शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आता नागपुरात पाणी चोरीविरोधात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:55 IST

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ३० जूनपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यात पाणीचोरी करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबिवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टुल्लू पंप वापरणाऱ्यांच्या विरोधात गुरुवारपासून कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी घेतला पाणीसमस्यांचा आढावा : टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर १६ मेपासून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या प्रकल्पात १० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. ३० जूनपर्यंत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन नियोजन करीत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी बुधवारी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यात पाणीचोरी करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबिवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टुल्लू पंप वापरणाऱ्यांच्या विरोधात गुरुवारपासून कारवाई केली जाणार आहे.आयुक्त अभिजित बांगर यांनी बोलाविलेल्या बैठकीला आमदार गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे,डॉ. मिलिंद माने, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, मनपातील सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चोपडे, उपविभागीय अभियंता प्रणय नागदिवे, ओसीडब्ल्यूचे एच.आर. व्यवस्थापक के.एम.पी. सिंग, व्यवस्थापक (देखभाल व दुरुस्ती) कालरा आदी उपस्थित होते.पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी प्रकल्पात उपलब्ध पाण्याची माहिती दिली. पाटबंधारे विभागातर्फे पाणीपुरवठा केंद्राला देण्यात येते तितके पाणी केंद्रापर्यंत पोहचत नाही. त्याची कारणे शोधण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरात पाण्याचा अपव्यय होतो. नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन अपव्यय टाळण्याचे आणि पाण्याच्या बाबतीत काटकसर करण्याचे आवाहन केले. कार वॉशिंग सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये पाण्याचा भरमसाट वापर केला जातो. अनेक ठिकाणी अनधिकृत जोडण्याही असल्याचे उपस्थित आमदारांनी निदर्शनास आणले. यासंदर्भात तातडीने अधिकाºयांनी पाहणी करून अशा अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जनावरे धुणे, अंगणात पाणी टाकणे, गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले.उपस्थित आमदारांनी पाण्याच्या समस्येवर चर्चा केली. प्रशासन पाण्याच्या नियोजनासंदर्भात घेत असलेले निर्णय नागरिकांनी पाळावेत. पाणी बचतीत नागरिकांनी स्वत: सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सर्व आमदारांनी केले. काही वस्त्यांमध्ये मोठे टँकर जात नसतील तर लहान टँकरची व्यवस्था ठेवावी, टँकरसंदभार्तील सर्व माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना वेळोवेळी देण्यात यावी, असेही निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. १० जूनपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असला तरी तो वाढविण्यासंदर्भात प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चौराई धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात मध्य प्रदेश शासनाशी चर्चा करावी, अशी विनंतीही राज्य शासनाला करण्यात आली आहे.गरज भासल्यास पोलिसांची मदत२० मे पासून असे नळजोडण्या नियमित करण्याची मोहीम सुरू होत आहे. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन नळजोडण्या नियमित कराव्यात. मोहिमेदरम्यान नागरिकांच्या घरात जर अनधिकृत जोडणी आढळून आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदतही घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.अतिरिक्त पाण्यासाठी प्रयत्नपाटबंधारे विभागाने अतिरिक्त २० क्यूसेक्स पाणी द्यावे, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकता भासल्यास प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्यासाठी राज्य शासनाने त्यालाही मंजुरी दिल्याची माहिती आयुक्तांनी उपस्थितांना दिली. पाण्याचा अपव्यय टाळणे आणि काटकसर करणे हाच उपाय असून यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणीcommissionerआयुक्त