शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आता युतीबाबत आठवलेंच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:04 IST

भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला काय मिळाले, असा सवाल विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना विचारत या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील पदाधिकाऱ्यांची युतीबाबत समीक्षा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला काय मिळाले, असा सवाल विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना विचारत या युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.शुक्रवारी रविभवन येथे रिपाइं (आ) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. आागामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली. भाजपसोबत असलेल्या युतीबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून युतीची समीक्षा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून तसा अहवाल पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती आरपीआयचे (ए) प्रदेश अध्यक्ष भूपेश थूलकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.थूलकर यांनी सांगितले की, या बैठकीत युतीसंदर्भातही मत घेण्यात आले. पदाधिकाऱ्यांचे मत युतीसंदर्भात अनुकूल दिसले नाही. रोजगार, शिष्यवृत्ती यावरही नाराजीचा सूर होता. भाजपसोबत २०१२ पासून युती आहे. युती करताना काही करारही करण्यात आले होते. मात्र त्याचे पालन झाले नसल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या युतीबाबत समीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला. युती झाल्यास रामटेक लोकसभेची जागा आम्हाला मिळण्याची मागणीही करण्यात येणार आहे. मात्र युतीबाबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत लोकसभा मतदार संघाच्या प्रभारींची निवडही करण्यात आली.यावेळी भीमराव बन्सोड, राजू बहादुरे, आर.एस. वानखेडे, विनोद थूल, डॉ. मनोज मेश्राम, तेज वानखेडे, अशोक घोटेकर, एल.के. मडावी आदी उपस्थित होते.भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई कराकोरेगाव भीमा येथे झालेला प्रकार यंदा होता कामा नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणातील दोषी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवले