस्थान), गुंटूर (आंध्र प्रदेश), रायचूर (कर्नाटक) आणि सेलम (तमिळनाडू) यांचा समावेश आहे.

‘सेबी’ने नियमांमध्ये केलेले बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. या बदलांमुळे वायदे बाजारातील नफेखाेरीचे प्रमाण कमी हाेईल. शिवाय, कापूस उत्पादक ते गारमेंट उद्याेजक या साखळीतील सर्व कड्यांना हे बदल फायदेशीर ठरणार आहेत.

- दिलीप ठाकरे, सदस्य,

पीएसी (एमसीएक्स-काॅटन) तथा ॲग्राेस्टार हातरून.

टॅग्स :cottonकापूस