शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा निवाडा आता मत विभाजनावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 11:19 IST

बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देयंदा एकतर्फी चित्र नाहीचपाचही उमेदवारांनी प्रतिष्ठा लावली पणाला

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : बडोद्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र अशी त्रिकोणी लढत होत आहे. निवडणुकीच्या मैदानातील पाचही उमेदवार स्वत:च्या विजयाबाबत आश्वस्त असल्याचे सांगत असले तरी मत विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल, असेच संकेत मिळत आहेत.या मत विभाजनाचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी पाचही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून जिथे डॅमेजची प्रबळ शक्यता आहे तिथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. किशोर सानप विदर्भाचे, राजन खान व रवींद्र गुर्जर पश्चिम महाराष्ट्राचे तर लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुण्यातूनही अर्ज भरला असला तरी ते मराठवाड्याचेच उमेदवार आहेत, हे उघड सत्य आहे. संभाव्य मत विभाजनाचा धोका लक्षात घेता विदर्भातून एकच उमेदवार या निवडणुकीला उभा रहावा, यासाठी जोरदार प्रयत्न झाले. पण, दोन्ही उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने व दोघांचेही साहित्य क्षेत्रातील मित्रमंडळ सारखे असल्याने येथे मत विभाजन अटळ आहे. अगदी सारखी स्थिती पश्चिम महाराष्ट्रातही आहे. राजन खान, लक्ष्मीकांत देशमुख व रवींद्र गुर्जर हे तिघेही उमेदवार पुण्यातच राहणारे आहेत. पुणेकरांसोबत मुंबईकर मतदारांचा ओढाही आपल्या जवळचा उमेदवार म्हणून पुण्यातील उमेदवारांकडे आहे. राजन खान व लक्ष्मीकांत देशमुख यांच्या मित्र परिवाराचे परीघही जवळपास सारखे आहे. याचा अर्थ येथेही विभाजन टाळता येणे कठीण आहे.लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे मराठवाड्यातील असल्याने तेथील संपूर्ण मते त्यांनाच मिळतील, असेही अजिबात नाही. राजन खान, डॉ. शोभणे व डॉ. सानप या तिघांच्याही चाहत्यांचा कमी-अधिक गोतावळा मराठवाड्यात असल्याने येथेही मते विभागली जाणार आहेत. हे चित्र बघता विभाजनाची टक्केवारीच नवीन संमेलनाध्यक्ष ठरवेल असा अंदाज आहे.या वास्तवाची जाणीव पाचही उमेदवारांना असल्याने मागच्या वर्षीसारख्या एकतर्फी विजयाची आशा सगळ्यांनीच सोडून दिली आहे.बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर मदारमहाराष्ट्रात जिथे जिथे विभाजनाचा फटका बसेल त्या ठिकाणची संभाव्य हानी भरून काढण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील अपेक्षित मते मिळाली नाही तर किमान बृहन्महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मते तरी आपल्याकडे वळवता यावी, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील मतदारांना साकडे घातले जात आहे. परंतु बृहन्महाराष्ट्रातसुद्धा यातील प्रमुख तीनही उमेदवारांचा कमी-अधिक प्रभाव असल्याने येथील मतांचा प्रवाहही एकाच दिशेने वळेल, याची अजिबात शक्यता नाही. याचा अर्थ महाराष्ट्राप्रमाणेच बृहन्महाराष्ट्रातही वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये मते विभागली जाणार असून उमेदवाराच्या विजयामध्ये मत विभाजनाचा फॅक्टर येथेही महत्त्वाचा ठरणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्य