शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

आता काँग्रेसही काढणार ‘रथयात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 09:57 IST

माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेनंतर तर देशाच्या राजकारणाचे चित्रच बदलून गेले होते. आता भाजपाप्रमाणेच कॉंग्रेसदेखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रथयात्रेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे.

ठळक मुद्दे१ जानेवारीपासून करणार सुरुवातभाजपाविरोधात करणार वातावरण निर्मिती

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी ‘रथयात्रा’ म्हटले की राजकीय वर्तुळात डोळ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे नाव येते. माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेनंतर तर देशाच्या राजकारणाचे चित्रच बदलून गेले होते. आता भाजपाप्रमाणेच कॉंग्रेसदेखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रथयात्रेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाविरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी २०१९ च्या पहिल्या दिवसापासून नागपुरात कॉंग्रेसतर्फे रथयात्रा काढण्यात येणार आहे.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फे ‘बूथविस्तारक’, ‘पेजप्रमुख’, ‘शक्तीप्रमुख’ इत्यादी मोहीम राबविण्यात आल्या. या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष गृहसंपर्क व संघटन मजबुतीवर भर दिला. दुसरीकडे अंतर्गत गटबाजीतच कॉंग्रेसचे नेते अडकून राहिले होते.मात्र सेवाग्राम येथे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात ऊर्जा संचारल्याचे दिसून येत आहे. निवडणुका जवळ येत असताना ही ऊर्जा टिकवून ठेवून जनतेपर्यंत जाण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन कॉंग्रेसने पुढील योजनांची रुपरेषा तयार केली आहे. भाजपच्या शासनकाळातील गैरव्यवहार, विविध कामांमधील अनियमितता, आश्वासनांची न झालेली पूर्तता, शेतकरी समस्या, तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, जनतेमध्ये असलेली नाराजी इत्यादी बाबी जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी कॉंग्रेसने रथयात्रेचाच आधार घेण्याचे ठरविले आहे. याबाबत नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.४५ दिवस चालणार रथयात्रा१ जानेवारी २०१९ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत शहरात ही रथयात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्र, प्रभागातून ही रथयात्रा काढण्यात येईल. या कालावधीत पथनाट्य, पत्रके यामाध्यमातून केंद्र व राज्य शासनाविरोधात प्रचार करण्यात येईल. गृहसंपर्कावर आमचा जास्तीत जास्त भर असेल आणि सरकारच्या आश्वासनांमधील फोलपणा आम्ही पुराव्यांसह जनतेसमोर मांडू, असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘रथयात्रा’ काढण्यामागे कुणाची ‘कॉपी’ करणे हा उद्देश नाही. मात्र जनता रथयात्रेशी जुळली जाते. या प्रकारे जनतेमध्ये जाण्याचा कुठल्याही पक्षाकडे ‘कॉपीराईट’ नाही. आम्ही आमची मते यामाध्यमातून प्रभावीपणे जनतेसमोर मांडू, असेदेखील त्यांनी सांगितले.राज्यासाठी आवश्यकतेनुसार विचार करू : राधाकृष्ण विखे पाटीलविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर शहरातील रथयात्रा ही मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तूर्तास राज्यात रथयात्रा काढण्याचा आमचा विचार नाही. राज्यात आम्ही जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत जात आहोतच. याचे सर्व टप्पे समाप्त झाल्यानंतर राज्यात अशाप्रकारे रथयात्रा काढावी का याबाबत कार्यकारिणीत विचार करू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेस