शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा निवाडा आता मत विभाजनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 11:19 IST

बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देयंदा एकतर्फी चित्र नाहीचपाचही उमेदवारांनी प्रतिष्ठा लावली पणाला

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र अशी त्रिकोणी लढत होत आहे. निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.या मत विभाजनाचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी पाचही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून जिथे डॅमेजची प्रबळ शक्यता आहे तिथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. किशोर सानप विदर्भाचे, राजन खान व रवींद्र गुर्जर पश्चिम महाराष्ट्राचे तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुण्यातूनही अर्ज भरला असला तरी ते मराठवाड्याचेच उमेदवार आहेत, हे उघड सत्य आहे. संभाव्य मत विभाजनाचा धोका लक्षात घेता विदर्भातून एकच उमेदवार या निवडणुकीला उभा रहावा, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. पण, दोन्ही उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व दोघांचेही साहित्य क्षेत्रातील मित्रमंडळ सारखे असल्याने येथे मत विभाजन अटळ आहे. अगदी सारखी स्थिती पश्चिम महाराष्ट्रातही आहे. राजन खान, लक्ष्मीकांत देशमुख व रवींद्र गुर्जर हे तिघेही उमेदवार पुण्यातच राहणारे आहेत. पुणेकरांसोबत मुंबईकर मतदारांचा ओढाही आपल्या जवळचा उमेदवार म्हणून पुण्यातील उमेदवारांकडे आहे. राजन खान व लक्ष्मीकांत देशमुख यांच्या मित्र परिवाराचे परीघही जवळपास सारखे आहे. याचा अर्थ येथेही विभाजन टाळता येणे कठीण आहे.लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे मराठवाड्यातील असल्याने तेथील संपूर्ण मते त्यांनाच मिळतील, असेही अजिबात नाही. राजन खान, डॉ. शोभणे व डॉ. सानप या तिघांच्याही चाहत्यांचा कमी-अधिक गोतावळा मराठवाड्यात असल्याने येथेही मते विभागली जाणार आहेत. हे चित्र बघता विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल असा अंदाज आहे.या वास्तवाची जाणीव पाचही उमेदवारांना असल्याने मागच्या वर्षीसारख्या एकतर्फी विजयाची आशा सगळ्यांनीच सोडून दिली आहे.बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर मदारमहाराष्ट्रात जिथे जिथे विभाजनाचा फटका बसेल त्या ठिकाणची संभाव्य हानी भरून काढण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील अपेक्षित मते मिळाली नाही तर किमान बृहन्महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मते तरी आपल्याकडे वळवता यावी, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांना साकडे घातले जात आहे. परंतु बृहन्महाराष्ट्रातसुद्धा यातील प्रमुख तीनही उमेदवारांचा कमी-अधिक प्रभाव असल्याने येथील मतांचा प्रवाहही एकाच दिशेने वळेल, याची अजिबात शक्यता नाही. याचा अर्थ महाराष्ट्राप्रमाणेच बृहन्महाराष्ट्रातही वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये मते विभागली जाणार असून उमेदवाराच्या विजयामध्ये मत विभाजनाचा फॅक्टर येथेही महत्त्वाचा ठरणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्य