शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण मालती पाठक हत्या प्रकरणी चौघांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:01 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देदोषी कोण ? १५ महिने उलटूनही प्रश्न अनुत्तरित

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात दोन रुग्णांचा गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणातील दोषी कोण, हा प्रश्न १५ महिने उलटूनही अनुत्तरित आहे. परंतु, यातील एका प्रकरणात आरोग्य उपसंचालक कार्यालयाने आता मनोरुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘स्किझोफ्रेनिया’ची रुग्ण मालती पाठक (६०) यांचा मृत्यू ६ आॅक्टोबर २०१६ रोजी त्यांचाच वॉर्डातच झाला. पाठक यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर त्यांची गळा दाबून हत्या झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ फेब्रुवारीच्या अंकात ‘पुन्हा एका मनोरुग्णाची गळा आवळून हत्या’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. यापूर्वी, १७ सप्टेंबर २०१६ रोजी जयंत नेरकर (४४) या मनोरुग्णाचीही गळा आवळून हत्या झाल्याचे वृत्त सर्वात आधी ‘लोकमत’ने प्रसिद्ध करून मनोरुग्णालयाचा गैरकारभारच चव्हाट्यावर आणला होता. या दोन्ही प्रकरणाला घेऊन आरोग्य मंत्र्यांना गेल्या हिवाळी व उन्हाळी अधिवेशनात विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. मालती पाठक हत्या प्रकरणात तर आरोग्य विभागाकडून साधी चौकशी झाली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण अंगावर शेकणार म्हणून आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सहायक संचालक (हिवताप) डॉ. मिलिंद गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्यात माताकचेरीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांचा समावेश होता. डॉ. गणवीर समितीने चौकशीनंतरच्या अहवालात मनोरुग्ण पाठक यांच्या हत्याप्रकरणात चार जणांवर ठपका ठेवला होता. त्यानंतर हा अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे सादर केला. आरोग्य उपसंचालकांनी हा अहवाल सहसंचालक (मनोरुग्णालय) डॉ. साधना तायडे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर मात्र हा अहवाल डॉ. तायडे यांच्याकडे धूळखात पडून राहिला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी प्रश्न उपस्थित झाल्यास काहीतरी कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी १५ डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने मनोरुग्णालयातील तीन परिचारिका व एक परिचर अशा चार जणांना पाठक यांच्या हत्येप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. तब्बल १५ महिन्यानंतर कारणे दाखवा नोटीस मिळाल्याने कर्मचारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयMurderखून