शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
3
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
4
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
5
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
6
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
7
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
8
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
9
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
10
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
11
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
12
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
13
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
14
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
15
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
16
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
17
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
18
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
19
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
20
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक; तानसा तलाव भरून वाहू लागला!

आता कंप्युटर टेक्नाॅलाॅजीच्या परीक्षेत ८० टक्के प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे, नागपूर विद्यापीठाचा पुन्हा घाेळ  

By निशांत वानखेडे | Updated: June 15, 2023 18:59 IST

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षांमधील अव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षांमधील अव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कंप्युटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंगमधील एका पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारण्याचे प्रकरण मिटले नसताना आता कंप्युटर टेक्नालाॅजीच्या अंतिम सेमिस्टरच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील तब्बल ८० टक्के प्रश्न विचारण्यात आल्याचे नवीनच प्रकरण समाेर आले आहे.

विद्यापीठातर्फे इंजिनिअरिंग अंतीम वर्षाच्या ८ व्या सेमीस्टर परीक्षेचा कॅम्पुटर टेक्नॉलॉजीच्या ‘क्लाउड कॅम्पुटींग’ या विषयाचा पेपर ३१ मे ला घेण्यात आला. या पेपरमधील ८० टक्के प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे पेपर सोडविणे कठीण गेले असून विद्यार्थ्यांना निकालात नापास होण्याची चिंता वाढली आहे. याबाबत रामटेकच्या किट्स इंजिनिअर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यकडे २ जुनला तक्रार केली. काॅलेजमधील या विषयाच्या १५० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. प्राचार्यानी या तक्रारीची दखल घेत नागपुर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाला याबाबत एक पत्र पाठवले. परीक्षा प्रमुख डाॅ. प्रफुल साबळे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची विनंती केली. मात्र अद्याप नागपुर विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याचे सांगण्यात येत आहे.

नापास झाले तर?अंतीम वर्ष असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाले आहे. अनेकांनी पीजी अभ्यासक्रमासाठी आवेदन केले आहे. परीक्षेत विद्यार्थी नापास झाले तर नाेकरीही जाईल व वर्षही वाया जाईल. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे तक्रार दिली हाेती. त्यानुसार महाविद्यालयाचे पत्र जाेडून नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला पाठविण्यात आले हाेते. परीक्षा प्रमुखांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, असा विश्वास दिला हाेता. विद्यापीठाने विद्यार्थी हिताची भूमिका घ्यावी. - डाॅ. श्रीखंडे, प्राचार्य, किट्स इंजिनीअरिंग काॅलेज

टॅग्स :nagpurनागपूरuniversityविद्यापीठ