शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आता हजला जाणारे विमान रिकामे परतणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:51 IST

बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देएअरलाईन्सची आर्थिक तंगी दूर करण्यासाठी व्यवस्थानागपुरातून जम्बो जेटसुद्धा उडणार

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे. देशातून यावर्षी हज यात्रेला जाणारे विमान हाजींना जेद्दाह व मदिना सोडून रिकामे परत येणार नाही. या विमानांचा परतताना शेड्यूल्ड फ्लाईटमध्ये समावेश करण्यात येईल. देशात पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात येत आहे. त्याचा फायदा एअर इंडियाला होणार आहे.एअर इंडिया यावर्षी हज यात्रेसाठी बार वाईड बॉडी जम्बो जेट ७४७ चा समावेश करणार आहे. यावर्षी एअर इंडियाला हज यात्रेतून उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. हज यात्रा विमान कंपन्यांसाठी एक संधी आहे. या कालावधीत लाखोच्या संख्येने लोक विदेश प्रवास करतात. विशेष म्हणजे या प्रवासाचे भाडे प्रवास सुरू होण्यापूर्वीच जमा होते. उल्लेखनीय म्हणजे सौदी हज टर्मिनलशी झालेल्या करारानुसार शेड्यूल्ड फ्लाईट आॅपरेट करता येऊ शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत भारतातून हज यात्रेकरूंना सोडल्यानंतर विमान रिकामे परतत होते. त्यामुळे विमान कंपन्यांचे नुकसान होत होते. परंतु यावर्षी सरकारतर्फे सौदी अरबमधून शेड्यूल्ड फ्लाईट चालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या मते, सौदी अरबच्या विमान कोट्याच्या आधारे ही व्यवस्था करण्यात येऊ शकते.नागपुरातून हजचे ३४० क्षमतेचे पहिले विमान २५ जुलैला उडणार आहे, तर शेवटचे विमान ३१ जुलैला उडणार आहे. तर २६ ते २९ जुलैदरम्यान १८० व ३२० क्षमतेचे विमान उडणार आहे.

विमानाच्या मेंटेनन्सला आला वेगहज यात्रेसाठी नागपूर एम्बार्केशन पॉर्इंटवरून यावर्षी २५ जुलैला प्रवास सुरू होईल. ३१ जुलैला शेवटचे विमान उडेल. नागपुरातून मोठ्या प्रमाणात हज यात्री प्रवास करीत असल्याने एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. (एआयईएसएल) च्या कार्याला वेग आला आहे. हजसाठी उडणाऱ्या विमानांच्या मेंटेनन्सला प्राथमिकता देण्यात येत आहे.

आमचे प्रयत्न सुरू आहेयावर्षी एअर इंडियाचे भारतातून हजसाठी उडणारे विमान सौदीवरून परतताना शेड्यूल्ड फ्लाईटमध्ये त्याचा समावेश व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत हजची फ्लाईट चार्टर फ्लाईटच्या रूपात होती. यावर्षी भारतातून हजसाठी दोन बोर्इंग ७७७, दोन जम्बो जेट ७४७, तीन बोर्इंग ७८७ व एअरबस ३२० सुद्धा सोडण्यात येईल.-एच.आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल, नागपूर

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया