शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांना नोटीस

By admin | Updated: October 18, 2014 02:57 IST

विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रांत आणि भाषावाद निर्माण करून अमराठी भाषिकांमध्ये दहशत निर्माण करणारे ..

नागपूर : विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रांत आणि भाषावाद निर्माण करून अमराठी भाषिकांमध्ये दहशत निर्माण करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत स्पष्टीकरण सादर करण्यास निवडणूक आयोगाने उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाकरे यांना आयोगाने १३ आॅक्टोबर रोजी नोटीस जारी करून १५ आॅक्टोबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु ठाकरे यांच्यावतीने तीन दिवसांची मुदत मागण्यात आली. आयोगाने ती उद्या १८ आॅक्टोबरपर्यंत मंजूर केली. दरम्यान भाजपच्या विधी व कायदा आघाडीचे राष्ट्रीय सहसंयोजक आणि अखंड भारत अभियानचे अध्यक्ष अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी आज पत्रपरिषद आयोजित करून मनसेच्या उमेदवारांचा मताधिकार सहा वर्षांसाठी गोठवण्यात यावा आणि मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. राज ठाकरे यांनी आदर्श आचारसंहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केले आहे, अशा आशयाची तक्रार खुद्द अ‍ॅड. तिवारी यांनी ८ आॅक्टोबर रोजी केली होती. ही तक्रार १० आॅक्टोबर रोजी मुंबई येथील भाजपचे श्रीकांत भारतीय यांनी मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविली होती. या अधिकाऱ्याने ही तक्रार स्वत:च्या अहवालासह १२ आॅक्टोबर रोजी मुख्य निर्वाचन आयोगाकडे पाठविली होती. अहवालात राज ठाकरे यांनी ५ आणि ७ आॅक्टोबर रोजी घाटकोपर व कलिना येथे केलेले भाषणाचे काही अंश नमूद करण्यात आले होते. ‘तुम्ही हे राज्य माझ्या हाती सोपविल्याच्या तारखेपासून कोणत्याही उद्योगात केवळ मराठी मुला मुलींनाच रोजगार दिल्या जाईल. परप्रांतीयांना कोणताही रोजगार दिला जाणार नाही. त्यांचा महाराष्ट्रातील शिरकाव थांबवला जाईल. राज्याच्या सीमेवर ‘नो एन्ट्री’ ची फलक उभारले जातील’, असा उल्लेख भाषणात होता. ठाकरे यांनी प्रांतवाद आणि भाषावादाच्या मुद्यावर मराठी भाषिकांना मते मागून भारतीय राज्य घटनेतील राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सार्वभौम संघीय व्यवस्थेला तडा दिला आहे. अमाराठी भाषिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. भ्रष्ट निवडणूक मार्गाचा अवलंब केला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. व्ही. एस. संपत यांनी कारवाई प्रारंभ केली असल्याचे अ‍ॅड. तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेत शकीब खान, अपूर्वा तिवारी, नितीन राऊत (पाटील) उपस्थित होते. (प्रतिनिधी)