शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अगं इमला, धरणाजवळ बांधू आता मोठा बंगला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 21:12 IST

Nagpur News धरण परिसरात २०० मीटरच्या आत बांधकामास असलेली बंदी राज्य सरकारने उठवली आहे. या निर्णयामुळे निसर्गरम्य धरण परिसरात बांधकामास उत्सुक असणारे खुश झाले; पण पर्यावरणप्रेमींची पुन्हा निराशा झाली आहे.

 

नागपूर : धरणाच्या परिसरात माेठ्या प्रमाणात हाॅटेल, रिसाॅर्ट, फार्म हाऊस किंवा काेणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे नद्यांच्या पाणलाेट क्षेत्रात हाेणारे प्रदूषण लक्षात घेता धरणांपासून २०० मीटर परिसरात करण्यासाठी राज्य शासनाने बंदी घातली हाेती. मात्र, राज्य सरकारने आपलाच निर्णय फिरवत पुन्हा ही बंदी उठवली. आता पूर्वीप्रमाणेच ७५ मीटरच्या आत बांधकाम करण्यास बंदी राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे निसर्गरम्य धरण परिसरात बांधकामास उत्सुक असणारे खुश झाले; पण पर्यावरणप्रेमींची पुन्हा निराशा झाली आहे.

 २०० मीटर परिसरात बांधकामाचा मार्ग मोकळा

जलसंपदा विभागाच्या नव्या निर्णयाने धरण परिसराच्या २०० मीटर परिसरात बांधकाम करण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे धरणाच्या क्षेत्रात रिसाॅर्ट, फार्म हाऊस बांधण्यास उत्सुक असणाऱ्यांची माैज हाेणार आहे. मात्र यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळेल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

७५ मीटरच्या आत बंदी

माेठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या परिसरात ७५ मीटरच्या आत बांधकामास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे नद्या, तलावांच्या पर्यावरणाच्या सुरक्षेचा दावा करण्यात येत असला तरी यामुळे काेणताही फायदा हाेणार नाही, असे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाने पूर्वीचाच नियम ठेवला कायम

यापूर्वीही ७५ मीटरच्या परिसरात बांधकामास बंदी घातली हाेती. मात्र, आठवड्याची सुटी घालविण्यासाठी रिसाॅर्ट, फार्म हाऊस बांधण्याचे फॅड वाढले आणि माेठ्या प्रमाणात धरण परिसरात बांधकाम हाेऊ लागले. यामुळे नद्यांच्या पाणलाेट क्षेत्रात माेठ्या प्रमाणात प्रदूषण हाेत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आणि २०० मीटरपर्यंत बांधकामास बंदी घालण्यात आली. आता पुन्हा जुना निर्णय कायम करीत धनदांडग्यांच्या माैजेसाठी शासनाने पर्यावरणवाद्यांची निराशा केली आहे.

 जिल्ह्यात १०० वर धरणे

नागपूर जिल्ह्यात ताेतलाडाेह, कामठी खैरी, खिंडसी रामटेक, नांद आणि वडगाव या माेठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम प्रकल्प आणि १०० वर लघु प्रकल्प आहेत. नागपूर शहराचा विचार केल्यास अंबाझरी प्रकल्पाच्या बाजूलाच मेट्राे स्टेशन आणि असंख्य घरांचे बांधकाम आहे.

- यापूर्वी नद्यांच्या उगम क्षेत्रात ५०० मीटर आणि धरण क्षेत्रात २०० मीटरवर बांधकामास बंदी हाेती. २०१४ मध्ये सरकार बदलल्यानंतर ही बंदी हटवत धनदांडग्यांना धरण क्षेत्रात बांधकाम करण्याचे रान माेकळे करण्यात आले. मध्ये बंदी घातली; पण आता पुन्हा तीच अवस्था केली. अशा निर्णयामुळे नद्या संपविण्याचा घाट सरकारने घातला आहे. हे अत्यंत खेदजनक आहे.

- सुधीर पालिवाल, नदी अभ्यासक व पर्यावरणप्रेमी.

 

- जलसंपदाचे अधिकारी अधिवेशनात

याबाबत विचारणा करण्यास जलसंपदा विभागात गेले असता अधिकारी काही सांगण्यास तयार नाहीत. एखाद्या अभियंत्याला विचारले तर दुसऱ्याकडे बाेट दाखवून साहेब अधिवेशनाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन