शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
3
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
4
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
6
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
7
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
10
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
11
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
12
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
13
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
15
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
16
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
17
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
18
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
19
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
20
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणार ‘ई-केवायसी’; ३० जूनपर्यंत मुदत

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 19, 2024 20:32 IST

न करणाऱ्यांना धान्याला मुकावे लागणार

नागपूर : सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्डाद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास रेशन कार्डधारकांना धान्य मिळणार नाही.

मोफत धान्य वितरण संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आला आहे. सरकारची खाद्य सुरक्षा योजना पारदर्शकरित्या राबविण्यासाठी कार्डधारकांना जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी करायची आहे. केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे. केवायसीकरिता कार्डावर नमूद ग्राहकांना कागदपत्रे देण्याची गरज नाही. मात्र, या सर्वांना रेशन दुकानातील बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून केवायसी करायचे आहे. याद्वारे कार्डावरील संबंधित व्यक्तीचा मॅसेज शिधावाटप निरीक्षकाच्या लॉगइनवर येईल आणि तो त्यांच्यातर्फे अप्रूव्हल केला जाईल. अशा सोप्या पद्धतीने ग्राहकांना केवायसी करायचे आहे. काही कारणास्तव कार्डावरील एखादा ग्राहक जिल्हा वा राज्याबाहेर असल्यास त्याचे केवायसी कसे होणार, याबाबत स्पष्टता नाही.

आधार केंद्रात अपडेट करावे बायोमेट्रिककार्डावर नमूद ग्राहकाचे केवायसी अनेक प्रयत्नानंतरही अपडेट होत नसेल तर त्याला आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अपडेट करता येईल. अपडेट झाल्यानंतरच त्याचे केवायसी होईल. सध्या प्रत्येक रेशन दुकानात ग्राहकाच्या केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, रेशन दुकानात मोफत धान्य घेणाऱ्यांची गर्दी पाहता दुकानदाराने कार्डधारकांना २० जूननंतर केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकदा वयस्क आणि लहानांचे अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यामुळे त्यांच्या केवायसी प्रक्रियेत समस्या उद्भवत आहे.

न्य वाटपातील घोटाळा बंद होणार, खऱ्यां लाभार्थींना मिळणार फायदागहू आणि अन्य धान्य वितरणात होणाऱ्या घोटाळ्याच्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई-केवायसी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत, याची खरी आकडेवारी पुढे येईल. अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल. याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावर नक्कीच नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेशनकार्डवरून मृतकांची नावे वगळण्यात येणार !जिल्ह्यात अनेकांच्या रेशनकार्डावर मृतकांच्या नावाची नोंद आहे. किंवा मुलींची लग्ने झावली आहेत. मात्र नाव रेशनकार्डवर आहे. त्यामुळेच त्यांची खाद्यान्न सुरक्षा यादीत अजूनही नोंद आहे. कुटुंबीयही त्यांच्या नावावर मोफत धान्य उचलत आहेत. मात्र आता ई-केवायसी प्रक्रियेमुळे अशांची नावे खाद्यान्न सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे.