शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

आता युतीबाबत आठवलेंच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:04 IST

भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला काय मिळाले, असा सवाल विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना विचारत या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील पदाधिकाऱ्यांची युतीबाबत समीक्षा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला काय मिळाले, असा सवाल विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना विचारत या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.शुक्रवारी रविभवन येथे रिपाइं (आ) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आागामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत असलेल्या युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून युतीची समीक्षा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून तसा अहवाल पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती आरपीआयचे (ए) प्रदेश अध्यक्ष भूपेश थूलकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.थूलकर यांनी सांगितले की, या बैठकीत युतीसंदर्भातही मत घेण्यात आले. पदाधिकाऱ्यांचे मत युतीसंदर्भात अनुकूल दिसले नाही. रोजगार, शिष्यवृत्ती यावरही नाराजीचा सूर होता. भाजपसोबत २०१२ पासून युती आहे. युती करताना काही करारही करण्यात आले होते. मात्र त्याचे पालन झाले नसल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या युतीबाबत समीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युती झाल्यास रामटेक लोकसभेची जागा आम्हाला मिळण्याची मागणीही करण्यात येणार आहे. मात्र युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत लोकसभा मतदार संघाच्या प्रभारींची निवडही करण्यात आली.यावेळी भीमराव बन्सोड, राजू बहादुरे, आर.एस. वानखेडे, विनोद थूल, डॉ. मनोज मेश्राम, तेज वानखेडे, अशोक घोटेकर, एल.के. मडावी आदी उपस्थित होते.भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई कराकोरेगाव भीमा येथे झालेला प्रकार यंदा होता कामा नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणातील दोषी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवले