शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आता रेशनच्या मोफत धान्यासाठी करावे लागणार ‘ई-केवायसी’; ३० जूनपर्यंत मुदत

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 19, 2024 20:32 IST

न करणाऱ्यांना धान्याला मुकावे लागणार

नागपूर : सरकारच्या नवीन नियमांतर्गत रेशन कार्डाद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. या तारखेपर्यंत केवायसी न केल्यास रेशन कार्डधारकांना धान्य मिळणार नाही.

मोफत धान्य वितरण संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न पुरवठा विभाग अलर्ट मोडवर आला आहे. सरकारची खाद्य सुरक्षा योजना पारदर्शकरित्या राबविण्यासाठी कार्डधारकांना जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी करायची आहे. केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे. केवायसीकरिता कार्डावर नमूद ग्राहकांना कागदपत्रे देण्याची गरज नाही. मात्र, या सर्वांना रेशन दुकानातील बायोमेट्रिक मशीनवर अंगठा लावून केवायसी करायचे आहे. याद्वारे कार्डावरील संबंधित व्यक्तीचा मॅसेज शिधावाटप निरीक्षकाच्या लॉगइनवर येईल आणि तो त्यांच्यातर्फे अप्रूव्हल केला जाईल. अशा सोप्या पद्धतीने ग्राहकांना केवायसी करायचे आहे. काही कारणास्तव कार्डावरील एखादा ग्राहक जिल्हा वा राज्याबाहेर असल्यास त्याचे केवायसी कसे होणार, याबाबत स्पष्टता नाही.

आधार केंद्रात अपडेट करावे बायोमेट्रिककार्डावर नमूद ग्राहकाचे केवायसी अनेक प्रयत्नानंतरही अपडेट होत नसेल तर त्याला आधार केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अपडेट करता येईल. अपडेट झाल्यानंतरच त्याचे केवायसी होईल. सध्या प्रत्येक रेशन दुकानात ग्राहकाच्या केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, रेशन दुकानात मोफत धान्य घेणाऱ्यांची गर्दी पाहता दुकानदाराने कार्डधारकांना २० जूननंतर केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकदा वयस्क आणि लहानांचे अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यामुळे त्यांच्या केवायसी प्रक्रियेत समस्या उद्भवत आहे.

न्य वाटपातील घोटाळा बंद होणार, खऱ्यां लाभार्थींना मिळणार फायदागहू आणि अन्य धान्य वितरणात होणाऱ्या घोटाळ्याच्या तक्रारीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे ई-केवायसी होईल आणि मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत, याची खरी आकडेवारी पुढे येईल. अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल. याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावर नक्कीच नियंत्रण येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेशनकार्डवरून मृतकांची नावे वगळण्यात येणार !जिल्ह्यात अनेकांच्या रेशनकार्डावर मृतकांच्या नावाची नोंद आहे. किंवा मुलींची लग्ने झावली आहेत. मात्र नाव रेशनकार्डवर आहे. त्यामुळेच त्यांची खाद्यान्न सुरक्षा यादीत अजूनही नोंद आहे. कुटुंबीयही त्यांच्या नावावर मोफत धान्य उचलत आहेत. मात्र आता ई-केवायसी प्रक्रियेमुळे अशांची नावे खाद्यान्न सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे.